काही काळापूर्वी इंस्टाग्रामवर पूजाचे (पुजारिनी प्रधान)प्रकरण खूप चर्चेत होते. त्या पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागातील एक ‘कंटेंट क्रिएटर'' आहेत. त्या ग्रामीण जीवन, पुस्तके, स्त्रीवाद आणि समाज या विषयांवर व्हिडिओ बनवतात. त्यांची लोकप्रियता वेगाने वाढली,तसे त्यांच्या कामाच्या अस्सलतेवर प्रश्न उपस्थित केलेगेले. असे म्हटले गेले की, इतके दर्जेदार व्हिडिओ गावातील मुलगी एकटी बनवूच शकत नाही. यामागे नक्कीच एखादी एजन्सी किंवा ब्रँडचा पाठिंबा असावा. हळूहळू या वादाचे रूपांतर सिलेक्टिव्ह फेमिनिझमविरुद्ध ‘वास्तविक सक्षमीकरण'' अशा चर्चेत झाले. पूजाच्या बाजूने असा प्रश्न विचारला गेला की, कायग्रामीण भागातील स्त्री उत्तम इंग्रजी बोलू शकत नाही? आणि हा अधिकार काय फक्त शहरी स्त्रियांचाच आहे? या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट खेदजनक रीतीने स्पष्ट होते की, ‘टॉक्सिक फेमिनिझम'' हे ‘टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी''इतकेच वाईट आहे. किंबहुना कदाचित त्याहूनही जास्त. समानतेच्या लढाईत आपण कुठेतरी केवळ ‘दिखाव्या''लाच मूल्य समजण्याची चूक करत आहोत. काही ठिकाणी तर आपण स्त्रीवादाच्या मूळ अर्थापासून खूप दूर जातो. आपण स्त्रीत्वाच्या अशारूपाला प्रोत्साहन देऊ लागलो आहोत. त्यात गोंधळखूप आहे. पण ते आतून पोकळ आहे. त्यात बंडखोरीतर आहे, पण आत्मपरीक्षण नाही. खरे सांगायचे तर,समजूतदारपणापेक्षा नाटकीपणा अधिक वेगाने पसरतो.मूर्खपणा लवकर लक्ष वेधून घेतो आणि सोशलमीडियाच्या अल्गोरिदमला तर संतापच जास्त आवडतो.परंतु एक अस्वस्थ करणारा प्रश्न देशाने स्वतःलाचविचारला पाहिजे. गावापासून शहरापर्यंत फक्त त्याचस्त्रिया भारतीय स्त्रीवादाचा आवाज बनतील का?कारण सत्य हेच आहे की, बहुसंख्य भारतीय स्त्रियाइंस्टाग्रामच्या जगात जगत नाहीत. हुंड्यासाठी आजहीदर तासाला त्यांची हत्या होते आणि दर १३ मिनिटालात्यांच्यावर अत्याचार होतात. 20 कोटी महिला घरगुतीहिंसाचाराच्या बळी आहेत. त्यांना शिक्षणासाठी संघर्षकरावा लागतो, कार्यालयांमध्ये समान पगारासाठीलढावे लागते आणि विवाह संस्थेत तर त्या रोजस्वातंत्र्याची लढाई लढतात. अशा घरात त्यांना रहावेलागते. त्यांच्यासाठी स्त्रीवाद ही दाखवण्याची गोष्टनसून आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. तरीही, आजभारतीय स्त्रीचे प्रतिनिधित्व करणारे सर्वात बुलंदआवाज हे समाजातील एका लहानशा वर्गातून येतात. तो शहरी आहे, इंग्रजी बोलणारा आहे. डिजिटल जगाचीमाहिती असलेला आणि ‘अल्गोरिदम-मान्य'' आहे. हेपूर्णपणे चुकीचेही नाही, कारण प्रतिनिधित्व बदलतअसते. पण जेव्हा हे प्रतिनिधित्व एकमेकींना कमीलेखण्यात धन्यता मानते, तेव्हा आपल्याला थांबूनविचार करण्याची गरज आहे. स्त्रीवाद कधीही ‘तमाशा''बनण्यासाठी नव्हता. केवळ ३० सेकंदात कोणाला तरीहरवण्याची स्पर्धा म्हणजे स्त्रीवाद नाही. आपण सध्यापाहत आहोत, ती प्रगती नसून एक दिखावा आहे.त्याहूनही वाईट म्हणजे हा दिखावा त्याच व्यवस्थांनाबळकट करतो. खरे तर त्यांना स्त्रीवाद संपवायचा आहे.पुरुषप्रधान व्यवस्था हे पाहून हसते. कारण स्त्रियांनीजाहीरपणे एकमेकींना कमी लेखणे यापेक्षा पितृसत्ताकपद्धतीसाठी दुसरे चांगले काय असू शकते? भारतीय स्त्रीवादामध्ये संतापलेल्या, बिनधास्त किंवागोंधळलेल्या अशा सर्व प्रकारच्या आवाजांना जागाआहे. स्त्रीवादाला ‘चांगले'' असण्यापेक्षा ‘जबाबदार''असणे अधिक महत्त्वाचे आहे. त्याला मोठ्या संघर्षाचीजाणीव असायला हवी आणि ती लढाई अजून संपलेलीनाही. सार्वजनिक चर्चेत स्त्रीवादाच्या नावाखालीछोट्या-छोट्या ऑनलाइन लढाया वरचढ होतात. तेव्हात्याचे नेमके काय अर्थ काढायचे? याचा सर्वातधोकादायक अर्थ हा आहे की, आपण स्त्रीवादाचीव्याप्ती एका ‘ब्रँड''पुरती मर्यादित करत आहोत. हा ब्रँडवास्तवापेक्षा ‘व्हायरल'' होण्याच्या क्षमतेवर अवलंबूनआहे. हे स्त्रियांनी गप्प बसण्याचे आवाहन नक्कीच नाहीतर प्रगल्भता आणि सखोलता दाखवण्याचे आवाहनआहे. हे फक्त आठवण करून देण्याचा प्रयत्न आहे की,आपला उद्देश केवळ ‘ऐकले जाणे'' हा नव्हता, तरआपला आवाज बदलासाठी असावा हा होता.
(लेखिकेचे हे वैयक्तिक मत आहे.) स्त्रीवादाने आता कदाचित स्वतःलाचथांबून विचारले पाहिजे की, आपणखरोखर एखादी चळवळ उभारत आहोत,की केवळ ‘कंटेंट'' तयार करत आहोत?भारतीय स्त्रीवादाला आपल्याजबाबदाऱ्यांची आणि मोठ्या लढायांचीजाणीव होणे आवश्यक आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


