वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडले, अन्…; ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक

विधानसभेतील अधिवेशनात बोलताना, उद्धव ठाकरेंनी अजित पवारांच्या कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची प्रशंसा केली. ते म्हणाले की, सभागृहात नेहमी दिसणारे अजित दादा आज अनुपस्थित असल्याने खंत वाटते. अजित पवारांनी एका मोठ्या राजकीय वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांची प्रशासकीय कामावरील पकड, सखोल अभ्यास आणि संकटाच्या काळातही राज्याचे अर्थचक्र सुरू ठेवण्याचे कौशल्य अद्वितीय होते.

ठाकरेंनी नमूद केले की, त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अजित पवार उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांना प्रशासनाचा अनुभव नसतानाही अजित पवारांनी खंबीर पाठिंबा दिला. लॉकडाऊनमध्ये मंत्रालय बंद असतानाही कर्जमुक्ती आणि शिवभोजनसारख्या योजना यशस्वीपणे राबवल्या. समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूचे कामही त्यांनी थांबवले नाही. अजित पवारांचा स्वभाव तापट असला तरी, त्यांचे काम आणि स्पष्टवक्तेपणा त्यांची ओळख होती.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *