
Pune : पुण्यातील वाहतुकीसाठी पुरंदर विमानतळ खूप महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असलेल्या या विमानतळासाठी आता तब्बल 96 टक्के शेतकऱ्यांनी परवानगी दिली आहे.
या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पुरंदर विमानतळामुळे पुणे आणि परिसरातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. प्रवासी सेवेसोबतच येथे मालवाहतुकीचीही मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या प्रकल्पामुळे पुणे जिल्ह्याच्या जीडीपीमध्ये तब्बल दोन टक्क्यांची वाढ होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
|
|
पुरंदर विमानतळासाठी तालुक्यातील एकूण सात गावांना फटका बसणार होता. या गावांमधील शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध होता. मात्र आता 96 टक्के शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी संमती दिल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकताच या सात गावांतील ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. काही गावांच्या प्रतिनिधींनी सध्याच्या प्रति एकर 1 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईत वाढ करण्याची आणि अतिरिक्त लाभ देण्याची मागणी केली. तर काही प्रतिनिधींनी संपूर्ण भूसंपादनालाच विरोध दर्शवला. काही शेतकऱ्यांनी प्रति एकर 15 कोटी रुपयांचा मोबदला आणि कुणबी प्रमाणपत्रांचीही मागणी केली आहे.
दरम्यान, प्रकल्पाची माहिती देताना पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी सांगितले, “या विमानतळासाठी डोंगर कापण्याची गरज नाही. कोणत्याही नदीचा प्रवाह बदलावा लागणार नाही. जमिनीचे थर अत्यंत मजबूत असल्याने उत्खनन आणि इतर कामे वेगाने पूर्ण होतील. त्यामुळे एकदा प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर तीन ते साडेतीन वर्षांत विमानतळ पूर्ण करता येईल.”
पुढील वर्षात भूसंपादनाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष बांधकामालाही सुरुवात होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या बहुतांश अटी मान्य करण्यात आल्या असून, आता केवळ प्रति एकर मोबदल्याच्या रकमेसंदर्भात चर्चा सुरू आहे. या प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना योग्य आणि जास्तीत जास्त मोबदला दिला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम



























Subscribe to my channel

