
Women Health : महिलांसाठी धोरण... महिलांसाठी सुरक्षा... अशा कितीही व्यापक योजना सरकारने आखल्या तरीही आज महिलाच्या आरोग्याबाबत सरकार खरंच त्याची अंमलबावणी करतं का? असा सवाल विचारला जात आहे. महिलांची सुरक्षा समाजातील नाही तर आरोग्याच्या चौकटीत आखली गेली पाहिजे. आजही अनेक महिला जीवन-मरणाच्या दारात उभ्या आहेत. हे जळजळीत वास्तव आहे. पाहुयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट...
समाजात सुशिक्षित महिलांचे वाढते प्रस्त लक्षात घेता आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचे पहायला मिळत आहेत. महिलांचे समाजातील स्थान आणखी बळकट करण्यासाठी आरोग्यापासून सुरक्षेपर्यंत सर्वच बाबींवर विशेष प्रकाश टाकला जातो. इतकाच काय तर महिला आर्थिक विवंचनेच्या कचाट्यात सापडून तिला हतबल करु नये, यासाठी अनेक योजनांचा पाऊसही पाडला जातो.
पण इतक्या सर्व गोष्टींच्या गराड्यात महिला आरोग्य सुरक्षेच्या बाबत मात्र डोळेझाक कायम होत आल्याचे निदर्शनात आलं आहे. आता आम्ही हे का म्हणतोय याचे उत्तर म्हणजे नुकताच सुलभ स्वच्छता मिशन फाउंडेशनने केलेला सर्वे. हा सर्वे त्यांनी महाराष्ट्रातील बीड आणि धाराशिव या दोन जिल्ह्यात केलाय. यामधून काय वास्तव समोर आलंय पाहा...
|
|
कसं केलं सर्वेक्षण?
- बीड आणि धाराशिव येथील जिल्ह्यातील १० गावांमध्ये खेत्री संशोधन केले.
- बीडमधील ३५१ आणि धाराशिव येथील २२६ महिलांसह एकूण ५७७ महिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
- बीड येथील १९.१ टक्के महिलांना मासिक पाळीशी कोणते अवयव संबंधित आहेत हे माहित नव्हतं.
- बीड येथील २६.५ टक्के महिलांना मासिक पाळीची कारणे माहिती नव्हती.
- बीड येथील २४.५ टक्के महिला आणि धाराशिव येथील १६.८ टक्के महिला मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या अभावाचे दुष्परिणाम काय आहेत हे सांगू शकल्या नाहीत.
महिलांना आपल्या मासिक पाळीबाबत माहिती नाही अथवा त्यांना आपल्या अवयवाचे ज्ञान नाही फक्त इतकंच नाही तर आर्थिक परिस्थिती बिकट आणि सरकारच्या योजनांचा अभाव या गोष्टी पण त्यांच्या आरोग्याची हेळसांड करतात की काय असाही सवाल उपस्थित होत आहे.
आर्थिक परिस्थिती आणि सरकारी योजनांचा अभाव यामुळे असलेली परिस्थिती -
- बीडमधील ७०.३ टक्के आणि धाराशिव येथील ६६.२ टक्के महिला कापडव्यतिरिक्त मासिक पाळी उत्पादनांचा वापर करतात. तर ६२.२ टक्के महिला आर्थिक अडचणींमुळे कापड आणि पॅड दोन्ही खर्च वाचवण्यासाठी वापरतात.
- बीड आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यातील जवळपास अर्ध्या महिला सुती कापड वापरतात. याचे प्रमाण ६२.२ टक्के आहे.
- पाळीच्या वेळी वापरलेले कापड हे विहीर नाहीतर हॅन्ड पम्पजवळ धुतले जाते. त्यावेळी एकच साबण वापरला जातो असे सांगणाऱ्या महिलांचे प्रमाण ४७ टक्के आहे.
- तर ८३.७ टक्के महिलांनी ते कापड सूर्यप्रकाशात न वाळवता बंद खोलीत वाळवले आणि ते वापरताना केवळ अर्ध्याच महिलांनी ते कोरडे असल्याची खात्री केली.
- मासिक पाळीवेळी गंभीर समस्या असूनही केवळ १४.३ टक्के महिलांनी वैद्यकीय सल्ला घेतला. पण प्रत्यक्षात फक्त ७.१ टक्के महिला डॉक्टरांना जाऊन भेटल्या.
- धाराशिव येथील १४.८ टक्के महिलांनी त्यांच्याकडे डॉक्टरकडे जायला पैसे नसल्याचे मान्य केले
- महिला डॉक्टरच्या अभावामुळे ४४.९ टक्के महिलांनी वैद्यकीय सल्ला टाळला.
'महाराष्ट्र पुरोगामी आहे पण मराठवाडा अजूनही प्रचंड मागासलेला आहे. ऊसतोड कामगार, वीट भट्टी महिला कामगार यांच्याबाबत त्यांचे मुकादम का नाही पाऊला उचलत? असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे. याबाबत सरकारने आता एक पाऊल पुढे टाकणे अत्यंत महत्वाचे आहे. अनेक वर्षांपासून मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पाण्याची समस्या आहे त्याकडे विशेष लक्ष दिलं तर आरोग्याचेही अनेक प्रश्न सुटतील.', असे सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशनच्या राष्ट्रीय संचालिका नीरजा भटनागर यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र हे सर्वात प्रगत राज्य आहे असे कितीही म्हटले तरी सत्य परिस्थिती ग्राउंडवर उतरल्याशिवाय नाही कळणार. महाराष्ट्राला जर आणखीन पुढे न्यायचे असेल तर महाराष्ट्राच्या महिलांना आर्थिक, सामाजिकसोबत आरोग्याच्या वैयक्तिक समस्यांवर मात करण्यासाठी मिशन उचलणं गरजेचं आहे.
दरम्यान, महिलांना बहिणीचे स्थान देणाऱ्या सरकारने एकीकडे आपली पाठ थोपटून घेतली आहे. मात्र आज खऱ्या अर्थाने बहिणींनाही आरोग्याच्या जटील समस्यांमधून बाहेर काढण्यासाठी सरकारच्या मदतीच्या हाताची गरज आहे. आर्थिक, वैद्यकीय आणि पाण्याच्या समस्यांनी ग्रासलेल्या मराठवाड्यातील महिलांसाठी सरकार काय करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



