‘सार्वभौमत्व’ हा या वर्षातील सर्वाधिक वापरला जाणाराशब्द ठरू शकतो. ट्रम्प यांनी याला चलनात आणले आहे.जागतिकीकरणावर गेल्या तीन दशकांपासून जे एकमत झालेहोते, ते त्यांनी मोडून काढले आहे. त्या सहमतीने मित्र-देशआणि सहकाऱ्यांसोबतच्या आघाडीत आपले सार्वभौमत्वसामायिक करण्याचे फायदे दाखवले होते. परंतु, ट्रम्प यांनीकॅनडापासून भारतापर्यंत प्रत्येक देशाला सार्वभौमत्वाचेमहत्त्व पुन्हा समजून घेण्यास भाग पाडले . याला तुम्ही आपल्या वसाहतवादी इतिहासाशी जोडूनपाहू शकता किंवा पाश्चात्त्य देशांच्या (अमेरिका)दबावाशीही जोडू शकता, कारण पाकिस्तान त्यांचासहकारी बनला होता. 1974 आणि 1998 मध्येपोखरणमधील अणुचाचण्यांनंतर आपल्यावर आर्थिकनिर्बंध लादले गेले आणि आपल्याला तंत्रज्ञानापासून वंचितठेवले गेले. आपल्या अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांवर‘रोखा, मागे घ्या आणि संपवा’ या काळातील जो दबावपडला, तो अमेरिकेच्या बाजूनेच होता. सार्वभौमत्वाबाबतभारतात जो व्यापक विचार होता, त्याकडे अमेरिका-विरोधम्हणून पाहिले जाऊ लागले. या अनुभवाने अशाराष्ट्रवादाला जन्म दिला, जो मजबूतही होता आणिअमेरिकेबद्दल संशयाने भरलेलाही. ‘विदेशी हात’ यालानेहमीच अमेरिकेचा हात मानले गेले. त्याचे विरोधक,म्हणजेच सोव्हिएत युनियन आणि त्यांचे सोबती, भारताचेनैसर्गिक मित्र मानले गेले. परंतु हे तोपर्यंतच राहिले, जोपर्यंत1990-91 मध्ये सोव्हिएत युनियन संपुष्टात आले नाही.तेव्हापासून भारत या नवीन, एकध्रुवीय जगात स्वतःसाठीजागा बनवण्याच्या प्रयत्नात आहे. याचा परिणाम असाझाला की भारत हळूहळू पश्चिमेकडे झुकत गेला. भारताचाप्रत्येक नेता या विवंचनेचा सामना करत आला आहे की,शीतयुद्धानंतरच्या जगात कोणत्याही एका गटात न जातासंबंध कसे प्रस्थापित करावेत.
भारताचा तणावपूर्ण शेजार त्याच्या धोरणात्मक पर्यायांना मर्यादित करतो. ही भारताची दुहेरी कोंडी आहे. पाकिस्तानसोबतचे संबंध नेहमीच तणावाचे असतात आणि चीनकडून नेहमीच धोका असतो. अमेरिकेची इच्छा आहेकी भारताने एकाच वेळी अनेक आव्हाने पेलावीत. तथापि भारतासाठी चीन-पाकिस्तान युती हे अधिक मोठे आव्हान आहे. याला दुहेरी कोंडी यासाठी म्हटले जाते, कारण भारताला आपले सैन्य नेहमीच सज्ज ठेवावे लागते. बरेचसे लष्करी साहित्य रशियन बनावटीचे आहे आणि या अवलंबित्वेतून लगेच सुटका होऊ शकत नाही. याशिवाय भारताच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये, जसे की अणु पाणबुडी (एसएसएन), रशियाची मोठी भूमिका आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, दोन आघाड्यांवरचा संघर्ष टाळण्यासाठीभारताला चीनसोबतही संबंध टिकवून ठेवावे लागतात, मग यासाठी व्यापारात काही तडजोडी का कराव्या लागेनात. संबंध टिकवून ठेवण्याचा अर्थ असा आहे की भारत युक्रेनच्या मुद्द्यावर रशियाविरुद्ध फार कठोर भूमिका घेऊ शकत नाही किंवा ट्रम्प यांच्या त्या दाव्याची उघडपणे पुष्टीकरू शकत नाही की भारताने रशियाकडून तेल खरेदी करणेबंद केले आहे. ही परिस्थिती गुंतागुंतीची आहे, कारण युक्रेन युद्धापूर्वी जेव्हा युरोप व अमेरिकेला वाटत होते की भारताने रशियाकडून तेल खरेदी करावे, जेणेकरून जागतिक किंमत संतुलित राहील, तेव्हा भारत त्यातून खूप कमी तेल खरेदीकरत असे. त्या काळी रशियाचे तेल भारताच्या ऊर्जासुरक्षेसाठी आवश्यक आहे, असेही म्हटले जात नसे. पणआता परिस्थिती उलट आहे. आज जनमताचा दबाव आहेकी रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली जावी आणिसांगितले जावे की आम्ही एक सार्वभौम देश आहोत.
भारताच्या मागील सरकारांनी अमेरिकन दबावाकडेदुर्लक्ष केले होते आणि इंदिरा गांधींनी रिचर्ड निक्सन आणिहेन्री किसिंजर यांचा खंबीरपणे सामना केला होता, याचीआठवण काढली जाते. पण हे पूर्ण सत्य नाही. दुसरे सत्य हेआहे की इंदिरा गांधी दुसऱ्या गटाच्या, म्हणजेच सोव्हिएतयुनियनच्या जवळ गेल्या होत्या. आपले सरकारवाचवण्यासाठी त्यांना कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा हवा होता,म्हणून 1969 नंतर भारताचा कल सोव्हिएत युनियनकडेवाढला. 9 ऑगस्ट 1971 रोजी भारत सोव्हिएत युनियनचासहकारी बनला. हा करार खूप मजबूत नव्हता, परंतु यातपरस्पर सुरक्षेची बाब समाविष्ट होती. याचा फायदा तेव्हाझाला जेव्हा अमेरिकेचा ‘सातवा ताफा’ भारतावर दबावटाकण्यासाठी आला होता. सोव्हिएत युनियनने संयुक्तराष्ट्रात ‘व्हेटो’ केला आणि भारताला लष्करी साहित्यलवकर उपलब्ध करून दिले, ज्यात पोलंडमधून आलेलेटी-55 टँकही समाविष्ट होते. त्याच वेळी, अमेरिकेचा नवीनसहकारी चीन पाकिस्तानला शस्त्रे पुरवत होता. 1971च्या विजयाने इंदिरा गांधी आणि भारत दोघांची प्रतिष्ठावाढवली आणि निक्सन सरकारला लाजवले, पण याचाअर्थ असा होता का की भारत पूर्णपणे सार्वभौम झालाहोता? नाही. भारताला अनेक प्रकरणांमध्ये सोव्हिएतयुनियनचे समर्थन करावे लागले, जसे की कंबोडिया आणिअफगाणिस्तानच्या मुद्द्यावर. अफगाणिस्तानमुळेभारतासमोर नवीन धोरणात्मक समस्या निर्माण झाल्या.यामुळे अमेरिका-पाकिस्तान संबंध मजबूत झाले, जिहादीसंस्कृती वाढली आणि पाकिस्तान अणुशक्ती बनला. 1969 ते 1989 दरम्यान भारताने आपल्या सार्वभौमत्वाशीतडजोड केली का? उत्तर आहे- नाही. सार्वभौमत्व हा काहीकायमस्वरूपी शिक्का नसतो. अमेरिका असो वा चीन,प्रत्येक देशासाठी सार्वभौमत्वाचा अर्थ आपले निर्णयघेण्याचे स्वातंत्र्य आहे. शीतयुद्धात भारताने सोव्हिएतयुनियनशी संबंध जपले. नंतर अमेरिकेसोबत संबंधसुधारले, रशियासोबतचे संबंध कायम ठेवले, चीनसोबतस्थिरतेचा प्रयत्न झाला आणि पाकिस्तानचा सामनाकरण्याची शक्ती वाढवली गेली. पाहिले तर कोणताही देशपूर्णपणे सार्वभौम नसतो. सर्वजण आपले निर्णय आणिकरार करतात. आज जग एकमेकांवर अवलंबून आहे, जिथेसार्वभौमत्वाकडे लवचिक पद्धतीने पाहावे लागते. सर्व देशनवीन आघाड्या बनवत आहेत आणि आपल्या हितानुसारनिर्णय घेत आहेत. एकदा मी माकप नेते हरकिशनसिंहसुरजित यांना विचारले की, तुम्ही त्या सरकारांना पाठिंबाका देता जे अमेरिकेशी संबंध सुधारतात? त्यांनी उत्तर दिले:भारताला तंत्रज्ञान हवे आहे. पूर्वी हे सोव्हिएत युनियनकडूनमिळायचे, आता मिळत नाही. म्हणून आता अमेरिकेचीगरज आहे. आपण आपल्या राष्ट्रीय हितानुसार काम केलेपाहिजे. सार्वभौमत्वावर हा एक महत्त्वाचा धडा आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) विचारधारा आणि नैतिकतेचेमहत्त्व आता कमी झाले आहे.कोणताही देश पूर्णपणे सार्वभौम नसतो.सर्वजण आपले निर्णय आणि करारकरतात. आज जग एकमेकांवर अवलंबूनआहे. जगातील सर्वच देश आता नवीनआघाड्या बनवत आहेत आणि आपल्याहितानुसार निर्णय घेत आहेत. विचारधाराआणि नैतिकतेला आता पूर्वीसारखे महत्त्वउरलेले नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



