
Wardha : वर्धा जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यातून अवैध वाळूची वाहतूक सुरु होती. याबाबतची माहिती सहायक पोलीस अधीक्षक राहुल चौहान यांना मिळाली. यावरून नाकाबंदी करत गिरडकडून जामकडे अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ६ ट्रकवर कारवाई करत वाळूची तस्करी रोखली आहे. या कारवाईत तब्बल १ कोटी ५० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून यासंबंधी १४ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महसूल मंत्र्यांकडून वाळू माफियावर अंकुश लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत. मात्र अधिकाऱ्यांसोबत असलेल्या अर्थपूर्ण संबंधातून वाळूची अवैध वाहतूक सुरुच असल्याचे बोलले जात आहे. अशात वर्धा जिल्ह्यात वाळू उपसा करता येत नसल्याने भंडारा जिल्ह्यातून वाळूची अवैधपणे वाळूची वाहतूक केली जात होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. वर्धा जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक होत आहे. बाहेर जिल्ह्यातून वाळू आणत जिल्ह्यात मोठ्या दरात वाळू विकली जात आहे. ही सर्व वाळू बिना रॉयल्टी असून यात शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडत आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे वाळू माफियाचे धाबे दणाणले आहे.
|
Ahilyanagar Crime : अहिल्यानगरात खळबळ! २० जणांचे टोळके आले, किराणा दुकानात गेले, पुढे घडले ते भयंकर |
दरम्यान पोलिसांना रात्री गस्ती दरम्यान गिरडकडून जामकडे मोठ्या प्रमाणात अवैध वाळुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी समुद्रपुर येथे सापळा रचून नाकाबंदी केली. यावेळी एका मागे एक ट्रक येतांना दिसले. सदरचे ट्रक थाबंवून विचारपुस केली असता त्यांनी वाहनामध्ये रेती असल्याचे सांगितले. ट्रकची ताडपत्री काढून पाहणी केली असता सर्व वाहनात गौण खनिज तांबडी पांढरी रेती असल्याचे दिसुन आली.
१४ जणांवर गुन्हा दाखल
रॉयल्टी बाबत विचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचे सांगितले. सदर वाळू भंडारा येथुन वाहन मालकाच्या सांगण्यावरून भरून आणल्याचे चालकांकडून सांगण्यात आले. यावेळी पोलिसांनी तब्बल १ करोड ५० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून शेख रशिद (रा. अमरावती), मनिल धुर्वे (रा. कसाईखेडा अमरावती), जुबेर खान (रा. अमरावती), अतुल भगत (रा. हुसनापुर ता. देवळी, जि. वर्धा, निकेश मेश्राम (रा. कारला चौक, वर्धा), प्रतिम उईके (रा. सेलडोह, ता. सेलु जि. वर्धा), पंकज मडावी (रा. सेलडोह, ता. सेलू जि. वर्धा), बबलू उर्फ ईरशाद पठाण (रा. वर्धा, पसार), शेख नसीब (रा. ताजनगर अमरावती), गौसीन खान (रा. वर्धा पसार), शैलेश शेंद्रे (रा. तिगांव वर्धा), तुषार सोनटक्के (रा. सेलडोह, ता. सेलु जि. वर्धा), अजहर खान (रा. वर्धा), शेख रूबेज (रा. स्टेशनफैल, वर्धा) या १४ जणाविरोधात समुद्रपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



