
New Delhi : जम्मू आणि काश्मीरमधील जम्मू विभागाला दहशतवाद्यांनी गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात लक्ष्य केल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. जम्मू विभागातील १०पैकी आठ जिल्ह्यांना दहशतवादाची झळ बसली असून त्यामध्ये एकूण ४४ जण ठार झाले आहेत. वर्षभरात एकूण १८ सैनिक शहीद झाले आणि १३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याशिवाय या हल्ल्यांमध्ये सामान्य नागरिकांनाही प्राण गमवावे लागले आहेत.
यापूर्वी तीन वर्षांच्या कालावधीत राजौरी आणि पूंछ या नियंत्रणरेषेलगतच्या जिल्ह्यांमध्ये दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दले आणि नागरिकांवर हल्ले करून बरीच प्राणहानी घडवली. सुरक्षा दलांनी केलेल्या उपाययोजनांमुळे २०२४मध्ये या दोन जिल्ह्यांमधील दहशतवादी हल्ल्यांची संख्या कमी झाली. दुसरीकडे उन्हाळा सुरू झाल्यानंतर, म्हणजे एप्रिल-मेपासून जम्मू विभागाच्या रियासी, दोडा, किश्तवार, कथुआ, उधमपूर आणि जम्मू या जिल्ह्यांमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाल्यामुळे सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे.
पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या सूत्रधारांचा जम्मू-काश्मीरच्या शांततापूर्ण भागांमध्ये दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न असफल करण्यासाठी पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांबरोबरच्या (सीएपीएफ) समन्वयाने लष्कर मोहिमा आखत आहे. विशेषत: दाट जंगलांसारख्या असुरक्षित भागांमध्ये सुरक्षा दलांनी मोहिमा राबवल्या.
|
Baku : युक्रेन, इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ |
अधिकृत आकडेवारीनुसार दोडा, कथुआ आणि रियासी या तीन जिल्ह्यांमध्ये या वर्षी प्रत्येकी नऊ जणांचा दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला. त्यापाठोपाठ किश्तवारमध्ये पाच, उधमपूरमध्ये चार, जम्मू व राजौरीमध्ये प्रत्येकी तीन आणि पूंछमध्ये प्रत्येकी दोन अशी प्राणहानी झाली. यामध्ये १८ सुरक्षा सैनिक शहीद झाले, १३ दहशतवादी ठार झाले आणि १४ नागरिक मरण पावले. त्यामध्ये सात यात्रेकरू आणि तीन ग्राम संरक्षकांचा समावेश आहे.
दशकभरापूर्वी काश्मीरमध्ये अशांतता असताना जम्मू विभाग मात्र तुलनेने शांत होता. मात्र, ऑक्टोबर २०२१पासून राजौरी आणि पूंछ भागात दहशतवाद्यांनी अधिक करून लष्करी वाहनांना लक्ष्य केले आहे. त्यामध्ये ४७ सैनिक शहीद झाले.
दहशतवाद्यांचा शोध अजूनही सुरू
किश्तवारमध्ये गुरुवारी दोन ग्राम संरक्षकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सोमवारीही सुरू होता. सुरक्षा दलांनी आखलेल्या शोधमोहिमेदरम्यान, किश्तवारमधील केशवान जंगलामध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत रविवारी नायब सुभेदार राकेश कुमार शहीद झाले तर तीन जवान जखमी झाले. केशवान आणि कुंटवारा जंगलासह अवतीभोवतीच्या परिसरात दहशतवादी लपून बसल्याचा संशय असून गेल्या चार दिवसांपासून ही शोधमोहीम राबवली जात आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



