
Ajit Pawar : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महायुतीत लोकसभेच्या चार जागा अजित पवार गट लढवणार असल्याचे आज अजित पवारांनी जाहीर केले आहे. बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणारच आहे, असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे. सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या चार जागा आहेत. बारामती, सातारा, रायगड, शिरूर या चार जागा आहेत
अजित पवार म्हणाले, मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याचा अंदाज आहे. लोकसभेच्या निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून आणायचे आहेत
|
School Bomb Threat : 15 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी! एकाच वेळी आला ईमेल |
बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागा आपण निवडणार आहोत. इतर जागांसंदर्भात आपण शिंदे, फडणवीसांशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करू. जागावाटपासंदर्भात या सगळ्यांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. आपल्या कार्यकर्त्याची ताकद पाहून आपण त्यांची निवड करणार आहोत
अजित पवार म्हणाले, काही जण आमच्यावर आरोप करतात की यांच्यावर केसेस होत्या म्हणून हे तिकडे गेले . मी कॅबिनेटमध्ये त्या खात्याचा मंत्री होतो म्हणून मला टार्गेट केलं गेलं पण ते आरोप सिद्ध झाले नाही. मंत्री आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी ते आदेश दिले होते. राज्यात ते सातत्याने भारनियमन 2012 रोजी होत होतं ते आम्ही बंद केलं. आज माझ्याकडे अर्थ खातं आहे. सहा लाख कोटींचं बजेट आहे.
मी कमीटमेंट पाळणारा नेता : अजित पवार
माझ्यावर जे आरोप झाले जलसंपदा विभागाची त्यानंतर त्याचा विकास रेंगळाला. मी कामाला मान्यता देतो म्हणुन मला टार्गेट करण्यात आलं. त्यावेळी नेमलेल्या समितीचा अहवाल आला आणि त्यांनी मला क्लीन चीट दिली. 32 वर्ष मी काम करतोय मला विचारलं जातं माझ्यावरच आरोप का होतात. परंतु मी कमीटमेंट पाळणारा नेता आहे. माझ्याकडे जीएसटी विभाग देखील होता. माझ्यावर आजपर्यंत कुठल्याही डीपीसीसंदर्भात आरोप नाही. काम व्हावी हीच कार्यकर्त्यांची अपेक्षा असते.
विकासकामाच्या बाबतीत जिल्हाध्यक्षांना प्राधान्य : अजित पवार
विकासकामांच्या बाबतीत पहिलं प्राधान्य राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना, दुसरं खासदारांना तर तिसरं राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना असणार आहे. युवती संघतेनेत काही वाद आहेत ते अदिती तटकरेने ते वाद मिटवावेत त्यामुळं युवती विभागाची जबाबदारी घे. जास्तीत जास्त महिलांचे प्रश्न सोडवायला संधी मिळेल, असे देखील अजित पवार म्हणाले.
उरलेल्या मंत्र्यांनाही पालकमंत्रीपद मिळावं यासाठी प्रयत्नशील : अजित पवार
सध्या असलेल्या पालकमंत्र्यांशिवाय उरलेल्या मंत्र्यांनाही पालकमंत्रीपद मिळावं यासाठी चर्चा करून लवकरत लवकर निर्णय घेणार आहे. आम्ही राहिलेल्या मंत्र्याबाबत देखील पालकमंत्री पद देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. इतर नेत्यांसोबत लवकरच या विषयांवर बसणार आहे.
आपण आपली विचारधारा सोडलेली नाही : अजित पवार
अनेक वर्ष संघटनेत काम करत आहोत. 2004 साली जे घडलं होतं ते मला काल कळलं. आधीच्या जनसंघाबाबत बोलल जातं होतं की जातीयवादी पक्ष आहे त्यामुळं आपण भाजप शिवसेनेपासून लांब राहत होतो. आता काळ बदलला आहे. अटलबिहारी वाजपेयी प्रधानमंत्री झाले. आपण आपली विचारधारा सोडलेली नाही. मी मुस्लिम समाजाला सांगू इच्छितो. आपण भाजप एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत परंतु बाबासाहेब आंबेडकर यांनी जो विचार सांगितला त्याचं मार्गावर चाललो आहे.
दिलेला शब्द पाळा कोणाला नाराज करू नका : अजित पवार
10 जून 1999 पवार साहेबांनी या पक्षाची घोषणा केली तेव्हा त्याचा सगळ्यात जास्त समर्थन, पुढाकार महाराष्ट्रातून होता. मी जरी संघटनेचा पदाधिकारी त्या काळात नसलो तरी संघटनेचं काम कोण करत होतं हे सगळ्यांना माहिती आहे. राज्यात पक्षाच्या इमारती उभारण्याचं काम आम्ही केलं. 2019 मधे प्रकाश साळुंखेंना मंत्री व्हायचं होतं, ते नाराज होते. प्रकाश साळुंखे राजीनामा देण्याच्या तयारीत होते. त्य़ांना मी, जयंत पाटील यांना खूप समजावलं, त्यांनी कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी जयंत पाटील म्हणाले मी एक वर्ष अध्यक्ष राहतो, काम करतो मग तुम्हाला जबाबदारी देऊत्यानंतर मी जयंत पाटलांना आठवण करून दिली. मात्र जयंत पाटील पुढे ढकलत राहिले..मंत्रीपद ठेवा आणि अध्यक्षपद यांना द्या. मी म्हणतो एकदा शब्द दिला की तो पाळा ना..कुणाला नाराज करू नका, संघटनेसाठी केलेल्या या बारिक बारिक गोष्टी साठत राहतात आणि मग त्यांचा अशा पद्धतीने उद्रेक होतो
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम



























Subscribe to my channel

