Konkan Politics : नारायण राणे असाे अथवा... लाेकसभा निवडणुकीत विनायक राऊतांची हॅट्रीक निश्चित : राजन साळवी

Konkan Politics : एसीबीकडून माझ्यावरती दाखल झालेला गुन्हा हा चुकीच्या पद्धतीने नाेंदविला गेला आहे. मला न्याय मिळावा यासाठी मी उच्च न्यायालय, सर्वाेच्च न्यायालयात जाणार असल्याची भावना उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आमदार राजन साळवी यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली. मुंबई उच्च न्यायालयात राजन साळवी यांच्या कुटुंबाला अंतरिम जामीन मिळाल्यानंतर त्यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना एसीबीच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. 

आमदार राजन साळवी म्हणाले मी राजकारणामध्ये असताना माझ्यावरती आरोप करणे हे मी समजू शकतो. परंतु कुटुंबीयांवरती गुन्हा दाखल करणे ही दुर्देवाची बाब आहे. रत्नागिरी जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळाला आहे.

Maharashtra Band : महाराष्ट्र बंदला उस्फुर्त प्रतिसाद; बीड मार्केटमध्ये शुकशुकाट, नांदेडमध्ये कडकडीत बंद

सत्यमेव जयते असे म्हणत साळवी यांनी न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे. एका व्यक्तीने दिलेल्या अर्जावरून माझ्यावर कारवाई झाली. अर्ज आल्यानंतर त्याची खातर जमा करणे आवश्यक हाेते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले एखाद्या व्यक्तीच्या अर्जावरून माझ्या कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणे योग्य नाही. माझ्यावरती दाखल झालेला गुन्हा हा चुकीच्या पद्धतीने नाेंदविला गेला आहे. माझ्यावरती झालेल्या चुकीच्या कारवाईबाबत मी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये देखील जाणार आहे.

विनायक राऊत खासदारकीची हॅट्रिक हाेणारच

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण  यांनी घेतलेला निर्णय हा दुर्दैवी आहे असेही एका प्रश्नाला उत्तर देताना साळवींनी स्पष्ट केले. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत विनायक राऊत पुन्हा एकदा हॅट्रिक करतील असा विश्वास साळवी यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीत नारायण राणे  किंवा त्यांचे पुत्र असू दे अथवा शिंदे गटाचे उमेदवार असू दे विजया आमचाच आहे असेही राजन साळवींनी नमूद केले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *