
Bangladesh : बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार (Bangaladesh Violence) उफाळला आहे. या हिंसाचारामध्ये आतापर्यंत ९० जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये १४ पोलिस (Bangaladesh Police) कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हिंसाचारामुळे बांगलादेशमधील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. अशामध्ये रविवारी भारत सरकारने बांगलादेशमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. भारताने आपल्या ॲडव्हायझरीत आपल्या नागरिकांना पुढील माहिती मिळेपर्यंत बांगलादेशात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी बांगलादेशच्या विविध भागात सुरक्षा दल आणि सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. यानंतर झालेल्या चकमकीत १४ पोलिसांसह ९० जणांचा मृत्यू झाला. बांगलादेशमध्ये नागरिकांनी आंदोलन करत पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावरूनच आता बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरू आहे.
|
Pune : पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सुमारे दीड हजार नागरिकांचे स्थलांतर |
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) एकॲडव्हायझरी जारी केली आहे. त्यानुसार, 'बांगलादेशमध्ये सध्या सुरू असलेला हिंसाचार लक्षात घेता, भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत बांगलादेशमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या बांगलादेशमध्ये असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काही अडचणी असल्यास ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात राहावे असा सल्ला देण्यात आला आहे.
बांगलादेशातील वादग्रस्त नोकरी कोटा योजनेच्या विरोधात गेल्या महिन्याापासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाले. या आंदोलनाचे रूपांतर सरकारविरोधी आंदोलनात झाले आहे. २५ जुलै रोजी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, बांगलादेशातील परिस्थिती लक्षात घेता सुमारे ६,७०० भारतीय विद्यार्थी बांगलादेशात परतत आहेत. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क यांनी रविवारी सांगितले की, 'बांगलादेशमधील हिंसाचार संपला पाहिजे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या हजारो बांगलादेशी आंदोलकांवर रविवारी सरकारी समर्थकांनी हल्ला केला. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!

























Subscribe to my channel


