मेघना पंत यांचा कॉलम:केवळ शहरी, संपन्न स्त्रियाच‎ स्त्रीवादाचा आवाज आहेत?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎काही काळापूर्वी इंस्टाग्रामवर पूजाचे (पुजारिनी प्रधान)‎प्रकरण खूप चर्चेत होते. त्या पश्चिम बंगालच्या ग्रामीण‎ भागातील एक ‘कंटेंट क्रिएटर'' आहेत. त्या ग्रामीण ‎जीवन, पुस्तके, स्त्रीवाद आणि समाज या विषयांवर ‎व्हिडिओ बनवतात. त्यांची लोकप्रियता वेगाने वाढली,‎तसे त्यांच्या कामाच्या अस्सलतेवर प्रश्न उपस्थित केले‎गेले. असे म्हटले गेले की, इतके दर्जेदार व्हिडिओ‎ गावातील मुलगी एकटी बनवूच शकत नाही. यामागे ‎नक्कीच एखादी एजन्सी किंवा ब्रँडचा पाठिंबा असावा.‎ हळूहळू या वादाचे रूपांतर सिलेक्टिव्ह फेमिनिझम‎विरुद्ध ‘वास्तविक सक्षमीकरण'' अशा चर्चेत झाले. ‎‎पूजाच्या बाजूने असा प्रश्न विचारला गेला की, काय‎ग्रामीण भागातील स्त्री उत्तम इंग्रजी बोलू शकत नाही? ‎‎आणि हा अधिकार काय फक्त शहरी स्त्रियांचाच ‎आहे? या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट खेदजनक रीतीने ‎‎स्पष्ट होते की, ‘टॉक्सिक फेमिनिझम'' हे ‘टॉक्सिक ‎‎मॅस्क्युलिनिटी''इतकेच वाईट आहे. किंबहुना कदाचित ‎‎त्याहूनही जास्त. समानतेच्या लढाईत आपण कुठेतरी ‎‎केवळ ‘दिखाव्या''लाच मूल्य समजण्याची चूक करत ‎‎आहोत. काही ठिकाणी तर आपण स्त्रीवादाच्या मूळ‎ अर्थापासून खूप दूर जातो. आपण स्त्रीत्वाच्या अशा‎रूपाला प्रोत्साहन देऊ लागलो आहोत. त्यात गोंधळ‎खूप आहे. पण ते आतून पोकळ आहे. त्यात बंडखोरी‎तर आहे, पण आत्मपरीक्षण नाही. खरे सांगायचे तर,‎समजूतदारपणापेक्षा नाटकीपणा अधिक वेगाने पसरतो.‎मूर्खपणा लवकर लक्ष वेधून घेतो आणि सोशल‎मीडियाच्या अल्गोरिदमला तर संतापच जास्त आवडतो.‎परंतु एक अस्वस्थ करणारा प्रश्न देशाने स्वतःलाच‎विचारला पाहिजे. गावापासून शहरापर्यंत फक्त त्याच‎स्त्रिया भारतीय स्त्रीवादाचा आवाज बनतील का?‎कारण सत्य हेच आहे की, बहुसंख्य भारतीय स्त्रिया‎इंस्टाग्रामच्या जगात जगत नाहीत. हुंड्यासाठी आजही‎दर तासाला त्यांची हत्या होते आणि दर १३ मिनिटाला‎त्यांच्यावर अत्याचार होतात. 20 कोटी महिला घरगुती‎हिंसाचाराच्या बळी आहेत. त्यांना शिक्षणासाठी संघर्ष‎करावा लागतो, कार्यालयांमध्ये समान पगारासाठी‎लढावे लागते आणि विवाह संस्थेत तर त्या रोज‎स्वातंत्र्याची लढाई लढतात. अशा घरात त्यांना रहावे‎लागते. त्यांच्यासाठी स्त्रीवाद ही दाखवण्याची गोष्ट‎नसून आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. तरीही, आज‎भारतीय स्त्रीचे प्रतिनिधित्व करणारे सर्वात बुलंद‎आवाज हे समाजातील एका लहानशा वर्गातून येतात. तो ‎शहरी आहे, इंग्रजी बोलणारा आहे. डिजिटल जगाची‎माहिती असलेला आणि ‘अल्गोरिदम-मान्य'' आहे. हे‎पूर्णपणे चुकीचेही नाही, कारण प्रतिनिधित्व बदलत‎असते. पण जेव्हा हे प्रतिनिधित्व एकमेकींना कमी‎लेखण्यात धन्यता मानते, तेव्हा आपल्याला थांबून‎विचार करण्याची गरज आहे. स्त्रीवाद कधीही ‘तमाशा''‎बनण्यासाठी नव्हता. केवळ ३० सेकंदात कोणाला तरी‎हरवण्याची स्पर्धा म्हणजे स्त्रीवाद नाही. आपण सध्या‎पाहत आहोत, ती प्रगती नसून एक दिखावा आहे.‎त्याहूनही वाईट म्हणजे हा दिखावा त्याच व्यवस्थांना‎बळकट करतो. खरे तर त्यांना स्त्रीवाद संपवायचा आहे.‎पुरुषप्रधान व्यवस्था हे पाहून हसते. कारण स्त्रियांनी‎जाहीरपणे एकमेकींना कमी लेखणे यापेक्षा पितृसत्ताक‎पद्धतीसाठी दुसरे चांगले काय असू शकते?‎ ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎भारतीय स्त्रीवादामध्ये संतापलेल्या, बिनधास्त किंवा‎गोंधळलेल्या अशा सर्व प्रकारच्या आवाजांना जागा‎आहे. स्त्रीवादाला ‘चांगले'' असण्यापेक्षा ‘जबाबदार''‎असणे अधिक महत्त्वाचे आहे. त्याला मोठ्या संघर्षाची‎जाणीव असायला हवी आणि ती लढाई अजून संपलेली‎नाही. सार्वजनिक चर्चेत स्त्रीवादाच्या नावाखाली‎छोट्या-छोट्या ऑनलाइन लढाया वरचढ होतात. तेव्हा‎त्याचे नेमके काय अर्थ काढायचे? याचा सर्वात‎धोकादायक अर्थ हा आहे की, आपण स्त्रीवादाची‎व्याप्ती एका ‘ब्रँड''पुरती मर्यादित करत आहोत. हा ब्रँड‎वास्तवापेक्षा ‘व्हायरल'' होण्याच्या क्षमतेवर अवलंबून‎आहे. हे स्त्रियांनी गप्प बसण्याचे आवाहन नक्कीच नाही‎तर प्रगल्भता आणि सखोलता दाखवण्याचे आवाहन‎आहे. हे फक्त आठवण करून देण्याचा प्रयत्न आहे की,‎आपला उद्देश केवळ ‘ऐकले जाणे'' हा नव्हता, तर‎आपला आवाज बदलासाठी असावा हा होता.‎ (लेखिकेचे हे वैयक्तिक मत आहे.)‎ स्त्रीवादाने आता कदाचित स्वतःलाच‎थांबून विचारले पाहिजे की, आपण‎खरोखर एखादी चळवळ उभारत आहोत,‎की केवळ ‘कंटेंट'' तयार करत आहोत?‎भारतीय स्त्रीवादाला आपल्या‎जबाबदाऱ्यांची आणि मोठ्या लढायांची‎जाणीव होणे आवश्यक आहे.‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *