
Mumbai : कर्करोग रुग्णांना अधिकाधिक चांगले आणि त्यांच्याच परिसरात उपचार मिळावेत यासाठी राज्यातील सहा जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोगावरील उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार चार जिल्हा रुग्णालयांमध्ये रेडिएशन ऑनकॉलॉजी केंद्र तर दोन जिल्ह्यांमधील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये रेडियोथेरेपी आणि डे केअर किमोथेरेपी केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून उभारण्यात येणाऱ्या या केंद्रांमुळे सहा जिल्ह्यातील रुग्णांना त्यांच्या घराजवळ उपचार मिळू शकतील. त्यामुळे मुंबई, पुणे यांसारख्या शहरातील रुग्णालयांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होईल.
नागरिकांना घराजवळ कर्करोगावरील उपचार सुविधा मिळावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीकोनातून राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोगावरील उपचार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्हा रुग्णालये कर्करोगावर उपचार करण्यास सक्षम झाल्यास रुग्णांना मुंबई, पुणे यांसारख्या शहरात उपचारासाठी जाण्याची गरज पडणार नाही.
|
Pune : विद्यापीठांच्या धर्तीवर शाळांनाही स्वायत्तता, काय आहे नवी तरतूद? |
त्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील चार जिल्हा रुग्णालयांमध्ये रेडिएशन ऑनकॉलॉजी केंद्र तर दोन जिल्ह्यांमध्ये रेडियोथेरेपी आणि डे केअर किमोथेरेपी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेडिएशन ऑनकॉलॉजी केंद्र हे जालना, रत्नागिरी, बारामती व धाराशीव येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात येणार आहे, तर अमरावती व नाशिक येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये रेडियोथेरेपी आणि डे केअर किमोथेरेपी केंद्र उभारण्यात येणार आहे. रेडिएशन ऑनकॉलॉजी केंद्र, रेडियोथेरेपी आणि डे केअर किमोथेरेपी केंद्र हे टर्न की तत्त्वावर उभारण्यात येईल.
जालना, रत्नागिरी, बारामती व धाराशीव येथे रेडिएशन ऑनकॉलॉजी केंद्र तसेच अमरावती व नाशिक येथे रेडियोथेरेपी आणि डे केअर किमोथेरेपी केंद्र, कर्करोगावरील उपचार आणि काळजी पुरविणारे केंद्र उभारण्याचे काम केंद्र सरकारचा अंगिकृत उपक्रम आणि केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग यांचा उपक्रम असलेले हॉस्पिटल सर्व्हिसेस कन्सलटन्सी कॉर्पोरेशन लिमिटेड (एचएससीसी लिमिटेड) या कंपनीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. हॉस्पिटल सर्व्हिसेस कन्सलटन्सी कॉर्पोरेशन लिमिटेड (एचएससीसी लिमिटेड) ही कंपनी या सहा जिल्ह्यांमधील कर्करोग उपचारावरील केंद्रांचे बांधकाम सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर पूर्ण करून देणार आहे. या केंद्रांमुळे सहा जिल्ह्यातील रुग्णांना त्यांच्या घराजवळ उपचाराची सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. यामुळे मुंबई, पुणे यासारख्या शहरातील रुग्णालयांवर पडणारा ताण कमी होऊ शकेल.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



