आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 20 फेब्रुवारीला साखळी फेरीतील शेवटचा सामना होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध कॅनडा आमनेसामने असणार आहेत. त्यानंतर शनिवार 21 फेब्रुवारीपासून सुपर 8 फेरीचा थरार रंगणार आहे. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात सुपर 8 साठी प्रवेश मिळवला आहे. टीम इंडिया सुपर 8 फेरीसाठी ए ग्रुपमध्ये आहे. या ग्रुपमध्ये टीम इंडिया व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिंबाब्वेचा समावेश आहे. टीम इंडियासह वरील 4 संघ हे साखळी फेरीत अजिंक्य राहिलेत. झिंबाब्वे व्यतिरिक्त इतर 3 संघांनी साखळी फेरीतील सर्व 4 सामने जिंकले आहेत. तर झिंबाब्वेने 3 सामन्यांत विजय मिळवला आहे. झिंबाब्वेचा 1 सामना हा पावसामुळे रद्द करावा लागला होता.
साखळी फेरीतील ए ग्रुपमधील हे 4 संघ अजिंक्य आहेत. त्यामुळे हा गट ग्रुप ऑफ डेथ झाला आहे. या निमित्ताने 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना योगायोग पाहायला मिळाला आहे. या योगायोगामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.
17 वर्षांनंतर 4 संघ एकाच गटात
टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज सुपर 8 फेरीत एकत्र येण्याची दुसरी वेळ ठरली आहे. याआधी तिन्ही संघ 2009 साली झालेल्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सुपर 8 फेरीत एकत्र होते. टीम इंडियाला 2009 साली सुपर 8 मधील तिन्ही सामने गमवावे लागले होते.
तेव्हा विंडीजने भारतावर 7 विकेट्सने मात केली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर 12 धावांनी मात केली होती. तर इंग्लंडने टीम इंडिया विरुद्ध 3 धावांनी मैदान मारलं होतं. सलग 3 पराभवांमुळे भारतीय संघाला तेव्हा स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं होतं. तेव्हा टीम इंडिया गतविजेता होती. त्यामुळे भारतीय संघासाठी तो मोठा झटका होता.
त्यानंतर आता तिन्ही संघ सुपर 8 फेरीत एकत्र आले आहेत. त्यामुळे टीम इंडियाची चिंता वाढली आहे. मात्र आता टीम इंडिया अजिंक्य आहे. टीम इंडियासमोर आता सुपर 8 फेरीत झिंबाब्वेचं आव्हान असणार आहे. झिंबाब्वेने या मोहिमेत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला पराभवाचा झटका दिला आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर सुपर 8 मध्ये झिंबाब्वेचंही कडवं आव्हान असणार आहे.
टीम इंडियाचं सुपर 8 फेरीतील आव्हान
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 22 फेब्रुवारी, अहमदाबाद
टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे, 26 फेब्रुवारी, चेन्नई
टीम इंडिया विरुद्ध विंडीज, 1 मार्च, कोलकाता
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



