
पुणे : महान तमिळ कवी सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्ताने ११ डिसेंबर या दिवशी भारतीय भाषा उत्सव साजरा करण्याचा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या भारतीय भाषा समितीचा प्रस्ताव आहे. या अनुषंगाने भाषा सौहार्द निर्माण करण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांमध्ये भारतीय उत्सव साजरा करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालयांना दिले आहेत. या निमित्ताने दरवर्षी विविध उपक्रम राबवण्याबाबतही स्पष्ट करण्यात आले आहे.
भारतीय भाषा उत्सव साजरा करण्याबाबत यूजीसीने परिपत्रक आणि संकल्पनापत्र संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. सुब्रमण्यम भारती हे त्यांच्या काळातील उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारे सेतू मानले जायचे. त्यामुळे त्यांच्या जयंती दिनी भारतीय भाषा उत्सव साजरा केल्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय एकता मजबूत होईल. तसेच नागरिकांनी आपल्या मातृभाषेवर प्रभुत्व मिळवणे, अन्य भाषा शिकण्यासाठी प्रेरित होणे, भारतीय भाषांचा अधिकाधिक वापर केल्याने शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक लाभांचा प्रचार होणे, भारतीय भाषांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणे हा भारतीय भाषा उत्सवाचा उद्देश असल्याचे संकल्पनापत्रात नमूद करण्यात आले आहे. भारतीय भाषा दिनी विविध भाषांतील गाण्यांचे सादरीकरण, वक्तृत्व, लेखन स्पर्धा, भाषिक खेळ, भारतीय भाषांचे महत्त्व विशद करणारे प्रदर्शन आदी उपक्रम राबवण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मध्ये प्रकल्प, उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांनी भारतीय भाषांची एकात्मक शिकण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे भाषा सौहार्द निर्माण करण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती होण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून मातृभाषेसह जवळच्या दुसऱ्या भाषेविषयी आस्था निर्माण होऊ शकेल. अन्य भारतीय भाषा शिकणे, बोलणे हे आनंददायी झाले पाहिजे, असे यूजीसीने स्पष्ट केले आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




