मुंबई: राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये ग्राहकांना पुरवल्या जाणाऱ्या जारमधील (Jar Water) आणि बाटलीबंद पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर आता अन्न व औषध प्रशासनाचा (FDA) कडक वचक असणार आहे. राज्यात जार व खुल्या पद्धतीने पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यात येत असलेल्या कायदेशीर अडचणींची कबुली सरकारने विधानसभेत दिली आहे. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांना जार आणि बाटलीबंद पाण्याच्या पुरवठ्यासाठी विशेष नियमावली म्हणजेच 'एसओपी' (SOP - Standard Operating Procedure) तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विधानसभेत नरहरी झिरवाळ यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली.
३ वर्षांत २० पाण्याचे नमुने आढळले थेट 'असुरक्षित'
विधानसभेत आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या ३ वर्षांत (१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२६) एफडीएने (FDA) पाण्याच्या उत्पादक कंपन्यांवर १८२ वेळा छापे टाकून तपासणी केली. प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवलेल्या १७७ नमुन्यांपैकी ११५ नमुने प्रमाणित आढळले. मात्र, १३ नमुने कमी दर्जाचे, ४ नमुने दिशाभूल करणारे (मिथ्याछाप) आणि तब्बल २० नमुने मानवी आरोग्यासाठी थेट 'असुरक्षित' आढळले आहेत. जारच्या पाण्याचा थेट आरोग्याशी संबंध असल्याने यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे बनले आहे.
हॉटेल्सना पिण्याचे शुद्ध पाणी मोफत देणे बंधनकारक
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 'सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र' या मोहिमेची व्याप्ती वाढवली आहे. नवीन नियमांनुसार, राज्यातील सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना ग्राहकांसाठी पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी मोफत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. हॉटेल्सनी ग्राहकांसाठी "येथे पिण्याचे शुद्ध पाणी मोफत मिळेल" अशा आशयाचा स्पष्ट फलक (बोर्ड) दर्शनी भागात लावणे सक्तीचे आहे. हॉटेलमध्ये आल्या आल्या ग्राहकांसमोर थेट विकतच्या पाण्याच्या बाटल्या ठेवता येणार नाहीत; जर ग्राहकाने स्वतःहून बाटलीबंद पाणी मागितले, तरच ते त्याला दिले जावे, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांक; नियम मोडल्यास कडक कारवाई
अशुद्ध किंवा दूषित पाण्याच्या पुरवठ्याबाबत ग्राहकांना थेट अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवता यावी, यासाठी १८००२२२३६५ हा टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांनी हॉटेल चालकांना कडक शब्दांत इशारा दिला आहे की, "जर नियमांचे पालन केले, तर कुणीही विनाकारण कारवाई करणार नाही, परंतु ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करून नियमांचे उल्लंघन केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही." आयुक्त मुंढे यांच्याकडून लवकरच लागू होणाऱ्या या नवीन 'एसओपी'मुळे राज्यातील पाण्याचे जार आणि अन्न प्रक्रियेच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
शहर
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
महाराष्ट्र
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- कोल्हापूर: स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- जालना: माझ्यामधी वळवळ करू नका.. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचे छगन भुजबळांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लबोल!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड


























Subscribe to my channel




