
Pune : पुण्यातील वाहतुकीसाठी पुरंदर विमानतळ खूप महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असलेल्या या विमानतळासाठी आता तब्बल 96 टक्के शेतकऱ्यांनी परवानगी दिली आहे.
या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पुरंदर विमानतळामुळे पुणे आणि परिसरातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. प्रवासी सेवेसोबतच येथे मालवाहतुकीचीही मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या प्रकल्पामुळे पुणे जिल्ह्याच्या जीडीपीमध्ये तब्बल दोन टक्क्यांची वाढ होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
|
|
पुरंदर विमानतळासाठी तालुक्यातील एकूण सात गावांना फटका बसणार होता. या गावांमधील शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध होता. मात्र आता 96 टक्के शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी संमती दिल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकताच या सात गावांतील ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. काही गावांच्या प्रतिनिधींनी सध्याच्या प्रति एकर 1 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईत वाढ करण्याची आणि अतिरिक्त लाभ देण्याची मागणी केली. तर काही प्रतिनिधींनी संपूर्ण भूसंपादनालाच विरोध दर्शवला. काही शेतकऱ्यांनी प्रति एकर 15 कोटी रुपयांचा मोबदला आणि कुणबी प्रमाणपत्रांचीही मागणी केली आहे.
दरम्यान, प्रकल्पाची माहिती देताना पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी सांगितले, “या विमानतळासाठी डोंगर कापण्याची गरज नाही. कोणत्याही नदीचा प्रवाह बदलावा लागणार नाही. जमिनीचे थर अत्यंत मजबूत असल्याने उत्खनन आणि इतर कामे वेगाने पूर्ण होतील. त्यामुळे एकदा प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर तीन ते साडेतीन वर्षांत विमानतळ पूर्ण करता येईल.”
पुढील वर्षात भूसंपादनाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष बांधकामालाही सुरुवात होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या बहुतांश अटी मान्य करण्यात आल्या असून, आता केवळ प्रति एकर मोबदल्याच्या रकमेसंदर्भात चर्चा सुरू आहे. या प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना योग्य आणि जास्तीत जास्त मोबदला दिला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला



























Subscribe to my channel




