मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने (MMRTA) घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयानुसार, आगामी १ सप्टेंबरपासून मुंबई महानगर क्षेत्रात (MMR) ऑटो रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या किमान भाड्यात वाढ करण्यात आली आहे. महागाई आणि वाढता खर्च यामुळे त्रस्त असलेल्या वाहन चालकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला, तरी यामुळे रोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशावर अतिरिक्त ताण येणार आहे.
नेमके नवे दर काय असणार?
-
ऑटो रिक्षा (Autorickshaw): पहिल्या १.५ किलोमीटरसाठी रिक्षाचे किमान भाडे २६ रुपयांवरून वाढवून २७ रुपये करण्यात आले आहे. तसेच त्यानंतरच्या प्रति किलोमीटरसाठी अधिकचे शुल्क आकारले जाईल.
-
काळ्या-पिवळ्या टॅक्सी (Black and Yellow Taxis): टॅक्सीचे किमान भाडे ३१ रुपयांवरून वाढवून ३३ रुपये करण्यात आले आहे.
कुठे लागू असणार हे नियम? हे नवीन भाडेदर मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई-विरार आणि पनवेल या संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात (MMR) एकाच वेळी लागू होणार आहेत. प्रशासकीय सूत्रांनुसार, या भाडेवाढीची वेळ पुण्यात होणाऱ्या सुधारित भाडेवाढीशी जुळवून घेण्यात आली आहे.
भाडेवाढीमागची कारणे: रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने भाडेवाढ करण्याची मागणी लावून धरली होती. सीएनजी (CNG) गॅसचे वाढलेले दर (सुमारे ८६ रुपये प्रति किलो), वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचा वाढलेला खर्च, सुटे भाग, स्पेयरपार्ट्स, विमा हप्ते आणि परवाना शुल्कात झालेली वाढ यामुळे चालकांना दैनंदिन खर्च भागवणे कठीण होत होते. मुंबई रिक्षावाले युनियनचे नेते थम्पी कुरियन आणि टॅक्सी युनियनच्या प्रतिनिधींनी प्रशासनाकडे महागाईनुसार दर वाढवण्याची जोरदार मागणी केली होती. टॅक्सी संघटनांनी सुरवातीच्या किमान भाड्यात ४ रुपयांची वाढ मागितली होती, परंतु एमएमआरटीएने अंतिम मंजुरी देत २ रुपयांची वाढ केली.
एका बाजूला चालक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून यामुळे उदरनिर्वाहासाठी मदत होईल असे म्हटले आहे, तर दुसरीकडे प्रवासी संघटनांनी वाढत्या महागाईच्या काळात हा प्रवास आणखी महाग झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
शहर
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठा उलटफेर! पुढील चार आठवडे पावसाचं असमान वितरण आणि तूट राहण्याचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता वाढली!
- आजचे राशिभविष्य २१ ऑगस्ट २०२६: शुक्र देणार पैसा, लक्झरी आणि सुख-समृद्धी; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!
- पुणे: भावाला वाचवताना दोघांचा करुण अंत, पुण्याच्या दौंडमध्ये विजेचा शॉक लागून दोन चुलत भावांचा मृत्यू आई थोडक्यात बचावली!
महाराष्ट्र
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- नक्कीच पुढच्या जन्मी डॉक्टर बनेल... वैद्यकीय परीक्षेच्या तणावातून १९ वर्षीय सूरजचे टोकाचे पाऊल!
- पुणे: कोल्हापूरकरांसाठी विशेष गाडी झाली कायमची डेली एक्स्प्रेस
- हिंमत असेल तर मुंबईतील दहीहंडी बंद करून दाखवा! पुण्यातील गणेशोत्सवावर निर्बंध आणणाऱ्या पोलिसांना भाजप शहराध्यक्षांचा थेट इशारा!
गुन्हा
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!




























Subscribe to my channel




