
Maharashtra Rain : राज्यात सगळीकडे जोरदार पाऊस पडत आहे. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. आज कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या नागपूर आणि वर्धामधील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून नदी-नाल्यांना पूर आल आहे. हवामान खात्याकडून काही जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन देखील हवामान खात्याने केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यात तुफान पाऊस पडत आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. सरूळ इथली यशोदा नदी दुथडी भरून वाहत आहे. पुलावरून ३ फुटांपर्यंत पाणी वाहत आहे. यशोदा नदीला पूर आल्याने अलमडोह ते अल्लीपूर मार्ग बंद झाला आहे. तर वर्धा ते राळेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हे दोन्ही मार्ग बंद झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. गेल्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा या नदीला पूर आला आहे. हिंगणघाट आणि देवळी तालुक्यातील गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटला. नदीकाठावरील गावाना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूराचे पाणी गावांमध्ये शिरण्याची शक्यता आहे.
वर्ध्यातील यशोदा नदीच्या पाणी पातळीमध्ये सतत वाढ होत चालली आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी-नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. आजही वर्धामध्ये तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली. सतत सुरु असलेल्या पावसामुळे वर्धा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात नक्षी नदीला पूर आला आहे. त्यामुळे भिवापूर - जवळी - हिंगणघाट मार्ग बंद झाला आहे. गेले दोन दिवस नागपुरात पावसाची संततधार सुरू असून गेल्या दोन दिवसांत सर्वाधिक पाऊस भिवापूर तालुक्यात झाला. मात्र पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली नव्हती. पण काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नक्षी नदी ओसंडून वाहत असून नदीला पूर आला आहे. पूराचे पाणी जवळपासच्या क्षेत्रामध्ये शिरले आहे. परिणामी भिवापूरवरून हिंगणघाटकडेदरम्यान, हवामान खात्याने आज रायगड, पुणे घाटमाथा, नाशिकचा घाटमाथा आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये देखील तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे. जाणारा मार्ग बंद झाला आहे.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




