पूर्वी भारतीय बाजारपेठ स्वतःमध्येच बंदिस्त आणिएकाकी असायची, पण आता ती जागतिक व्यापाराचीप्रणेती बनत चालली आहे. भारतीय बाजारपेठेचे हेपरिवर्तन कदाचित 21 व्या शतकातील जागतिकअर्थव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा संरचनात्मक बदलआहे. देशाने बंदिस्त, बचावात्मक आर्थिक भूमिका सोडूनबाह्य जगाकडे लक्ष ठेवणारा, जागतिक स्तरावर आक्रमकदृष्टिकोन स्वीकारला आहे. जो देश कधीकाळीजागतिकीकरणात संकोचाने सहभागी होत असे, तो आताजागतिक पुरवठा साखळीला आकार देणारी एकआत्मविश्वासपूर्ण शक्ती बनला आहे. अनेक दशके भारतीय बाजारपेठ‘लायसन्स-परमिट-कोटा राज’ म्हणून ओळखली जातहोती. ही नोकरशाहीची पकड आणि प्रचंड करांचीगुदमरून टाकणारी व्यवस्था होती, जी देशांतर्गत उद्योगांना परदेशी भांडवलाच्या कथित शोषणापासून वाचवण्यासाठी तयार केली गेली होती. स्वातंत्र्योत्तर काळातील बहुतांशकाळ भारताची आर्थिक रणनीती आत्मनिर्भरता, आयातपर्याय आणि जागतिक बाजारपेठेबद्दलची तीव्र शंका यावर आधारित होती. या दृष्टिकोनामुळे तांत्रिक साचलेपणा आणि भारताचीआर्थिक क्षमता व तिची कामगिरी यातील सातत्यानेवाढणारी दरी निर्माण झाली. अर्थतज्ज्ञ राज कृष्ण यांनी तरयाला ‘हिंदू विकास दर’ असे नाव दिले होते. आपलीअर्थव्यवस्था लोकसंख्या वाढ आणि वाढत्या गरजांशीजुळवून घेण्यासाठी सतत संघर्ष करत राहिली. 1991 च्या उदारीकरणाने या परिवर्तनाची सुरुवात केली.भारताने जागतिक अर्थव्यवस्थेपासून स्वतःचा बचावकरण्याऐवजी त्यात हिरिरीने भाग घेण्यापर्यंत आणि त्यातस्पर्धा करण्यापर्यंत मजल मारली. हा बदल आर्थिकदृष्ट्याजेवढा महत्त्वाचा होता, तेवढेच त्याचे मानसिक महत्त्वहीहोते. खुलेपणाच्या शक्यतांचा स्वीकार करण्यासाठीभारताला आपली चिंता, असुरक्षिततेची भावना सोडूनद्यावी लागली. काळानुसार, जागतिक व्यापार,भांडवलाचा ओघ, तंत्रज्ञान नेटवर्कमधीलएकत्रीकरणामुळे विकासाचा वेग, शहरीकरणाचाआकृतीबंध, उद्योजकीय संस्कृतीला नवा आकारमिळाला. पण ही कथा इथेच संपत नाही. 2026 च्या भारतानेआपल्या बेड्या तोडून जगातील सर्वात खुली आणिउदारीकृत उदयोन्मुख अर्थव्यवस्था बनण्याचा मानमिळवला आहे. हे परिवर्तन एका मूलभूत अंतर्दृष्टीतूननिर्माण झाले आहे आणि ती म्हणजे, एका डिजिटलीकृतजगात खरे आर्थिक सार्वभौमत्व एकाकी राहण्यातून नाही,तर जोडले जाण्यातून मिळते. 1991 च्या सुरुवातीच्यासुधारणांनी दरवाजे उघडण्यास सुरुवात केली होती, तरभारताने गेल्या काही वर्षांत हे अडथळे दूर केले आहेत. आता भारत केवळ एक किरकोळ खेळाडू राहिलानसून, जागतिक आर्थिक प्रवाहात तो केंद्रस्थानी आहे.सेवांची निर्यात, डिजिटल क्षमता आणि उत्पादनातीलमहत्त्वाकांक्षा यामुळे आपण स्वतःला अशा देशाच्या रूपातप्रस्थापित केले आहे, ज्याचे आर्थिक निर्णय आपल्यासीमेपलीकडेही दूरवर परिणाम करतात. बहुपक्षीय मंचांवरभारताने यूएई, ओमान, ऑस्ट्रेलिया, यूके आणि ईयू(युरोपियन युनियन) यांच्यासोबत ऐतिहासिक व्यापकआर्थिक भागीदारी करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.याशिवाय, न्यूझीलंड आणि अमेरिका या दोन्ही देशांनीतत्त्वतः करारांची घोषणा केली आहे. या बदलाच्यामुळाशी भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भरता’ या मंत्राची एकसूक्ष्म फेरव्याख्या देखील आहे. भारताच्या नेत्यांना आतासमजले आहे की, आत्मनिर्भरता इतरांपासून वेगळे राहूननव्हे, तर जागतिक स्तरावर जोडले जाऊनही साध्य करतायेऊ शकते. भारत आता परदेशी भांडवलाला घाबरत नाहीआणि पूर्व आशियातील पारंपरिक उत्पादन केंद्रांना प्रमुखपर्याय म्हणून तो अत्यंत उत्सुकतेने स्पर्धा करत आहे. अशाप्रकारे, भारताच्या या खुलेपणाला आताधोरणात्मक महत्त्व प्राप्त झाले आहे. जे कधीकाळीदेशांतर्गत सुधारणांचे उद्दिष्ट वाटत होते, ती आता एकजागतिक संधी बनली आहे. उदयोन्मुख डिजिटलसार्वजनिक पायाभूत सुविधा आणि नवीन व्यापार करारयातील समन्वय अशा भविष्याकडे निर्देश करतो, जिथेभारत केवळ वस्तूंचीच नव्हे, तर जगाच्या डिजिटलआर्किटेक्चरचीही निर्यात करेल. एक मोठी, स्थिरलोकशाही, तरुण मनुष्यबळ, सुधारत असलेल्या पायाभूतसुविधा आणि अधिक पारदर्शकतेकडे वाटचाल करणारेनियामक वातावरण यांचा संगम- भारताला केवळ चीनलापर्याय बनवत नाही, तर बहुध्रुवीय पुरवठा-साखळीच्यासंरचनेत एक महत्त्वाचे केंद्रही बनवतो.
(@प्रोजेक्ट सिंडिकेट) विदेशी भांडवलाला विरोध व ते आकर्षितकरण्यापर्यंत; देशांतर्गत अक्षमतेपासून तेजागतिक स्पर्धात्मकतेपर्यंत- आपलाप्रवास स्पष्ट आहे. भारत आता जागतिकव्यवस्थेत मूकदर्शक राहिला नाही, तरआपल्या भविष्याचा निर्माता बनला आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
महाराष्ट्र
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
- इस्रायलमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीची नवी गाथा
- दाम्पत्य रस्ता चुकले, जिवाला मुकले! गोवा बांबोळी महामार्गावर कारची दुचाकीला जोरदार धडक; वृद्ध पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

























Subscribe to my channel


