भारतात आजही मोठ्या प्रमाणात लोक ट्रेनने प्रवास करतात. खरंतर रेल्वेही कोट्यवधी लोकांची लाईफलाईन आहे. आपण रोज या रेल्वेतून प्रवास करतो. रेल्वे रुळ बघतो. पण रेल्वे रुळांमध्ये फट का असते? याचा कधी विचार केला का? असं का करत असतील? त्याशिवा प्लॅटफॉर्म रिकामे दिसत असले तरी ट्रेन स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी आउटर सिग्नलवर थांबते. असे का होते? असे नानाविध प्रश्न काहींच्या मनात पडलेले असतात. पण त्यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत. ही कारणं प्रत्येकाला माहीत हवीतच.
तुम्ही कधी ट्रेनने प्रवास करताना, रेल्वे फाटक ओलांडताना किंवा स्टेशनवर उभे असताना रुळांकडे लक्षपूर्वक पाहिले आहे का? आणि जर पाहिले असेल, तर तुम्ही पाहिले असेल की काही अंतरावर रुळांना जोडून ट्रॅक तयार केला जातो. कारण खूप लांब पटरी एकाच तुकड्यात तयार करणे शक्य नसते, त्यामुळे अनेक भागांना जोडून ट्रॅक बनवला जातो.
रेल्वे रूळांमध्ये फट का ठेवतात?
जर तुम्हाला वाटत असेल की रेल्वेच्या पटऱ्यांमधील ठेवलेली फट ही फक्त रिकामी जागा भरण्यासाठी असते, तर तसे अजिबात नाही. ही जागा मुद्दाम आणि विचारपूर्वक ठेवली जाते. यामागे प्रवाशांच्या सुरक्षेचा महत्त्वाचा विचार केलेला असतो. लोखंडाच्या पटऱ्या थंडीत लहान होतात आणि उन्हाळ्यात उष्णतेमुळे प्रसरण पावतात (फुगतात). जर या प्रसरणासाठी मध्ये जागा ठेवली नाही, तर पटऱ्यांवर ताण येऊन त्या वाकू शकतात किंवा तडे जाऊ शकतात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढू शकतो. म्हणूनच पटऱ्यांमध्ये ठेवलेली ही छोटीशी फट अतिशय महत्त्वाची असते. तापमानातील बदलांचा परिणाम लक्षात घेऊन ही रचना केली जाते, जेणेकरून रेल्वेची हालचाल सुरक्षित आणि सुरळीत राहील.
रेल्वे रूळांमध्ये फट ठेवण्याचा मुख्य फायदा
1. रुळांमध्ये फट ठेवण्याचा मुख्य फायदा म्हणजे उष्णतेमुळे होणारा प्रसरण सांभाळणे
2. लोखंडी रुळ उन्हात तापले की त्यांची लांबी वाढते आणि थंडीत कमी होते. जर रुळांमध्ये फट ठेवली नाही, तर उष्णतेमुळे ते एकमेकांवर दाब देऊन वाकू शकतात किंवा उंचावू शकतात. त्यामुळे अपघाताचा धोका वाढू शकतो
3. म्हणूनच ही छोटी फट रुळांना सुरक्षितपणे प्रसरण-आकुंचन होऊ देते आणि रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित ठेवते
ट्रेन स्टेशनवर येण्यापूर्वी आउटर सिग्नलवर थांबण्याची मुख्य कारणे
1. प्लॅटफॉर्म मोकळा नसणे – त्या प्लॅटफॉर्मवर आधीची ट्रेन उभी असू शकते
2. रूट सेट न झालेला असणे – स्टेशनमधील पॉइंट्स (रुळ बदलण्याची व्यवस्था) अजून सेट केलेले नसतात
3. सुरक्षित अंतर राखणे – दोन ट्रेनमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक असते.
4.सिग्नल प्रणालीची प्रक्रिया – स्टेशन मास्टर किंवा कंट्रोल रूमकडून क्लिअरन्स मिळेपर्यंत ट्रेन पुढे जाऊ शकत नाही
5. क्रॉसिंग किंवा ओव्हरटेक – कधी दुसऱ्या महत्त्वाच्या किंवा जलद गाडीला आधी मार्ग दिला जातो
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



