उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेच्या पतीने तिच्या हत्येचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर पोलिस त्या महिलेचा ठावठिकाणा शोधत होते. जर तिची हत्या झाली असेल तर किमान काही सुगावा लागेल अशी त्यांना आशा होती. पण दोन वर्ष उलटून गेली, तरी त्या महिलेचा काहीच पत्ता लागला नाही. पण, एके दिवशी, अशी अनपेक्षित घटना घडली ज्यामुळे सगळेच हादरले. पोलिसांपासून ते महिलेच्या पतीपर्यंत सर्वांनाच मोठां धक्का बसला. महिलेच्या पतीच्या मोबाईल फोनवर एक ओटीपी आला, ज्याने ती महिला जिवंत असल्याचं धक्कादायक सत्य उघडलं.
ती महिला फक्त जिवंत सापडली नाही, तर तिने दुसऱ्या राज्यात जाऊन तिचं घर, संसार थाटला होता, हेही उघड झालं. हे संपूर्ण प्रकरण कप्तानगंज ठाणे क्षेत्रातील पिलखाव गावचं आहे. तिथे राहणाऱ्या प्रियांका नामक तरूणीचं ल्गन 14 मे 2018 साली संदीपशी झालं. लग्नानंतर सहा-सात वर्षं त्यांचं आयुष्य उत्तम सुरू होतं. त्यांना एक मुलगाही झाला. मात्र त्यानंतर पती-पत्नीमध्ये अचानक वाद होऊ लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, 1 जुलै 2024 रोजी वाद इतका वाढला की प्रियांका तिचे दागिने घेऊन तिच्या पालकांच्या घरी गेली. आत्महत्या करण्याच्या उद्देशाने तिथून ती तिच्या मुलाला घेऊन अयोध्येला पोहोचली. शरयू नदीच्या किनारी ती जीव देणारच होती, पण तेवड्यात राजस्थानहून आलेल्या मंगलचंद्र याने तिला पाहिलं. त्याने प्रियांकाचा जीव वाचवला. नंतर तिनेही आत्महत्येचा विचार सोडून दिला. तिथून ती मंगलचंद्रसोबत राजस्थानला निघून गेली. ितिथे जाऊन ते दोघं पती-पत्नीप्रमाणे, लिव्ह-इनमध्ये राहू लागले.
न्यायालयाच्या आदेशावरून FIR
मात्र बस्ती येथे, पत्नी आणि मुलाच्या अचानक बेपत्ता होण्याने पती संदीप खूप खचला, सैरभैर झाला. त्याने त्यांचा खूप शोध घेतला, पण ते सापडलेच नाहीत. त्यानंतर त्याला संशय आला की त्याच्या सासरच्या लोकांनी दागिन्यांच्या हव्यासापोटी प्रियंका आणि मुलाची हत्या केली असावी आणि त्यांचे मृतदेह नदीत फेकून दिले असावेत. संदीपने याबद्दल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याचे ऐकण्यास नकार दिल्याने संदीप न्यायालयात गेला. न्यायालयाच्या आदेशानुसार, 4 नोव्हेंबर 2024 रोजी प्रियांकाचे आई-वडील, चुलत भाऊ आणि आणखी एका व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
OTP ने पलटला सारा खेळ
यातच 2 वर्ष गेली. प्रियांका ही तिची ओळख बदलून राजस्थानमध्ये रहात होती. तिथे ती एका आधार सेंटवर जाऊन फोटो आणि पत्ता अपडेट करणापर होती. मात्र तिने जुना नंबर टाकताच, लिंक असलेल्या जुन्या नंबरवर ( जो आधी पती संदीपकडे होता) OTP गेला. संदीपने OTP पाहिल्यावर त्याला सगळा प्रकार क्षणात लक्षात आला आणि त्याने लगेच पोलिसांना कळवलं.
राजस्थानमधून प्रियांकाला घेतलं ताब्यात
इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सचा वापर करून पोलिसांनी राजस्थान गाठले आणि प्रियांकाला ताब्यात घेतलं. पोलिसांनी प्रियांकाला बस्ती येथे आणले तेव्हा तिथले दृश्य पाहण्यासारखे होते. पत्नी आणि मुलाला पाहताच तो भावूक झाला, पण त्याला बायकोचा खूप राहगी आला होता. मला प्रियांकासोबत रहायचं नाही, मला फक्त माझा मुलगा सोबत हवा आहे, असंही तो म्हणाला. पण त्याच्या मुलाने संदीपसोबत राहण्यास नकतार दिला, तो तर त्याला आपले वडील मानण्यासही तयार नव्हता.
मुलाच्या ताब्यासाठी कारवाई
“न्यायालयाच्या आदेशावरून हत्येचा एफआयआर दाखल करण्यात आला. सदर महिला जिवंत आढळल्यानंतर तिचा जबाब न्यायालयात नोंदवण्यात आला. मुलाच्या ताब्याबद्दल कायदेशीर कारवाई केली जात आहे. लवकरच अंतिम अहवाल दाखल केला जाईल ” असं एएसपी श्यामकांत म्हणाले.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



