मुंबई: राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये ग्राहकांना पुरवल्या जाणाऱ्या जारमधील (Jar Water) आणि बाटलीबंद पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर आता अन्न व औषध प्रशासनाचा (FDA) कडक वचक असणार आहे. राज्यात जार व खुल्या पद्धतीने पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यात येत असलेल्या कायदेशीर अडचणींची कबुली सरकारने विधानसभेत दिली आहे. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांना जार आणि बाटलीबंद पाण्याच्या पुरवठ्यासाठी विशेष नियमावली म्हणजेच 'एसओपी' (SOP - Standard Operating Procedure) तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विधानसभेत नरहरी झिरवाळ यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली.
३ वर्षांत २० पाण्याचे नमुने आढळले थेट 'असुरक्षित'
विधानसभेत आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या ३ वर्षांत (१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२६) एफडीएने (FDA) पाण्याच्या उत्पादक कंपन्यांवर १८२ वेळा छापे टाकून तपासणी केली. प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवलेल्या १७७ नमुन्यांपैकी ११५ नमुने प्रमाणित आढळले. मात्र, १३ नमुने कमी दर्जाचे, ४ नमुने दिशाभूल करणारे (मिथ्याछाप) आणि तब्बल २० नमुने मानवी आरोग्यासाठी थेट 'असुरक्षित' आढळले आहेत. जारच्या पाण्याचा थेट आरोग्याशी संबंध असल्याने यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे बनले आहे.
हॉटेल्सना पिण्याचे शुद्ध पाणी मोफत देणे बंधनकारक
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 'सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र' या मोहिमेची व्याप्ती वाढवली आहे. नवीन नियमांनुसार, राज्यातील सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना ग्राहकांसाठी पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी मोफत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. हॉटेल्सनी ग्राहकांसाठी "येथे पिण्याचे शुद्ध पाणी मोफत मिळेल" अशा आशयाचा स्पष्ट फलक (बोर्ड) दर्शनी भागात लावणे सक्तीचे आहे. हॉटेलमध्ये आल्या आल्या ग्राहकांसमोर थेट विकतच्या पाण्याच्या बाटल्या ठेवता येणार नाहीत; जर ग्राहकाने स्वतःहून बाटलीबंद पाणी मागितले, तरच ते त्याला दिले जावे, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांक; नियम मोडल्यास कडक कारवाई
अशुद्ध किंवा दूषित पाण्याच्या पुरवठ्याबाबत ग्राहकांना थेट अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवता यावी, यासाठी १८००२२२३६५ हा टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांनी हॉटेल चालकांना कडक शब्दांत इशारा दिला आहे की, "जर नियमांचे पालन केले, तर कुणीही विनाकारण कारवाई करणार नाही, परंतु ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करून नियमांचे उल्लंघन केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही." आयुक्त मुंढे यांच्याकडून लवकरच लागू होणाऱ्या या नवीन 'एसओपी'मुळे राज्यातील पाण्याचे जार आणि अन्न प्रक्रियेच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
शहर
- म्हैसूर दसऱ्याच्या 'जंबो सवारी'चा मानकरी; प्रसिद्ध 'अभिमन्यू' हत्तीचा सुळा तुटला! वन विभागाकडून उपचार सुरू
- E20 इथेनॉल मिश्रित इंधन वाहनांसाठी सुरक्षित, पण मायलेजवर होणार किंचित परिणाम; टोयोटा, बजाज, टीव्हीएस आणि सुझुकीचे मोठे स्पष्टीकरण!
- कोल्हापुरात महापूर सदृश परिस्थिती! राजाराम बंधाऱ्याची पातळी २९ फुटांवर; जिल्ह्यातील ३३ बंधारे पाण्याखाली!
- ठाणेकरांचा पर्यावरण रक्षणासाठी एल्गार! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षणासाठी नागरिकांची 'मानवी साखळी'; मुख्य प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने!
महाराष्ट्र
- कोल्हापुरात महापूर सदृश परिस्थिती! राजाराम बंधाऱ्याची पातळी २९ फुटांवर; जिल्ह्यातील ३३ बंधारे पाण्याखाली!
- ठाणेकरांचा पर्यावरण रक्षणासाठी एल्गार! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षणासाठी नागरिकांची 'मानवी साखळी'; मुख्य प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने!
- पनवेलमध्ये पुराचा वेढा, ३३४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले! महानगरपालिकेकडून तात्काळ अन्न आणि वैद्यकीय मदत सुरू
- भ्रष्टाचाराचा कुबेर! देवळाली कॅन्टोन्मेंटचे माजी सीईओ अजय कुमार यांच्यावर सीबीआयचा गुन्हा; १० वर्षांत ५२ हजारांची संपत्ती झाली थेट पाऊणेसहा कोटी!
गुन्हा
- "जे लग्न कधी होणारच नाहीये, त्यासाठी आधार कशाला?" केतन अगरवाल हत्या प्रकरणात आरोपी सियाचे खळबळजनक व्हॉट्सॲप चॅट व्हायरल!
- उत्तर प्रदेश: पतीची हत्या करून मृतदेह बाथरुमच्या फरशीखाली गाडला; ४५ दिवस मृतदेहावरच आंघोळ केली!
- पेट्रोल पंप घोटाळ्यामागे थकीत भाड्याची 'ती' गंभीर कहाणी; बीडीओच्या अपहरणनाट्याचा विधानपरिषदेत झाला उलगडा!
- पुणे: ५ कोटींच्या वेतन घोटाळ्यात सिंहगड इन्स्टिट्यूटच्या संस्थापकासह ७ जणांवर गुन्हा दाखल.
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- E20 इथेनॉल मिश्रित इंधन वाहनांसाठी सुरक्षित, पण मायलेजवर होणार किंचित परिणाम; टोयोटा, बजाज, टीव्हीएस आणि सुझुकीचे मोठे स्पष्टीकरण!
- पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिसळल्याने इंजिन खराब होत नाही! केंद्र सरकार आणि पेट्रोलियम मंत्र्यांचे व्हायरल दाव्यांवर स्पष्टीकरण
- आग्रा हादरले! पतीची निर्घृण हत्या करून मृतदेह बाथरूममध्ये पुरला; ४५ दिवसांनंतर धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा!
- इंधन दरांचे मोठे गुपित: पेट्रोल ६ रुपये तर डिझेल १८९ रुपये कसे? कंपन्या दर वाढवण्याचे धाडस का करत नाहीत? जाणून घ्या सत्य.


























Subscribe to my channel


