
Mumbai : दृश्यमानता प्रमाणापेक्षा खूपच कमी असल्यामुळे बारामती विमानतळावर उतरण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, असा प्राथमिक निष्कर्ष हवाई अपघातांचा तपास करणाऱ्या संस्थेने (एएआयबी) काढला आहे.
AAIB चा प्राथमिक अहवाल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला २८ जानेवारीला अपघात झाला. या दुर्घटनेत पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेचा तपास ‘एएआयबी’कडे सोपवण्यात आला होता. अपघाताला एक महिना पूर्ण होत असतानाच शनिवारी या संस्थेने प्राथमिक तपास अहवाल जाहीर केला. बारामती येथे धावपट्टीवरील फिकट होत चाललेल्या खुणा आणि धावपट्टीच्या पृष्ठभागावर सैल खडी याकडे बोट दाखवताना ‘एएआयबी’ने नियंत्रण नसलेल्या विमानतळांवर उड्डाणे करणाऱ्या सर्व ऑपरेटरना निर्धारित मानक कार्यपद्धतींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) जारी करावेत, अशी शिफारस केली आहे.
पायलटचे शेवटचे शब्द काय?
‘एएआयबी’ने २२ पानांच्या अहवालात म्हटले आहे, विमानतळाकडे येताना वैमानिकांनी दृश्यमानतेविषयी विचारले होते. त्यावेळी नियंत्रण कक्षाकडून ३००० मीटर असल्याचे उत्तर मिळाले. लॅण्डिंगला परवानगी देताना हवा साधारण असल्याचे नियंत्रण कक्षाने म्हटले होते. मात्र, व्हीएफआर विमानासाठी दृश्यमानता प्रमाणापेक्षा कमी होती. बारामती विमानतळाच्या धावपट्टीच्या डाव्या बाजूला विमान जमिनीवर आदळले. त्यावेळी वैमानिकांचे अखेरचे शब्द ‘ओह **... ओह **’ असे होते’.
अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्ड (एनटीएसबी) यांच्या सहकार्याने विमानातील सॉलिड स्टेट कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर (एसएससीव्हीआर) डाऊनलोड केला जाईल. सॉलिड स्टेट फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील (एसएसएफडीआर) डेटा डाऊनलोड करण्यात आला असून त्याचे विश्लेषण सुरू असल्याचे ‘एएआयबीने’ स्पष्ट केले आहे.
‘तपासाच्या कोणत्याही टप्प्यावर जेव्हा विमान वाहतूक सुरक्षितता वाढविण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित करणे आवश्यक आहे असे वाटेल तेव्हा ते सुरक्षा शिफारशी जारी करू शकतात’, असे एएआयबीने म्हटले आहे.
अहवालातील ठळक मुद्दे
- दोन्ही वैमानिकांनी या आधीही बारामती विमानतळापर्यंत प्रवास केला होता. त्यामुळे त्यांना परिसराची, विमानतळाची माहिती होती.
- दोन्ही वैमानिकांनी याआधी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी वैमानिक म्हणून भूमिका पार पाडली होती. यामध्ये इतर अनियंत्रित विमानतळांचा समावेश होता. तसेच बारामतीचाही समावेश होता.
- विमानतळावर विंडसॉकशिवाय दिशादर्शनासाठी सुविधा उपलब्ध नाही. या धावपट्टीवर दोन विंडसॉक असून दोन्ही विंडसॉक रनवे २९ च्या बाजूला आहेत. ११ च्या दिशेला एकही विंडसॉक नाही.
- बारामती विमानतळावर विमान बचाव आणि अग्निशमन यंत्रणा नाही. त्यासाठी बारामती महापालिकेकडून मदत घ्यावी लागते.
- रनवे रिकार्पेटिंग ही प्रक्रिया विमानतळ देखभालीच्या दृष्टीने महत्त्वाची असते. ही प्रक्रिया बारामती विमानतळावर मार्च २०१६ मध्ये केली होती. त्यानंतर ही प्रक्रिया झालेली नव्हती. त्यामुळे संपूर्ण धावपट्टीवरील खुणा या पुसट झाल्या होत्या. धावपट्टीवर खडी आढळून आली.
- विमानतळाभोवती सुरक्षा भिंत नाही. सध्याचे कुंपण अपुरे असून संपूर्ण विमानतळाभोवती नाही.
- बारामती विमानतळावर हवामानाशी संबंधित माहिती देणारी सुविधा नाही.
- विमान धावपट्टी ११ वर उतरण्याचा प्रयत्न करत असताना धावपट्टीच्या डाव्या बाजूला नियंत्रण सुटल्याने आदळले.
- गावातील सीसीटीव्ही दृश्यांवरून हे विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी उजवीकडे वळल्याचे दिसून येत नाही.
- जमिनीवर आदळण्यापूर्वी उतारावरच्या झाडांवर विमान आदळले.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




