हिंदू धर्मात मानवी आयुष्याशी जोडलेले 16 संस्कार सांगितले गेले आहेत. त्यातील शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार. व्यक्तीच्या देहाला शेवटचा निरोप देताना हा विधी केला जातो. श्रद्धेनं आणि विधीपूर्वक केलेल्या या संस्कारामुळे आत्म्याला शांती मिळते. तसेच पुढील प्रवासासाठीचा मार्ग मोकळा होतो, अशी भावना असते. अंत्यसंस्काराच्या वेळी काही विशिष्ट नियमांचे पालन केले जाते. त्यापैकी एक महत्त्वाची प्रथा म्हणजे मुखाग्नी देण्यापूर्वी पाण्याने भरलेले मातीचे मडके फोडणे. या कृतीमागे धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. चला तर मग, या प्रथेचे महत्त्व आणि ती का पाळली जाते, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
नेमकं काय आहे कारण?
धर्मशास्त्रांनुसार, अंत्यसंस्काराच्या वेळी मृत व्यक्तीचे शरीर अग्निला अर्पण केले जाते. यालाच ‘मुखाग्नी देणे’ असे म्हणतात. मात्र त्याआधी एक विशेष विधी केला जातो. छिद्र पाडलेला मातीचा घडा पाण्याने भरून तो खांद्यावर घेतला जातो आणि चितेभोवती दक्षिण दिशेने प्रदक्षिणा घातली जाते. शेवटी एक प्रदक्षिणा घड्याळाच्या उलट दिशेने करण्याचा नियम आहे. त्यानंतर पाण्याने भरलेले मडके मागे फेकले जाते. मडके जमीनीवर आपटल्यामुळे फुटते.
त्यानंतर मृतदेहाला मुखाग्नी दिला जातो. अंत्यसंस्कारातील हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शास्त्रांनुसार, मातीचे मडके हे मृत शरीराचे प्रतीक मानले जाते. तसेच त्यामधील पाणी आत्म्याचे प्रतीक समजले जाते. प्रदक्षिणेदरम्यान मडक्यातून हळूहळू गळणारे पाणी हे शरीर आणि आत्मा यांच्यातील नाते कमकुवत होत जाऊन अखेरीस संपुष्टात येण्याचे प्रतीक मानले जाते.
मडके फोडण्यामागील धार्मिक कारण?
मडके फुटणे म्हणजे आत्म्याने शरीरापासून पूर्णपणे विलग होऊन पुढील प्रवासाला निघण्याची वेळ आल्याचे प्रतीक आहे. मानवी शरीर पंचतत्त्वांत विलीन होते, अशी श्रद्धा आहे. घडा फोडण्याची क्रिया दर्शवते की मृत व्यक्तीचे या जगातील सर्व सांसारिक संबंध आता समाप्त झाले आहेत आणि त्याने मोक्षमार्गाकडे प्रस्थान केले आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




