मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर अवघ्या महिन्याभरात ठाकरे बंधुंच्या युतीमध्ये दुरावा दिसू लागला आहे. यामागे काही कारणं आहेत. आता ठाकरे बंधुंच्या युतीत मिठाचा खडा पडलाय का? अशी चिन्हं दिसू लागली आहेत, चर्चा आहे. याचं प्रमुख कारण आहे, मुंबई महापालिकेवर होणारी स्वीकृत नगरसेवकांची निवड. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाचे 65 नगरसेवक निवडून आलेत. त्यानुसार उद्धव ठाकरे गटाला तीन स्वीकृत नगरसेवक मिळणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युती करुन लढवली होती. त्यामुळे एक स्वीकृत नगरसेवक पद मनसेला मिळेल अशी चर्चा होती.
पण जी माहिती मिळतेय त्यानुसार मुंबई महापालिकेत तिन्ही स्वीकृत नगरसेवक उद्धव ठाकरे गटाचेच असणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी महापालिकेतील गट नेत्याच्या माध्यमातून या तीन स्वीकृत नगरसेवकांची नाव महापौरांना कळवली आहेत. साईनाथ दुर्गे, कैलास पाठक आणि माधवी मांजरेकर अशी ही तिन्ही नाव आहे. त्यामुळे मनसेला उद्धव ठाकरे गट स्वीकृत नगरसेवक पद सोडणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळेच ठाकरे बंधुंच्या युतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा रंगली आहे.
भेटीचे पडसाद उमटले
महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या भाषणाचा फायदा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला झाला. त्यांचे 65 नगरसेवक निवडून आले. पण मनसेला विशेष फायदा झाला नाही. त्यांचे फक्त सहा नगरसेवक निवडून आले. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कल्याण-डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. नाशिकमध्ये मनसेने शिंदे यांच्या शिवसेनेला साथ दिली. नुकतीच राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या घडामोडींचे पडसाद ठाकरे बंधुंच्या युतीमध्ये उमटले आहेत.
एकत्र युतीमध्ये
मागच्या महिन्यात मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. मनसे, उद्धव ठाकरे शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत एकत्र येत निवडणूक लढवली होती. मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र युतीमध्ये आहे.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


