
Mumbai : उंदरांना पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोंदपट्ट्या या अमानवी आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींविरोधात असल्याचे जाहीर करून भारतीय प्राणी कल्याण मंडळाने त्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. मात्र ही बंदी मनमानी आणि कोणत्याही योग्य मूल्यांकनाविना घालण्यात आल्याचा दावा दोन कंपन्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत केला आहे. तसेच बंदीबाबतचे ऑगस्ट २०११ सालचे परिपत्रक रद्द करण्याची मागणीही केली आहे.
गोंदपट्ट्या आणि इतर कीटक नाशक उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या गोमट्री ट्रॅप्स आणि अर्बुडा ॲग्रोकेमिकल्स या कंपन्यांनी ही याचिका केली आहे. त्याचप्रमाणे, आपल्या याचिकेवर निर्णय दिला जाईपर्यंत भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या परिपत्रकावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. गोंदपट्ट्यांवरील बंदीमुळे आपल्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम होत असून आपण उत्पादित केलेल्या गोंदपट्ट्या या कीटक नियंत्रणासाठी प्रभावी आणि आवश्यक उपाय असल्याचा दावा कंपन्यांनी याचिकेत केला आहे. याशिवाय, एप्रिल २०२४ मध्ये आपण या गोंदपट्ट्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांबाबतचा सामग्री सुरक्षा तपशीलही सादर केला होता, असा दावा देखील याचिकाकर्त्या कंपन्यांनी केला आहे.
|
Pune : शरद पवारांनी राज्याला विकासापासून दूर ठेवले – उदयनराजे |
दरम्यान, अखिल भारत कृषी गौ सेवा संघातर्फे या प्रकरणी हस्तक्षेप याचिका दाखल करून गोंदपट्ट्या वापरावरील बंदीचा आदेश लागू करण्याची मागणी केली आहे. गोंदपट्ट्या या उंदीर पकडण्याचा सर्वात अमानवीय मार्ग असल्यामुळे उंदीर गंभीररित्या जखमी होतात किंवा त्यांचा मृत्यू होतो. या गोंदपट्ट्या अन्य प्राणी, पक्षी आणि लहान वन्यजीवांना देखील हानी पोहोचवू शकतात, असा दावा संस्थेने गोंदपट्ट्यांवरील बंदी लागू करण्याचे आदेश देण्याची मागणी करताना केला आहे. तसेच याच कारणास्तव लंडन, अमेरिका, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये गोंदपट्ट्या वापरावर बंदी असल्याचा दावाही संस्थेने केला. या राष्ट्रांनी कीटक नियंत्रणासाठी काही मानवीय पर्याय स्वीकारले आहेत. इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या इस्लामी देशांतही गोंदपट्ट्यांच्या अमानवी स्वरूपामुळे त्यांच्यावर बंदी घातली असल्याचे संस्थेने याचिकेत नमूद केले आहे.
शहर
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
महाराष्ट्र
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
























Subscribe to my channel



