मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज

मुंबई: 'एल निनो'च्या काळात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या प्रणालींनी यंदा राज्याला, तसेच धरणक्षेत्रालाही मोठा दिलासा दिला आहे. जूनमध्ये राज्याच्या अनेक भागांत मान्सूनने निराशा केल्यानंतर जुलै महिन्यात मात्र पावसाने जोरदार पुनरागमन केले.

गोव्यामध्ये अजूनही पावसाची तूट असल्याने या तुटीचा परिणाम कोकण-गोवा विभागाच्या आकडेवारीवर झाला आहे, अन्यथा कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग वगळता इतर जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये मुंबई शहर आणि उपनगरांसह, पालघर जिल्ह्याचाही समावेश आहे. पालघरमध्ये सरासरीपेक्षा ६१ टक्के अतिरिक्त पाऊस नोंदला गेला आहे. विदर्भात २१ टक्के, तर मराठवाड्यात १७ टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील चारही विभागांमध्ये जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे दिसत आहे. 

 

कुठे किती पाऊस?
राज्यात नाशिक जिल्ह्याला जुलैच्या पावसाने मोठा फायदा झाला. नाशिक जिल्ह्यात सरासरी २९४.५ मिलीमीटर पावसाच्या तुलनेत ७९०.८ मिलीमीटर पाऊस झाला, जो १६९ टक्के अधिक आहे. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात १२९ टक्के, पालघरमध्ये १२४ टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली. मुंबई उपनगरात ७४ टक्के, तर मुंबई शहरात ६० टक्के पावसाची नोंद झाली आहे.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला असला, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उणे २७ टक्के, नंदुरबार जिल्ह्यात उणे २३ टक्के पाऊस नोंदला गेल्याने या दोन जिल्ह्यांमध्ये पावसाची लक्षणीय तूट कायम राहिली आहे. यासोबतच सोलापूर १७ टक्के, बीड सहा टक्के आणि हिंगोलीमध्ये ५ टक्के तूट नोंदवली गेली. तसेच, उजनी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने विसर्ग सोडावा लागला असून चंद्रभागा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *