
Pune : पुणे शहरात गेल्या आठवड्यात झालेल्या पुरामुळे पुणे शहर, हवेली तालुका आणि पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे १३ हजार पूरग्रस्तांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरित पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहेत. दुसरीकडे, जिल्ह्यातील १८० गावे बाधित झाली असून, त्यातील ५७४ हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पुणे शहरात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) परिसरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरल्यामुळे सुमारे साडेचार हजार नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. जिल्हा प्रशासनाने तहसीलदारांच्या मदतीने नुकसानग्रस्त भागातील पूरग्रस्तांचे पंचनामे केले आहेत. सर्व पंचनामे पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारकडे अंतिम प्रस्ताव पाठवला जाईल.
जिल्ह्यात ५७४ हेक्टरचे नुकसान
पुणे शहरासह जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १८० गावांना पूरस्थितीचा फटका बसला असून, १६६१ शेतकरी बाधित झाले आहेत. एकूण ५७४.९१ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. हे प्रमाण ३३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. सोयाबीन आणि भात पिकांना मोठा फटका बसला आहे. ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या भागांत पुणे शहर, हवेली, तसेच पिंपरी-चिंचवड आणि भोर तालुक्यांतील भागांचा समावेश आहे.
|
|
९० टक्के घरी परतले
अतिवृष्टीमुळे पुण्यातील अनेकांच्या घरांत पुराचे पाणी शिरून कागदपत्रे वाहून गेली आहेत. त्यामुळे त्या नागरिकांना नवीन कागदपत्रे तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुणे शहर आणि हवेली तहसील कार्यालयांत १४ मदत केंद्रे सुरू केली आहेत. आधार कार्ड आणि अन्य कागदपत्रांचीही पूर्तता केली जात आहे. अस्वच्छता, दुर्गंधी दूर करण्यासाठी औषधे फवारण्यात आली असून, स्थलांतरितांपैकी ९० टक्के नागरिक घरी परतले आहेत, असेही जिल्हा प्रशासनाने सांगितले.
मदतीसाठी अटी शिथिल?
शहरातील पूरग्रस्तांना आर्थिक मदत देण्यासाठी आता काही अटी शिथिल करण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरू आहेत. त्यानंतर तातडीने पूरग्रस्तांना मदत देण्यात येणार आहे. कोणत्याही अटीचा अडथळा न येता पूरग्रस्तांना सहाभूनुभूतीपूर्वक मदत करण्याचा सरकारचा विचार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘पूरग्रस्तांना भरीव मदत द्या’
‘मुठा नदीकाठच्या पूरग्रस्तांना राज्य सरकारने पाच हजार रुपयांची अपुरी मदत न देता नुकसानीच्या प्रमाणात भरीव मदत द्यावी आणि मदतीचे वाटप त्वरित व्हावे,’ अशी मागणी माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे. अनेक भागांत पाणी शिरल्याने छोटे दुकानदार आणि रहिवासी यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रापंचिक साहित्य वाहून गेले आहे, याकडे जोशी यांनी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना दिलेल्या निवेदनात लक्ष वेधले आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



