काही काळापूर्वी इंस्टाग्रामवर पूजाचे (पुजारिनी प्रधान)प्रकरण खूप चर्चेत होते. त्या पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागातील एक ‘कंटेंट क्रिएटर'' आहेत. त्या ग्रामीण जीवन, पुस्तके, स्त्रीवाद आणि समाज या विषयांवर व्हिडिओ बनवतात. त्यांची लोकप्रियता वेगाने वाढली,तसे त्यांच्या कामाच्या अस्सलतेवर प्रश्न उपस्थित केलेगेले. असे म्हटले गेले की, इतके दर्जेदार व्हिडिओ गावातील मुलगी एकटी बनवूच शकत नाही. यामागे नक्कीच एखादी एजन्सी किंवा ब्रँडचा पाठिंबा असावा. हळूहळू या वादाचे रूपांतर सिलेक्टिव्ह फेमिनिझमविरुद्ध ‘वास्तविक सक्षमीकरण'' अशा चर्चेत झाले. पूजाच्या बाजूने असा प्रश्न विचारला गेला की, कायग्रामीण भागातील स्त्री उत्तम इंग्रजी बोलू शकत नाही? आणि हा अधिकार काय फक्त शहरी स्त्रियांचाच आहे? या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट खेदजनक रीतीने स्पष्ट होते की, ‘टॉक्सिक फेमिनिझम'' हे ‘टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी''इतकेच वाईट आहे. किंबहुना कदाचित त्याहूनही जास्त. समानतेच्या लढाईत आपण कुठेतरी केवळ ‘दिखाव्या''लाच मूल्य समजण्याची चूक करत आहोत. काही ठिकाणी तर आपण स्त्रीवादाच्या मूळ अर्थापासून खूप दूर जातो. आपण स्त्रीत्वाच्या अशारूपाला प्रोत्साहन देऊ लागलो आहोत. त्यात गोंधळखूप आहे. पण ते आतून पोकळ आहे. त्यात बंडखोरीतर आहे, पण आत्मपरीक्षण नाही. खरे सांगायचे तर,समजूतदारपणापेक्षा नाटकीपणा अधिक वेगाने पसरतो.मूर्खपणा लवकर लक्ष वेधून घेतो आणि सोशलमीडियाच्या अल्गोरिदमला तर संतापच जास्त आवडतो.परंतु एक अस्वस्थ करणारा प्रश्न देशाने स्वतःलाचविचारला पाहिजे. गावापासून शहरापर्यंत फक्त त्याचस्त्रिया भारतीय स्त्रीवादाचा आवाज बनतील का?कारण सत्य हेच आहे की, बहुसंख्य भारतीय स्त्रियाइंस्टाग्रामच्या जगात जगत नाहीत. हुंड्यासाठी आजहीदर तासाला त्यांची हत्या होते आणि दर १३ मिनिटालात्यांच्यावर अत्याचार होतात. 20 कोटी महिला घरगुतीहिंसाचाराच्या बळी आहेत. त्यांना शिक्षणासाठी संघर्षकरावा लागतो, कार्यालयांमध्ये समान पगारासाठीलढावे लागते आणि विवाह संस्थेत तर त्या रोजस्वातंत्र्याची लढाई लढतात. अशा घरात त्यांना रहावेलागते. त्यांच्यासाठी स्त्रीवाद ही दाखवण्याची गोष्टनसून आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. तरीही, आजभारतीय स्त्रीचे प्रतिनिधित्व करणारे सर्वात बुलंदआवाज हे समाजातील एका लहानशा वर्गातून येतात. तो शहरी आहे, इंग्रजी बोलणारा आहे. डिजिटल जगाचीमाहिती असलेला आणि ‘अल्गोरिदम-मान्य'' आहे. हेपूर्णपणे चुकीचेही नाही, कारण प्रतिनिधित्व बदलतअसते. पण जेव्हा हे प्रतिनिधित्व एकमेकींना कमीलेखण्यात धन्यता मानते, तेव्हा आपल्याला थांबूनविचार करण्याची गरज आहे. स्त्रीवाद कधीही ‘तमाशा''बनण्यासाठी नव्हता. केवळ ३० सेकंदात कोणाला तरीहरवण्याची स्पर्धा म्हणजे स्त्रीवाद नाही. आपण सध्यापाहत आहोत, ती प्रगती नसून एक दिखावा आहे.त्याहूनही वाईट म्हणजे हा दिखावा त्याच व्यवस्थांनाबळकट करतो. खरे तर त्यांना स्त्रीवाद संपवायचा आहे.पुरुषप्रधान व्यवस्था हे पाहून हसते. कारण स्त्रियांनीजाहीरपणे एकमेकींना कमी लेखणे यापेक्षा पितृसत्ताकपद्धतीसाठी दुसरे चांगले काय असू शकते? भारतीय स्त्रीवादामध्ये संतापलेल्या, बिनधास्त किंवागोंधळलेल्या अशा सर्व प्रकारच्या आवाजांना जागाआहे. स्त्रीवादाला ‘चांगले'' असण्यापेक्षा ‘जबाबदार''असणे अधिक महत्त्वाचे आहे. त्याला मोठ्या संघर्षाचीजाणीव असायला हवी आणि ती लढाई अजून संपलेलीनाही. सार्वजनिक चर्चेत स्त्रीवादाच्या नावाखालीछोट्या-छोट्या ऑनलाइन लढाया वरचढ होतात. तेव्हात्याचे नेमके काय अर्थ काढायचे? याचा सर्वातधोकादायक अर्थ हा आहे की, आपण स्त्रीवादाचीव्याप्ती एका ‘ब्रँड''पुरती मर्यादित करत आहोत. हा ब्रँडवास्तवापेक्षा ‘व्हायरल'' होण्याच्या क्षमतेवर अवलंबूनआहे. हे स्त्रियांनी गप्प बसण्याचे आवाहन नक्कीच नाहीतर प्रगल्भता आणि सखोलता दाखवण्याचे आवाहनआहे. हे फक्त आठवण करून देण्याचा प्रयत्न आहे की,आपला उद्देश केवळ ‘ऐकले जाणे'' हा नव्हता, तरआपला आवाज बदलासाठी असावा हा होता.
(लेखिकेचे हे वैयक्तिक मत आहे.) स्त्रीवादाने आता कदाचित स्वतःलाचथांबून विचारले पाहिजे की, आपणखरोखर एखादी चळवळ उभारत आहोत,की केवळ ‘कंटेंट'' तयार करत आहोत?भारतीय स्त्रीवादाला आपल्याजबाबदाऱ्यांची आणि मोठ्या लढायांचीजाणीव होणे आवश्यक आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- भिवंडी (ठाणे): लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; भिवंडीतील संतापजनक घटना, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई! ३ महिन्यात ३६७ फरार आरोपींना बेड्या; २०-२० वर्षांपासून गुंगारा देणारे गुन्हेगार जेरबंद
- "आपण काय पाकिस्तानच्या सीमेवर राहतो का?" पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा प्रशासनावर संताप
- नवी मुंबई महानगरपालिकेत खळबळ; कैलास गायकवाड प्रकरणानंतर १३ बडे अधिकारी 'एसीबी'च्या रडारवर!
महाराष्ट्र
- तुमचे रेशन कार्ड बंद झाले आहे का? घरबसल्या मोबाईलवरून 'या' सोप्या पद्धतीने करा पुन्हा सुरू!
- भिवंडी (ठाणे): लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; भिवंडीतील संतापजनक घटना, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई! ३ महिन्यात ३६७ फरार आरोपींना बेड्या; २०-२० वर्षांपासून गुंगारा देणारे गुन्हेगार जेरबंद
- "आपण काय पाकिस्तानच्या सीमेवर राहतो का?" पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा प्रशासनावर संताप
गुन्हा
- नवी मुंबई महानगरपालिकेत खळबळ; कैलास गायकवाड प्रकरणानंतर १३ बडे अधिकारी 'एसीबी'च्या रडारवर!
- नागपूरमध्ये बनावट औषधांचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, सहा जणांवर गुन्हे दाखल
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




