
Kuwait Building Fire : कुवैतमध्ये एका इमारतीला लागलेल्या आगीमध्ये ४५ भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ४५ भारतीयांचे पार्थिव घेऊन भारतीय हवाईदलाचे एअरक्राफ्ट देशात दाखल झाले आहे. गुरुवारी रात्री एक विशेष विमान भारतीयांचे पार्थिव परत आणण्यासाठी कुवैतमध्ये पाठवण्यात आले होते. हे एअरक्राफ्ट शुक्रवारी चारच्या सुमारास कुवैतमधून निघाले होते. ते कोची विमानतळावर उतरले आहे.
एअरक्राफ्ट C-130J भारतीय कामगारांचे पार्थिव घेऊन कोची विमानतळावर दाखल झाल्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंह यांनी दिली. ते स्वतः या एअरक्राफ्टमध्ये होते. मृत कामगारांमध्ये २४ जण केरळचे आहेत. त्यामुळे एअरक्राफ्ट आधी कोची एअरपोर्टवर उतरले आहे. त्यानंतर एअरक्राफ्ट दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. कारण, कारण काही मृत कामगार हे उत्तर भारतातील आहेत. सर्व मृतांची ओळख पटवण्यासाठी कुवैत प्रशासनाकडून मृतदेहांची डीएनए टेस्ट घेण्यात आली आहे.
|
NEET Exam : NEET वरून सुप्रीम कोर्टाचा यू-टर्न; 1563 विद्यार्थ्यांचीही होणार फेरपरीक्षा |
किर्तीवर्धन सिंह यांनी कुवैतचे परराष्ट्र मंत्री अबदुल्ला अली अल-याह्या यांच्यासह इतर मंत्र्यांची भेट घेतली होती. परिस्थितीचा पूर्ण आढावा घेतला होता. याशिवाय किर्तीवर्धन यांनी मुबारक अल कबीर हॉस्पिटलला भेट देखील दिली होती. याठिकाणी अनेक जखमी भारतीयांवर उपचार सुरु होते. कितीर्वधन यांनी त्यांची विचारपूस केली.
कुवैतमध्ये इमारतीला लागलेल्या आगीमध्ये एकूण ४९ जणांचा मृत्यू झालाय, त्यात ४५ भारतीयांचा समावेश आहे. पीडित कुटुंबियांना आर्थिक मदतीचे आश्वासन कुवैत सरकारने दिले आहे. तसेच, या अपघाताप्रकरणी चौकशी समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास १५० जण इमारतीमध्ये राहत होते. आग लागली तेव्हा मुख्य दरवाजा आणि टेरसचे दार बंद होते. त्यामुळे अनेकांना बाहेर पडता आले नाही.
एनआरआय उद्योगपती आणि यूएईतील लूलू ग्रुपचे मालक युसुफ अली यांनी प्रत्येक पीडित कुटुंबासाठी ५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेबाबत माहिती घेतली होती. पंतप्रधान मोदी यांच्याकडून पीडित कुटुंबासाठी २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पीएम रिलीफ फंडमधून ही मदत केली जाईल.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




