Maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, दिग्गज मंत्री राजीनामा देणार? आजच निर्णय

image

Maharashtra political crisis news : मंत्रालयातील लाच प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ अडचणीत आले आहेत. लाच प्रकऱण पुढे आल्यानंतर झिरवळ बेपत्ता होते. आज ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडणार असल्याचे समजतेय. धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्यानंतर आता झिरवाळ राजीनामा देणार का? याची चर्चा सुरू झालेली आहे. मंत्रालयातील लाच प्रकरण समोर आल्यानंतर दोषी आढळलो तर राजीनामा देईल, असं झिरवाळ स्पष्ट म्हणाले होते. आता या प्रकरणात दररोज नवनवे पुरावे समोर येत आहेत. झिरवाळ यांचा थेट याच्याशी संबंध अद्याप समोर आलेला नाही. पण विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे आता सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (minister resignation news, bribery case Maharashtra)



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *