‘हे आरोपपत्र म्हणजे एक चेष्टा आहे.’- असे ट्विशा शर्माचे वडील नवनिधी शर्मा मला म्हणाले. त्यांचा आवाज कापत होता, गळा दाटून आला होता. ट्विशाच्या मृत्यूच्या बहुचर्चित प्रकरणात सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रावर ते आपली प्रतिक्रिया देत होते. कारण सीबीआय या निष्कर्षावर पोहोचली आहे की, ट्विशाचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला होता. तिची हत्या झाली नव्हती. ट्विशाचा भाऊ मेजर हर्षित म्हणाला की, ज्या गोष्टीचा आम्हाला आधीपासूनच संशय होता, तीच गोष्ट सांगण्यासाठी सीबीआयने आम्हाला 90 दिवस लावले. सीबीआय ज्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्यात आणि ते विचारण्यात अपयशी ठरली, अशा अनेक प्रश्नांची यादीच त्याने मला वाचून दाखवली. आणि त्याचे बरोबर आहे; कारण सीबीआयच्या सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या अंतिम अहवालात अनेक गंभीर त्रुटी आणि विरोधाभास आहेत. सीबीआयचे निष्कर्ष पूर्णपणे एम्समध्ये (दिल्ली) झालेल्या दुसऱ्या शवविच्छेदनावर आधारित आहेत. ट्विशाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, सीबीआयने या प्रकरणातील सर्वात धक्कादायक पैलूची सखोल चौकशी केली नाही. उपनिरीक्षक दिनेश शर्मा यांनी घटनास्थळावरून तो जिम बेल्ट (लिगेचर) जप्त केला होता; ज्याच्या मदतीने ट्विशाने आपला जीव दिल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. परंतु शर्मा यांनी हा बेल्ट दोन दिवस स्वतःच्या खासगी वाहनात ठेवला आणि पहिल्या शवविच्छेदनाच्या वेळी तो जमा केला नाही. त्यामुळे पुरावा म्हणून त्याची विश्वासार्हता गंभीरपणे धोक्यात येऊ शकते. दुसऱ्या शवविच्छेदनाच्या वेळीही हा बेल्ट तिथे नव्हता, असे ट्विशाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अशा प्रकारे, आत्महत्या सिद्ध करण्यासाठी जो मुख्य पुरावा म्हणून सादर केला जात आहे, तोच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. असे आणखी अनेक प्रश्न आहेत. जर ट्विशाने आत्महत्या केली होती, तर तिचा नवरा फरार का झाला? त्याला कशाची भीती होती? घरात मृत्यू झाल्यानंतर काही तासांतच गिरिबाला सिंह यांनी त्या सीसीटीव्ही विक्रेत्याला फोन का केला, ज्याने त्यांच्या घरात कॅमेरे बसवले होते? त्यांनी वकिलांची एक टीम त्या ब्यूटी पार्लरमध्ये का पाठवली- जिथे मृत्यूच्या दिवशी ट्विशाला पाहिले गेले होते. गिरिबाला यांना त्या फुटेजमध्ये इतका रस का होता? याचं कारण असं आहे का, की त्या फुटेजमध्ये ट्विशा अतिशय सामान्य आणि शांत वाटत होती; गिरिबाला यांनी स्वतःच्याच घरात पुराव्यांशी छेडछाड केली नसेल, यावर आपण कसा विश्वास ठेवायचा? कारण असे करण्यासाठी त्यांच्याकडे 10 दिवसांचा वेळ होता. आरोपपत्रात ट्विशाची अशी प्रतिमा उभी करण्यात आली आहे की, सासू आणि पतीच्या भावनिक छळामुळे ती मानसिकदृष्ट्या त्रस्त होती आणि तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले. 12 मे रोजी मृत्यूच्या दिवशी ट्विशाने पाठवलेला शेवटचा व्हॉट्सॲप मेसेज अहवालात नमूद करण्यात आला आहे. त्यात तिने तिची नणंद राशी अबरोल हिला सांगितले होते- ‘त्याला सांग की त्याच्या पत्नीचे उरलेले अवशेष घेऊन जा. पण उद्या. मला आता शांततेत मरू दे.’ मात्र, राशीने माझ्याशी बोलताना सांगितले की, हा मेसेज ट्विशाने पाठवला असेल यावर तिचा अजिबात विश्वास नाही. या मेसेजमुळे तिला धक्काच बसला होता; कारण ट्विशाने तिच्या आई-वडिलांच्या घरी परतण्याची पूर्ण तयारी केली होती. नोकरी मिळवण्यासाठी तिने आपल्या जुन्या मालकांशीही संपर्क साधला होता. त्याच संध्याकाळी ट्विशाने राशीला मेसेज करून सांगितले की, समर्थ ट्विशावर तिचे 20 लाख रुपये त्याला ट्रान्सफर करण्यासाठी दबावही टाकत होता. रात्री 10 वाजेनंतर- जेव्हा ट्विशाने शेवटचे तिच्या आईशी बोलणे केले- तेव्हाही तिने पुनरुच्चार केला होता की समर्थ खूप आक्रमक होत होता. त्यानंतर ती मृतावस्थेत आढळली. पहिल्या शवविच्छेदनात ट्विशाच्या शरीरावर मृत्यूआधी झालेल्या सात जखमांची नोंद करण्यात आली होती, ज्यात डोक्याला लागलेल्या माराचाही समावेश होता. मात्र, दुसऱ्या शवविच्छेदनात असा दावा करण्यात आला की वैद्यकीय-कायदेशीर महत्त्वाची कोणतीही जखम आढळली नाही. तर खुद्द सीबीआयच्या अहवालात समर्थ हिंसक वागणूक करत असल्याचा ट्विशाचा आरोप नोंदवलेला आहे. सीबीआयच्या अहवालात गिरिबाला यांच्या मोठ्या सुनेचाही छळ झाल्याचा उल्लेख आहे. अशा परिस्थितीत ट्विशाच्या कुटुंबीयांची हताशा समजून घेता येऊ शकते. सत्याच्या शोधासाठी आपणही त्यांच्या सुरात सूर मिसळून आणखी भेदक प्रश्न विचारले पाहिजेत.(हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) पहिल्या शवविच्छेदनात ट्विशाच्या शरीरावर मृत्यूआधी डोक्याच्या मारासह सात जखमांची नोंद केली गेली होती. मात्र, दुसऱ्या शवविच्छेदनात वैद्यकीय-कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाची कोणतीही जखम आढळली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: भावाला वाचवताना दोघांचा करुण अंत, पुण्याच्या दौंडमध्ये विजेचा शॉक लागून दोन चुलत भावांचा मृत्यू आई थोडक्यात बचावली!
- नक्कीच पुढच्या जन्मी डॉक्टर बनेल... वैद्यकीय परीक्षेच्या तणावातून १९ वर्षीय सूरजचे टोकाचे पाऊल!
- पुणे: कोल्हापूरकरांसाठी विशेष गाडी झाली कायमची डेली एक्स्प्रेस
- हिंमत असेल तर मुंबईतील दहीहंडी बंद करून दाखवा! पुण्यातील गणेशोत्सवावर निर्बंध आणणाऱ्या पोलिसांना भाजप शहराध्यक्षांचा थेट इशारा!
महाराष्ट्र
- पुणे: कोल्हापूरकरांसाठी विशेष गाडी झाली कायमची डेली एक्स्प्रेस
- हिंमत असेल तर मुंबईतील दहीहंडी बंद करून दाखवा! पुण्यातील गणेशोत्सवावर निर्बंध आणणाऱ्या पोलिसांना भाजप शहराध्यक्षांचा थेट इशारा!
- पुणे: मावळमध्ये प्रसूतीदरम्यान मातेचा आणि बाळाचा मृत्यू; मायमर हॉस्पिटलवर नातेवाईकांचे गंभीर आरोप!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
गुन्हा
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल


























Subscribe to my channel




