सातारा: मी कायमचा निरोप घेतोय.. साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयातील लिपिक कामाच्या ताणामुळे रात्रभर बेपत्ता झाल्याने खळबळ, नंतर आला समोर!

सातारा: अतिरिक्त ताण आणि रुग्णालयाबाहेरील येणाऱ्यांकडून त्रास होत असल्याचे सांगत जिल्हा रुग्णालयातील कनिष्ठ लिपिकाने गुरुवारी (दि. ३) रात्री मोबाइलवरून कायमचा निरोप घेतो असा मेसेज पाठवून फोन स्विच ऑफ करून कोणासही न सांगता तो निघून गेला. यामुळे जिल्हा रुग्णालयात खळबळ उडाली. रात्रभर त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. अखेर त्याच्याशी शुक्रवारी दुपारी संपर्क झाला असून, तो सोलापूर येथील घरी सुखरूप असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल जाधव यांनी दिली.

जिल्हा रुग्णालय, सातारा येथील वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक विभागात अजय देशमुख हे १७ जून रोजी कनिष्ठ लिपिक म्हणून रुजू झाले होते. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास त्यांच्या रूममधील सर्व सामान घेऊन ते अचानक निघून गेले. रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांनी एका ओळखीच्या व्यक्तीच्या फोनवर मेसेज पाठवला, त्यात "मी आज तुमच्या साताऱ्याचा सिव्हिल हॉस्पिटलचा व या जन्माचा कायमस्वरूपी निरोप घेतो," मी चुकलो असेल तर माफ करा, एक वेळ माफ करणारा खूप मोठा असतो," असा संदेश पाठविला होता.

अधिकाऱ्यांकडून त्रास दिला गेल्याचा गंभीर आरोप
मेसेजमध्ये अजय देशमुख यांनी रुग्णालयात रुजू होण्याच्या काही दिवस आधीचे पेंडिंग कामही त्यांच्यावर सोपविण्यात आल्याने तसेच जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या बाहेरील व्यक्तींकडून होणाऱ्या त्रासामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे नमूद मेसेजमध्ये नमूद केले आहे. वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक विभागाचा १७ जूनला कार्यभार स्वीकारला. परंतु, १६ जूनपूर्वीच्या देयकांचा निपटारा करण्याचा तगादा लावण्यात येत होता. यासाठी कार्यालयाकडून कोणतेही सहकार्य मिळत नव्हते, काही अधिकाऱ्यांकडून अप्रत्यक्ष त्रासास आपण कंटाळलो असल्याचेही म्हटले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *