Massive Blaze Threatens Wildlife and Valuable Flora Across Dharani and Chikhaldara!

मेळघाटात भीषण आगडोंब! रोरा, सेमाडोहसह दुर्गम जंगल आगीच्या विळख्यात; मौल्यवान वनसंपदा खाक, वन्यजीव संकटात!

Massive Blaze Threatens Wildlife and Valuable Flora Across Dharani and Chikhaldara!
चिखलदरा/अमरावती: अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील वन विभाग तसेच व्याघ्र प्रकल्पाच्या (Melghat Tiger Reserve) संरक्षित जंगलात बुधवारी सकाळपासून अत्यंत भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मेळघाटात हा वणवा पेटला असून, यामध्ये हजारो हेक्टरवरील मौल्यवान वनसंपदा जळून खाक होत आहे. या भीषण आगीमुळे मेळघाटातील दुर्मिळ वनस्पती, औषधी वेली, वन्यजीव आणि संपूर्ण पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत असून अनेक दुर्गम भागांत आग अजूनही धगधगत आहे.

रोरा, सेमाडोहसह अनेक भागांत वणव्याचे तांडव
मिळालेली माहिती अशी की, धारणी व चिखलदरा तालुक्यातील रोरा, भवई, सेमाडोह, एकताई, हतरू आणि मांगिया या सर्वच वनपरिक्षेत्रातील जंगलात एकाच वेळी आग लागल्याचे समोर आले आहे. विशेषतः भवई ते सेमाडोह दरम्यानच्या अतिदुर्गम खोऱ्यात आणि डोंगराळ भागात जंगलाने रौद्र रूप धारण केले आहे. आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट मैलोनमैल दुरून नजरेस पडत आहेत. या आगीच्या विळख्यात मेळघाटातील मोठा अतिसंरक्षित जंगल परिसर सापडल्याने अस्वल, बिबट्या, हरिण, चौशिंगा यांसारख्या वन्यजीवांचे आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे प्राणही कमालीची धोक्यात आले आहेत.

युद्धपातळीवर आदेश; सामाजिक संस्थेची तत्परता
मेळघाटातील या अतिशय गंभीर परिस्थितीबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी जंगलाला लागलेल्या आगीचे गांभीर्य ओळखून व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक जयोती बॅनर्जी यांना तातडीने संपर्क करून माहिती दिली. क्षेत्र संचालकांनी याची त्वरित दखल घेत मेळघाट अंतर्गत येणाऱ्या धारणी, चिखलदरा आणि परतवाडा येथील सर्व उपवनसंरक्षकांसह (DFO) वनपरिक्षेत्र अधिकारी व वनकर्मचाऱ्यांना तातडीने प्रत्यक्ष जमिनीवर उतरून युद्धपातळीवर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कडक आदेश दिले आहेत.

अतिरिक्त यंत्रणा आणि मनुष्यबळाची गरज
वणवा रोखण्यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च केला जात असला, तरी सध्या मेळघाटातील आगीची परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. स्थानिक वनमजूर आणि 'अंगारी' कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु दुर्गम भाग आणि वाऱ्याचा वेग यामुळे अडचणी येत आहेत. वन विभागाने तातडीने अतिरिक्त मनुष्यबळ, आधुनिक अग्निशमन साहित्य आणि सॅटेलाइट अलर्ट यंत्रणा सचेत करून ही आग लवकरात लवकर आटोक्यात आणावी, जेणेकरून पुढील मोठी पर्यावरणीय हानी टाळता येईल, अशी तीव्र मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

इतर

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *