मुंबई: राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये ग्राहकांना पुरवल्या जाणाऱ्या जारमधील (Jar Water) आणि बाटलीबंद पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर आता अन्न व औषध प्रशासनाचा (FDA) कडक वचक असणार आहे. राज्यात जार व खुल्या पद्धतीने पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यात येत असलेल्या कायदेशीर अडचणींची कबुली सरकारने विधानसभेत दिली आहे. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांना जार आणि बाटलीबंद पाण्याच्या पुरवठ्यासाठी विशेष नियमावली म्हणजेच 'एसओपी' (SOP - Standard Operating Procedure) तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विधानसभेत नरहरी झिरवाळ यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली.
३ वर्षांत २० पाण्याचे नमुने आढळले थेट 'असुरक्षित'
विधानसभेत आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या ३ वर्षांत (१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२६) एफडीएने (FDA) पाण्याच्या उत्पादक कंपन्यांवर १८२ वेळा छापे टाकून तपासणी केली. प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवलेल्या १७७ नमुन्यांपैकी ११५ नमुने प्रमाणित आढळले. मात्र, १३ नमुने कमी दर्जाचे, ४ नमुने दिशाभूल करणारे (मिथ्याछाप) आणि तब्बल २० नमुने मानवी आरोग्यासाठी थेट 'असुरक्षित' आढळले आहेत. जारच्या पाण्याचा थेट आरोग्याशी संबंध असल्याने यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे बनले आहे.
हॉटेल्सना पिण्याचे शुद्ध पाणी मोफत देणे बंधनकारक
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 'सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र' या मोहिमेची व्याप्ती वाढवली आहे. नवीन नियमांनुसार, राज्यातील सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना ग्राहकांसाठी पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी मोफत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. हॉटेल्सनी ग्राहकांसाठी "येथे पिण्याचे शुद्ध पाणी मोफत मिळेल" अशा आशयाचा स्पष्ट फलक (बोर्ड) दर्शनी भागात लावणे सक्तीचे आहे. हॉटेलमध्ये आल्या आल्या ग्राहकांसमोर थेट विकतच्या पाण्याच्या बाटल्या ठेवता येणार नाहीत; जर ग्राहकाने स्वतःहून बाटलीबंद पाणी मागितले, तरच ते त्याला दिले जावे, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांक; नियम मोडल्यास कडक कारवाई
अशुद्ध किंवा दूषित पाण्याच्या पुरवठ्याबाबत ग्राहकांना थेट अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवता यावी, यासाठी १८००२२२३६५ हा टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांनी हॉटेल चालकांना कडक शब्दांत इशारा दिला आहे की, "जर नियमांचे पालन केले, तर कुणीही विनाकारण कारवाई करणार नाही, परंतु ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करून नियमांचे उल्लंघन केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही." आयुक्त मुंढे यांच्याकडून लवकरच लागू होणाऱ्या या नवीन 'एसओपी'मुळे राज्यातील पाण्याचे जार आणि अन्न प्रक्रियेच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




