कोल्हापूर: जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि पवित्र पंचगंगा नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने आता अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी कोल्हापूर आणि इचलकरंजी परिसरातील सांडपाणी समस्या आणि प्रदूषणमुक्तीच्या कामांचा सखोल आढावा घेत, २०२७ पर्यंत सर्व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP Plants) पूर्ण करण्याचे स्पष्ट आणि सक्त निर्देश दिले आहेत.
नदीपात्रात सोडले जाणारे प्रक्रिया न केलेले दूषित सांडपाणी आणि औद्योगिक कचऱ्यामुळे पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आणि संबंधित यंत्रणांना कामाला गती देण्याचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रांतर्गत सुरू असलेल्या आणि प्रलंबित असलेल्या सर्व एसटीपी (Sewage Treatment Plant) प्रकल्पांची कामे निर्धारित मुदतीत म्हणजेच २०२७ पर्यंत पूर्ण झालीच पाहिजेत, असे त्यांनी निक्षून सांगितले आहे.
औद्योगिक प्रकल्पांच्या तपासणीचे आणि अहवालाचे आदेश
केवळ सांडपाणीच नव्हे, तर औद्योगिक क्षेत्रातील रेड झोन, साखर कारखाने आणि इतर प्रदूषित क्षेत्रांमधील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची (CETPs) क्षमता आणि प्रत्यक्षात सुरू असलेला वापर याची कसून तपासणी करण्याचे निर्देशही मंत्र्यांनी दिले आहेत. या प्रकल्पांचा वापर करणे अपेक्षित असलेले औद्योगिक घटक आणि प्रत्यक्षात वापर करणारे घटक यांची पडताळणी करून येत्या आठ दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (MPCB) दिले आहेत.
२०७ कोटींचा प्रस्ताव पुनरुज्जीवन प्राधिकरणाकडे
पंचगंगा नदी खोऱ्यातील आणि नदीकाठच्या ८९ गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठी तब्बल २०७ कोटी ४७ लाखांचा एक महत्त्वाचा प्रस्ताव 'महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाकडे' पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावावरही पर्यावरण विभागाने गांभीर्याने लक्ष घातले असून, भविष्यातील लोकसंख्या वाढीचा अंदाज घेऊनच गावागावांत सांडपाणी व्यवस्थापन आणि जैविक प्रक्रिया प्रकल्प उभारले जावेत, अशी सूचना करण्यात आली आहे.
या बैठकीदरम्यान माजी खासदार राजू शेट्टी, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी चर्चेत सहभाग घेत नदी प्रदूषणाचे वास्तव मांडले. केवळ कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात प्रकल्पांची अंमलबजावणी करून पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
शहर
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- मुंबई: राष्ट्रीय विस्तारासाठी शिंदेंची मोठी रणनीती; देशभरातील १५ राज्यांत शिवसेना वाढवण्याची जय्यत तयारी!
- पुणे: दहीहंडी अन् गणेशोत्सवातील कर्णकर्कश डीजेच्या आवाजाविरोधात नागरिक आक्रमक; शांततेत सण साजरा करण्याची मागणी!
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा एल्गार! बीड आणि सोलापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प, मराठा क्रांती मोर्चाचा दणदणीत रास्ता रोको!
महाराष्ट्र
- मालेगाव: मुले तापाने फणफणली; उपचारासाठी खाटा अपुऱ्या पडल्याने रुग्णालयाच्या जमिनीवर टाकाव्या लागल्या गाद्या!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- मुंबई: राष्ट्रीय विस्तारासाठी शिंदेंची मोठी रणनीती; देशभरातील १५ राज्यांत शिवसेना वाढवण्याची जय्यत तयारी!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड

























Subscribe to my channel




