‘….तर मला कोणीच ओळखलं नसतं’, गौतमीने सांगितली आयुष्यातील महत्वाची गोष्ट

Gautami Patil : गौतमी पाटील सौंदर्य आणि तिच्या हटके आणि धडाकेबाज डान्सने नेहमी चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अशातच आता ती पुन्हा एकदा तिच्या डान्समुळे नाही तर तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिने एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत लोकं आपल्याला कधी जवळ करतात हे गौतमी पाटीलने सांगितलं आहे. त्यासोबत तुमच्या आयुष्यात पैसा किती महत्वाचा आहे याचं देखील तिने उदाहरण दिलं आहे. जे ऐकून तुम्ही देखील तिचं कौतुक कराल.

पैसे किती महत्वाचे आहेत?

पैसे हे खूप महत्वाचे आहेत पण नाही पण. मात्र, जेव्हा पैसे जवळ असतात तेव्हाच लोक जवळ येतात. तसेच भाऊबंदकी देखील जवळ येते. त्यामुळे तुमच्याजवळ पैसे असतील तर तुम्ही सर्व काही करू शकता. हे माझ्यासोबत झालं आहे त्यामुळे मी सांगत आहे. हे माझे अनुभवाचे बोल आहेत. जीवनामध्ये पैसा हा खूप गरजेचा आहे. पण कुठेतरी हा पैसा देखील गरजेचा नाही. सर्वच गोष्टी पैशाने विकत घेता येत नाहीत. ज्यामध्ये तुम्ही पैशाने एखाद्याचं प्रेम पण नाही विकत घेऊ शकत. पण तुमच्याकडे पैसा पाहिजे तरच सर्व काही आहे.

जर आता माझ्याकडे पैसे नसते तर मला देखील ओळखलं नसतं. तिथेच विषय संपला असता. कोण तू. तू कोण असा विषय आहे असं गौतमी पाटीलने म्हटलं आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहते तिच्या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

गौतमी पाटीलच्या या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर चाहत्यांकडून या व्हिडीओला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. अनेकांनी तिच्या आत्मविश्वासाचे आणि धडाकेबाज डान्सचे कौतुक केले आहे.

काही चाहत्यांनी ‘गौतमीने माधुरीच्या गाण्याला वेगळाच अंदाज दिला’ अशी प्रतिक्रिया दिली आहे तर काहींनी तिच्या स्टेज प्रेझेन्सचे विशेष कौतुक केले आहे. गौतमी पाटीलचे नाव गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झाले आहे. तिच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होत असते. यावेळीही तिच्या या सादरीकरणाने चाहत्यांना भुरळ घातली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *