पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:ध्येय असे असावे की, आपल्या‎ कृतींमधून दुर्गुण दूर व्हावेत‎

बहुतेक वेळा आपण प्रतिक्रिया देण्यातच आयुष्य घालवतो. कुणीतरी‎आपल्याशी काही बोलले. आपल्यासाठी चांगले किंवा वाईट केले की‎आपण लगेच प्रतिक्रिया देतो. हळूहळू आपली मौलिक कृती संपत‎जाते. आपण प्रतिक्रियांचे पुतळे बनून राहतो. आपल्या सुख-दुःखाचा‎रिमोट इतरांच्या हातात जातो. प्रत्यक्षात मात्र आपली कृती हळूहळू‎सर्जनशीलतेत बदलली पाहिजे. आपण ईश्वराकडे वाटचाल करू‎लागतो. तेव्हाच कोणतेही काम सर्जनशील होत असते. आपल्या‎कृतीतून जेव्हा दुर्गुण निघून जातात. तेव्हा ते काम पूजेसमान बनते.‎पूजेचा परिणाम म्हणजे ईश्वराचा सान्निध्य लाभणे होय.‎काकभुशुंडीजींनी गरुडजींना सांगितले आहे-“काम क्रोध मद लोभ रत,‎गृहासक्त दुखरूप। ते किमि जानहिं रघुपतिहि, मूढ़ परे तम कूप॥”‎म्हणजे काम, क्रोध, अहंकार आणि लोभात अडकलेले तसेच‎दुःखरूपी गृहासक्तीत गुरफटलेले आहेत ते प्रभू श्रीरामांना कसे जाणू‎शकतील? असे मूर्ख अंधाररूपी विहिरीत असतात. आपल्या‎कृतींमधून दुर्गुण दूर व्हावेत असे ध्येय असावे. त्यानंतर मिळेल, ते‎निश्चितच श्रेष्ठ असेल. ‎

This post was originally published on this site.



महाराष्ट्र

गुन्हा

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *