मी महापालिका बोलतेय... आतापर्यंत मी आपल्याला सत्ताधारी आणि विरोधी आघाडीतील कुरघोडीचं राजकारण सांगितलं. शिवसेना, भारतीय जनता पक्षातील संघर्षही आपण पाहिला, पण मला आता आठवते ती गोष्ट आहे शिवसेनेतील अंतर्गत वादाची. शिवसेनेचे विकास जैन महापौर असताना घडलेलं हे प्रकरण. सर्वसाधारण सभेमध्ये पाणीपट्ट्याच्या मुद्द्यावरून आणि इतर काही ठरावांवरून शिवसेनेमध्ये हा वाद पेटला. उत्पन्न वाढीसाठी पाणीपट्टी वाढवण्याचा ठराव आला होता. हा मुद्दा केवळ एक निमित्त ठरला. खरंतर तेव्हा पाणीपट्टी वाढलीच नाही, पण वाद या मुद्द्यावर असल्याचं वरवर दाखवण्यात आलं. सभागृह नेते अंबादास दानवे यांनी विकास जैन यांची कोंडी केली. त्यांना सुदाम सोनवणे यांचीही साथ होती. बरेच दिवस त्यांच्यातील संघर्ष मिटला नाही. ‘त्यांना म्हणजे दानवे आणि सोनवणे यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,’ असं जैन उघडपणे बोलले होते. त्यावर ‘हा पक्षातील अंतर्गत विषय आहे. आम्ही त्यातून तोडगा काढू,’ असं सोनवणे यांनी सांगितलं होतं. स्थानिक पातळीवर वाद मिटंना. अखेरीस प्रकरण थेट उद्धव ठाकरे यांच्याकडं गेलं. त्यांनी तिघांनाही मुंबईला बोलवून घेतलं. मुंबईत जाताना त्यांच्यासोबत शिवसेनेचे आणखी नगरसेवकही होते. कुणी काय बोलायचं हे सर्व ठरलेलं होतं. मात्र, ऐनवेळी ठाकरे यांच्या पवित्र्यामुळे अंतर्गत धुसफूस ‘मातोश्री’वर उघड झाली. दानवे आणि सोनवणे यांना स्थानिक नेत्यांनीही साथ दिली नाही. पक्षानं दोघांनाही राजीनामा द्यायला सांगितलं होतं. विशेष म्हणजे पक्षाने राजीनामा घेतलेले हे पहिले दोन नगरसेवक. त्यानंतरच्या काळातही शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद होतच राहिले. मात्र, सोनवणे आणि दानवे यांना झालेली शिक्षा लक्षात घेता बऱ्याच जणांनी स्थानिक पातळीवरच वाद मिटवण्यात धन्यता मानली. दानवे यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा घेतल्यानंतर त्यांची शिवसेनेतून पीछेहाट सुरू होईल, अशी चर्चा होती. प्रत्यक्षात त्यांनी जिल्हाप्रमुख पद मिळवलं आणि ते कायम आपल्याकडं ठेवत ही चर्चा फोल ठरवली. नंतर तर ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेही झाले. सध्याच्या निवडणुकीची सूत्रं दानवे यांच्याकडंच आहेत. महत्त्वाचे म्हणजे दानवे आणि सोनवणे यांचे राजीनामे कोणत्या कारणामुळे घेतले हे गुलदस्त्यातच आहे. मनपात सर्वात प्रभावी काम करणारे प्रदीप जैस्वाल आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील संघर्ष त्यांनी कधी उघड होऊ दिला नाही. अंतर्गत वादात न पडता नंदकुमार घोडेले यांनी मात्र दोन वेळा महापौरपद मिळवलं. शिवसेनेनं आमदारकीची उमेदवारी नाकारल्यानंतर प्रदीप जैस्वाल अपक्ष म्हणून लढले. पुढं यांनी शहर विकास आघाडी स्थापन करत मनपा निवडणूक लढवली. त्यांनी काही नगरसेवक निवडूनही आणले. या शहरात स्वतःच्या बळावर काही नगरसेवक निवडून आणणारे ते एकमेव स्थानिक नेते म्हणावे लागतील. एकूणच काय तर वेळप्रसंगी संघर्ष करावा, पण राजकारणात टिकून राहावं हा संदेश महापालिकेच्या राजकारणातच मिळतो. मग ते उदाहरण दानवेंचं असो किंवा जैस्वाल यांचं...
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



