
Pune : प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणातील धागेदोरे खोलवर पोहोचल्याने देशातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची लॉबी अस्वस्थ झाली आहे. खेडकरांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘त्या’ आयएएस झाल्याच्या तक्रारींचा ओघ वाढल्याने दिल्लीतील नोकरशहा आणि भाजपचे नेते अस्वस्थ आहेत. ‘डॅमेज कंट्रोल’साठीच पूजा खेडकर यांच्यावर लवकरात लवकर कारवाई होण्याची शक्यता आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी राज्य सरकारला खेडकर यांच्यासंदर्भात दिलेल्या अहवालामागे नेमकी कोणती भूमिका होती, याचाही अहवाल केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने ‘पीएमओ’ कार्यालयास पाठविल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणासाठी आलेल्या पूजा खेडकर यांनी केलेल्या उद्दामपणातून त्यांची निवड कशी झाली, याच्या अनेक सुरस कथा समोर येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारला पाठविलेल्या अहवालाला पाय फुटले आणि त्यानंतर खेडकर यांच्या पदवी प्रमापणपत्रापासून ते संपत्तीपर्यंतची माहिती आपसूक ‘व्हायरल’ झाली. त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) स्पर्धा परीक्षेसह निवड पद्धतीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
|
Sangli : कृष्णेचा औदुंबरच्या दत्तमंदिरात शिरकाव, वारणाकाठी सतर्कतेचा इषारा |
राज्य सरकारसह ‘पीएमओ’ कार्यालयानेही या प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःहून पूजा खेडकर यांच्या संदर्भातील माहिती बाहेर पोहोचविली की ती बाहेर काढण्यात आली, यामागे नेमका कोणाचा हात आहे, कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत किंवा खेडकर प्रकरण बाहेर काढण्यात कोणाचे राजकीय डाव-प्रतिडाव असावेत का याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
सध्या या प्रकरणाशी संबंधित राज्यातील राजकीय नेत्यांवरही ‘वॉच’ ठेवण्यात येत आहे. डॉ. दिवसे यांनी खेडकर प्रकरणात घेतलेली भूमिका योग्य आहे की नाही; तसेच खेडकर यांची चूक झाली किंवा कसे याबाबतचा अहवाल गुप्तचर यंत्रणेने ‘पीएमओ’ कार्यालयाला पाठवला आहे. केवळ सरकारला माहिती देणे, एवढाच हेतू डॉ. दिवसे यांचा असल्याचे त्यात म्हटले आहे. खेडकर प्रकरणात कारवाई करून हे प्रकरण शांत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
अधिकाऱ्यांच्या तक्रारींचा दिल्लीत पूर
पूजा खेडकर प्रकरणामुळे देशात बनावट कागदपत्रांच्या आधारे अथवा वशिलेबाजीने ‘आयएएस’ झालेल्या अधिकाऱ्यांबाबत तक्रारींचा ओघ दिल्लीत वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह दिल्लीतील भाजप नेत्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे, असे खात्रीलायकरीत्या सांगण्यात येत आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



