सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच उमर खालिदला जामीन देण्यास पूर्वी दिलेल्या नकारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उमर पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहे. यावरून देशातील सर्वोच्च न्यायालय स्वतः राज्यसत्ता आणि घटनात्मक स्वातंत्र्य यांच्यात योग्य समतोल शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. दशकानुदशके भारतीय न्यायशास्त्र एका मूलभूत तत्त्वावर आधारित राहिले आहे : जामीन हा नियम आहे, तुरुंगवास हा अपवाद. न्यायमूर्ती व्ही.आर. कृष्णा अय्यर यांनी राजस्थान राज्य विरुद्ध बालचंद (1977) प्रकरणात हे तत्त्व स्पष्टपणे मांडले होते. दोष सिद्ध होण्यापूर्वी वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले होते. या तत्त्वाची पुन्हा पुन्हा पुष्टी झाली. त्यात गुडीकांती नरसिंहुलू विरुद्ध लोक अभियोजक (1978) या प्रकरणाचाही समावेश आहे. या प्रकरणात न्यायालयाने म्हटले होते की, दोष सिद्ध होण्यापूर्वी स्वातंत्र्यापासून वंचित करणे केवळ अपवादात्मक परिस्थितीतच योग्य ठरू शकते. अलीकडील काळात भारत सरकार विरुद्ध के.ए. नजीब (2021) या प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिला होता की, यूएपीएतील कठोर तरतुदीही अनुच्छेद 21 अंतर्गत दिलेल्या घटनात्मक हमींना निष्प्रभ करू शकत नाहीत. विशेषतः दीर्घ तुरुंगवास आणि खटल्यातील विलंब हे अन्यायाचे साधन ठरत असतील, तर परिस्थिती वेगळी मानली जाईल. न्यायालयाने असेही स्पष्ट केले होते की, अशा परिस्थितीत यूएपीएच्या कलम 43 डी(5) मधील कठोरताही कमी केली जाऊ शकते. मात्र, या स्थापित तत्त्वांनंतरही उमर खालिद सप्टेंबर 2020 पासून दिल्ली दंगल कट प्रकरणात तुरुंगात आहे. खटल्यात कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही. यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित होतो : राज्याकडे सर्व तपास आणि सरकारी यंत्रणा असूनही योग्य वेळेत प्रक्रिया पूर्ण होत नसेल, तर आरोपीला अनिश्चित काळ तुरुंगात ठेवणे योग्य आहे का? हे दोष सिद्ध होण्यापूर्वीच शिक्षा देण्यासारखे नाही का? जानेवारी 2026 मध्ये न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने उमर खालिद आणि शर्जिल इमामला जामीन नाकारला होता. इतर अनेक सहआरोपींना दिलासा मिळाला असतानाही हा निर्णय झाला. खंडपीठाने म्हटले होते की, यूएपीए प्रकरणांमध्ये खटल्यातील विलंब हा जामिनासाठी ‘ट्रम्प कार्ड’ बनू शकत नाही. तसेच आरोपांचे गांभीर्यही त्यांनी अधोरेखित केले होते. मात्र काही महिन्यांनंतर घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडीत न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने त्या पूर्वीच्या निर्णयावर गंभीर आक्षेप नोंदवले. 18 मे 2026 रोजी यूएपीएशी संबंधित दुसऱ्या एका प्रकरणात आरोपीला जामीन देताना खंडपीठाने ठामपणे पुन्हा नमूद केले की, जामीन हा नियम आहे आणि तुरुंगवास अपवाद आहे- अगदी यूएपीए प्रकरणांमध्येही. खंडपीठाने असेही म्हटले की, उमर खालिदला जामीन नाकारण्याचा पूर्वीचा निर्णय भारत सरकार विरुद्ध के.ए. नजीब या प्रकरणातील मोठ्या खंडपीठाच्या निर्णयाशी सुसंगत वाटत नाही. याचे परिणाम अत्यंत गंभीर आहेत. कारण एखाद्या आरोपीला दोष सिद्ध न होता आणि खटल्यात कोणतीही ठोस प्रगती नसताना पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात ठेवले जाऊ शकते, तर प्रक्रिया स्वतःच शिक्षेमध्ये बदलते.अशा परिस्थितीत दहा वर्षांनंतर आरोपी निर्दोष सुटला, तरी त्याच्या आयुष्यातील हरवलेली वर्षे, मलिन झालेली प्रतिमा, तुटलेले कौटुंबिक जीवन आणि तुरुंगवासातील मानसिक आघात परत मिळू शकत नाहीत. हा मुद्दा केवळ उमर खालिदपुरता मर्यादित नाही. सर्व सरकारांकडून यूएपीएसारख्या कठोर कायद्यांचा वाढता वापर हा यामागचा मोठा प्रश्न आहे. हे कायदे मुळात दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या गंभीर धोक्यांसाठी बनवले गेले होते. मात्र हळूहळू त्यांचा विस्तार राजकीय मतभेद आणि वैचारिक संघर्षांपर्यंत झाला आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील टिप्पणींवरून असे दिसते की, न्यायालयाला याची जाणीव आहे की कठोर कायदेशीर तरतुदींवर अति अवलंबित्व किंवा अंतहीन प्रक्रियात्मक विलंब हेच संविधानातील अनुच्छेद 21 अंतर्गत दिलेल्या स्वातंत्र्याच्या आश्वासनाला कमकुवत करू शकतात.प्रश्न अधिक मोठा आहे. भारतीय प्रजासत्ताक राज्यसत्ता आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यातील घटनात्मक समतोल टिकवून ठेवू इच्छिते का? सर्वोच्च न्यायालयाने योग्य प्रश्न उपस्थित केला आहे. आता देशाने त्याच्या उत्तराला सामोरे जाण्याचे धैर्य दाखवले पाहिजे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) यूएपीएसारखे कठोर कायदे मुळातच दहशतवाद,राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या गंभीर धोक्यांचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने हळूहळू त्यांचा विस्तार राजकीय मतभेद आणि वैचारिक संघर्षांपर्यंत झाला आहे.
हे पण वाचा-
शहर
- कंत्राटी भरतीला मोठा धक्का! 'आउटसोर्सिंग'वरून हिमाचल उच्च न्यायालय आक्रमक, वरिष्ठ सचिवांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश
- कचरा वर्गीकरणासाठी BMC चा मोठा निर्णय; ओला, सुका, सॅनिटरी आणि स्पेशल केअर कचरा आता होणार वेगळा!
- हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता, शेतकरी चिंतेत.
- वांद्रे गरीबनगरात पश्चिम रेल्वेचा 'बुलडोझर'; तणावपूर्ण शांततेत ४०० हून अधिक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- कंत्राटी भरतीला मोठा धक्का! 'आउटसोर्सिंग'वरून हिमाचल उच्च न्यायालय आक्रमक, वरिष्ठ सचिवांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश
- कचरा वर्गीकरणासाठी BMC चा मोठा निर्णय; ओला, सुका, सॅनिटरी आणि स्पेशल केअर कचरा आता होणार वेगळा!
- हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता, शेतकरी चिंतेत.
- वांद्रे गरीबनगरात पश्चिम रेल्वेचा 'बुलडोझर'; तणावपूर्ण शांततेत ४०० हून अधिक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त!
गुन्हा
- अमरावतीत लग्नमंडपात थरार! डीजेवर नाचण्याच्या वादातून स्टेजवरच नवरदेवावर सपासप वार; ड्रोन कॅमेऱ्याने २ किमी केला हल्लेखोराचा पाठलाग!
- नागपुरात मोठा खुलासा! संघ मुख्यालयाची रेकी करण्यासाठी 'केशर व्यापारी' बनून आला होता दहशतवादी रईस! अंधारात कट, कोर्टात साक्ष!
- इचलकरंजीत दारू पार्टीत रक्ताचा खेळ! सराईत गुन्हेगाराने महापालिका सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात ४ दगड घालून केला खून!
- पाटण्यात भयंकर कृत्य! घटस्फोटाचा राग अन् पैशांची हाव; नराधम पतीने दोन चिमुरड्यांसह सासरच्या ५ जणांना पेट्रोल ओतून पेटवले!
राजकीय
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
इतर
- 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा संभ्रम! ई-केवायसी मुदतवाढीचा फेक व्हिडिओ व्हायरल; सरकारी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी!
- फॅटी लिव्हरचा धोका! शरीरात दिसणारे 'हे' सुरुवातीचे संकेत ओळखा; लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी खा हे अन्न!
- बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात! २० गावांमध्ये १२७ 'रिचार्ज शाफ्ट' कामांना मंजुरी; भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय!
- केवायसी (KYC) अपडेट बंधनकारक! लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई.
मनोरंजन
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
- 'कुसुम मनोहर लेले'नंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक पुन्हा एकत्र; रंगभूमीवर येणार नवे नाटक!
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- ३०० किमी अंतरावर अचूक वेध! पुण्याच्या कंपनीने बनवलेल्या 'सूर्यास्त्र' रॉकेटची यशस्वी चाचणी!
- व्यापार तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन! अनावश्यक विदेशी वस्तूंच्या आयातीवर बंदी किंवा मोठा कर लावण्याची तयारी!
- परराष्ट्र वर्तुळातून अत्यंत दुर्दैवी बातमी! बांगलादेशमधील भारतीय दूतावासात असिस्टंट प्रोटोकॉल ऑफिसर नरेन धर यांचं निधन.
- नोकरदारांसाठी गूड न्यूज! आता UPI द्वारे होणार PF ट्रान्सफर; 'EPFO 3.0' मध्ये २४ तास व्हॉट्सॲप सेवा सुरू.

























Subscribe to my channel




