T20 WC 026: टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं गणित आता दक्षिण अफ्रिकेच्या हातात, नाही तर...Image Credit source: BCCI Twitter
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील सामने दोन गटात सुरू आहे. दोन गटातील टॉप दोन संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे या फेरीत चुरस वाढली आहे. गट 1 मध्ये भारत, दक्षिण अफ्रिका, झिम्ब्वाब्वे आणि वेस्ट इंडिज हे संघ आहेत. या चार संघात टॉप 2 मध्ये राहण्याची चढाओढ असणार आहे. प्रत्येक संघ तीन सामने खेळणार आहे. त्यामुळे उपांत्य फेरीसाठी चुरशीची लढाई असणार आहे, यात काही शंका नाही. भारताचा पहिला सामना दक्षिण अफ्रिकेशी झाला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने भारताला 76 धावांनी लोळवलं. त्यामुळे भारताच्या नेट रनरेटची पुरती वाट लागली आहे. भारताचा नेट रनरेट हा -3.800 असा आहे. त्यामुळे या नेट रनरेटमध्ये सुधारणा करायची असेल तर झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांना मोठ्या फरकाने पराभूत करणं भाग आहे. नाही तर उपांत्य फेरीचं गणित बिघडू शकतं. खरं तर भारताचा उपांत्य फेरीचा सोपा मार्ग हा दक्षिण अफ्रिकेच्या हाती आहे. कसं काय ते समजून घ्या.
दक्षिण अफ्रिकेच्या विजयावर सर्व काही अवलंबून
दक्षिण अफ्रिकेने टीम इंडियाला पराभूत केल्यानंतर आता उर्वरित दोन सामने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजशी होणार आहे. या दोन सामन्यावर भारताचं उपांत्य फेरीचं गणित ठरणार आहे. भारताची उपांत्य फेरीची वाट सहज सोपी व्हावी असं वाटत असेल, तर दक्षिण अफ्रिकेने दोन्ही सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. कारण दक्षिण अफ्रिकेने उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवला. तर भारताचं नेट रनरेटचं गणित काही राहणार नाही. मग भारताला फक्त झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला पराभूत करावं लागणार आहे. हा भारताच्या उपांत्य फेरीसाठी सोपा मार्ग राहील. दक्षिण अफ्रिकेने एकही सामना गमावला तर मात्र सर्व काही नेट रनरेटवर येईल.
जर तरचं गणित…
सुपर 8 फेरीत चार पैकी 3 संघ 2 सामने जिंकतील अशी स्थिती येऊ शकते. त्यामुळे गुण सारखे असले की नेट रनरेट पाहिला जाईल. भारताचा 76 धावांनी पराभव झाल्याने नेट रनरेटचं चित्र खूपच खराब आहे. भारताला -3.800 नेट रनरेट धन स्थितीत आणायचा असेल. तर पुढच्या सामन्यात साधारण 80–100 धावांनी विजय मिळवावा लागेल. असं झालं तर नेट रनरेट झपाट्याने सुधारेल. दुसरं धावांचा पाठलाग करता नेट रनरेट सुधारू शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर, 160 धावांचं लक्ष्य दिलं असेल तर भारताने ते 13–14 षटकात पूर्ण केलं तर नेट रनरेट सुधारेल.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

