Maharashtra Politics : हिमतीला दाद! सूरज चव्हाणचं प्रमोशन, पक्षाने सोपावली मोठी जबाबदारी; रोहित पवारांचा अजितदादांना सवाल

Maharashtra Politics : रमी खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लातूरमध्ये बेदम मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांची युवक प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. पण अवघ्या काही महिन्यामध्येच सूरज चव्हाण यांच्याकडे पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीसपदी सूरज चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. यावरून आता अजित पवार गटावर टीका होऊ लागली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात थेट अजित पवारांनाच प्रश्न विचारला आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत सूरज चव्हाण यांची पक्षाच्या मोठ्या पदावर नियुक्ती करण्यात आल्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'लातूरमध्ये केलेल्या गुंडगिरीप्रकरणी पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा निर्णय योग्यच होता. परंतु महिनाभराच्या आतच त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचे प्रमोशन केले जात असेल तर याला काय म्हणायचं?'

अजित पवार यांच्यावर प्रतिमेला धक्का देण्याचे काम केले जात असल्याचा आरोप करत रोहित पवार पुढे म्हणाले की, 'अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजपप्रेमी गट जाणूनबुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत असतो. ‘शब्दाला पक्का’ या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी कालची वादग्रस्त नियुक्ती केली गेली अशी चर्चा आहे. मारहाण करताना फ्रॅक्चर झालेल्या हातावरील प्लास्टरचा पट्टा निघण्याच्या आतच प्रमोशन केलं, नियुक्ती करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. शेवटी, ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’!'

Maharashtra : कोकणात राजकीय भूकंप! शरद पवारांना जबरदस्त धक्का, बडा नेता भाजपाच्या गळाला

सूरज चव्हाण यांच्या प्रमोशनवर अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया देत अजित पवार गटावर टीका केली आहे. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाणारे वर्तन हे स्वीकारले जाणार नाही. म्हणून कठोर निर्णय घेऊन सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी पक्षाने बाजूला केले असे ट्वीट अजित पवारांनी २१ जुलै रोजी केले होते. या ट्वीटचा स्क्रीन शॉर्ट पोस्ट करत अजंली दमानिया यांनी अजित पवारांना अनेक सवाल केले आहेत.

तर, '२३ दिवसानंतर पलटून जे युवक अध्यक्ष होते त्यांना प्रमोशन देऊन त्यांना सरचिटणीस केले. तर आता अशा पक्षाला काय म्हणायचं? अशा पक्षाचे नेते अजित पवारांना काय म्हणायचं? त्या पक्षाच्या अध्यक्षाला काय म्हणायचं? जे त्यांच्या पक्षाला खरे राहू शकत नाही. ते बोलतात एक आणि करतात एक. असे जे लोक असतात त्यांच्यावर लोकांनी किती विश्वास ठेवायचा हे जनतेने ठरवायला हवं.', अशी टीका दमानिया यांनी केली.च

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *