
Satara : चार वेळा मुख्यमंत्री, केंद्रात मंत्री, अनेक वर्षे सत्तेत प्रमुखपदी असताना शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही. उलट त्यांनी १९९४ मध्ये काढलेल्या अधिसूचनेने मराठा समाजाला आरक्षणाचे दरवाजे बंद करून ठेवले असल्याचा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना केला.
सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावर उदयनराजे बोलत होते. ते म्हणाले, की गेल्या पंच्चाहत्तर वर्षात पवार हे किमान ६५ वर्षे सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत. मग एवढा प्रदीर्घ काळ सत्ता उपभोगत असताना या समाजाचे दु:ख पवारांना समजले नाही का ? या कालावधीत त्यांनी समाजाला आरक्षण देणे शक्य असताना ते का दिले नाही. उलट १९९४ मध्ये काढलेल्या अधिसूचनेने मराठा समाजाला आरक्षणाचे दरवाजे बंद करून ठेवले. आज या विषयावर सर्वत्र गोंधळ सुरू असताना पवारांना हे प्रश्न कुणीही विचारत नाही. स्वत:ला ‘जाणता राजा’ म्हणवून घेणाऱ्या पवारांनी या प्रश्नांची उत्तरे समाजाला दिली पाहिजेत. त्यांनी मुद्दामहून केलेल्या दुर्लक्षामुळे समाज आज या स्थितीला आला आहे. यास सर्वस्वी पवार जबाबदार असल्याचा आरोप उदयनराजे यांनी केला. पवार सध्या अनेक ठिकाणी प्रचारासाठी जात आहेत. या वेळी त्यांनी वरील प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असेही उदयनराजे म्हणाले.
|
|
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या नव्या मागण्यांबाबत मतभेद व्यक्त करत उदयनराजे म्हणाले, की तुम्ही प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करत आहात की तयार करण्यासाठी. समाजाला काहीतरी मिळावे यासाठी आंदोलन असते. आंदोलनाच्या निमित्ताने सगळ्या समाजाचा राजकीयदृष्ट्या वापर सुरू आहे. निवडणुका येतील जातील परंतु या चुकांचे परिणाम भविष्यात संबंधितांना भोगावे लागतील. गंमत अशी, की एवढे वर्षे पवार सत्तेत असताना ही अशी आंदोलने होत नव्हती. ते विरोधी पक्षात गेले, की लगेच ही अशी आंदोलने कशी सुरू होतात. हा सारा प्रकार समाजदेखील पाहात आहे. जनतेला हे कळत नाही असे समजू नका. याचे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे असल्याचा टोला उदयनराजे यांनी लगावला.
महायुतीच्या माध्यमातून राज्यात अनेक विकासाची कामे मार्गी लागली आहेत. नव्या योजना कार्यान्वित झाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून येऊन महायुतीचे सरकार येईल. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आपण राज्यभर फिरणार असल्याचे उदयनराजे यांनी या वेळी जाहीर केले.
माझे बंधू शिवेंद्रसिंहराजे भोसले हे राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून येतील. त्यांच्यासाठी गावोगावी जाऊन प्रचार करणार आहे. आम्ही दोघांनी केलेल्या कामांच्या जीवावर मतदार त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देतील, असेही उदयनराजे म्हणाले.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



