रोहित पवार, राज्यसभा, अजितदादा पवारImage Credit source: गुगल
Rohit Pawar on Ajit Pawar: राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात राज्यातील 7 जागांचाही समावेश आहे. पुढील महिन्यात ही निवडणूक होत आहे. तर 2 एप्रिल रोजी राज्यसभेतील सध्याचे काही खासदार निवृत्त होत आहेत. महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर राष्ट्रवादीच्या विलिनीकरण झाले असते तर छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार होते असा दावा ही करण्यात येत आहे. तर या चर्चांदरम्यान आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत एक मोठा दावा केला आहे. राज्यसभेवर कुणाला पाठवायचे हे दादांनी मनात पक्कं केलं होतं, याविषयीचा खुलासा रोहित पवारांनी केला आहे.
रोहित पवारांची तिसरी पत्रकार परिषद
अजितदादांचा विमान अपघात की घातपात याविषयीवर रोहित पवार यांनी तिसरी पत्रकार परिषद नवी दिल्लीत घेतली. अपघातानंतर काही पुरावे सादर करत त्यांनी याविषयीचा मोठा दावा केला आहे. वैमानिकाचा वापर करून हा अपघात घडवून आणल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. तर त्यांनी पुन्हा एकदा केंद्रीय नागर उड्डयन मंत्री किंजरापू राममोह नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तेलगू देसमचे नेते आणि व्हीएसआर कंपनीच्या मालकाचे घनिष्ठ संबंध असल्याने तपास निष्पक्ष होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. आज त्यांनी काही खुलासे आणि पुरावे समोर आणतानाच अजितदादांच्या मृत्यूमागे घातपाताची शंका व्यक्त केली.
राज्यसभेसाठी शरद पवार यांच्या नावाचा विचार
आज दिल्लीत माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार यांनी एक मोठा खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणानंतर खासदार अमोल कोल्हे यांना प्रदेशाध्यक्ष करण्याचा विचार होता. विलिनीकरणाबाबत शरद पवार यांनी कुठलीही अट टाकली नव्हती. दादांसाठी दोन्ही पक्ष एकत्र यावे हा राजकीय प्रश्न नव्हता तर भावनिक प्रश्न होता. शरद पवारांनी राज्यसभेवर जावे अशी अजित दांदांनी इच्छा व्यक्त केली होती, असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्याचा दावा त्यांनी निकाली काढला आहे.
अमोल कोल्हे यांचा दावा काय?
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाणार होते असे अजितदादांन आम्हाला सांगितले होते असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला होता. भुजबळ हे मोठे नेते आहेत, त्यामुळे मी त्यांचा त्रागा समजू शकतो. कारण जी काही आधी चर्चा झाली होती. विशिष्ट जातीनिहाय जनगणना होत असताना ओबीसींचा कॉलम जातनिहाय जनगणनेमध्ये नाही अशा परिस्थितीत भुजबळ यांच्या सारखा एक वरिष्ठ नेता संसदेत असणं ही फार महत्त्वाची गोष्टी होती. या संदर्भात अजित पवार यांच्याशी आमची प्राथमिक चर्चा झाली होती, असा दावा खासदार अमोल कोल्हे यांनी केला. त्यानंतर आज रोहित पवारांनी वेगळाचा खुलासा केला आहे.
[embedded content]
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




