टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तान! शादाब खानला उपांत्य फेरीचं विचारताच... VideoImage Credit source: PTI
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना एकतर्फी जिंकला. पाकिस्तानची या सामन्यात कुठेच छाप पडली नाही. उलट कर्णधार सूर्यकुमार यादवने तिलक वर्मा आणि रिंकु सिंह यांना गोलंदाजी दिली आणि आणखी लाज काढली. पाकिस्तानने हा सामना 61 धावांनी गमावला. या सामन्यात मिस्ट्री स्पिनर उस्मान तारीकची खूपच चर्चा रंगली होती. पण त्यालाही भारताविरूद्ध खास काही करता आलं नाही. पण या पराभवाचं पाकिस्तानला काहीच वाटत नाही, असं उस्मान तारीक म्हणाला. खरं तर लाज वाटावा असा पराभव होता, पण पाकिस्तानचा स्वभाव तसा आहे त्याला काय करणार? आता नामिबिया विरूद्धच्या सामन्यापूर्वी फिरकीपटू शादाब खानने अंतिम सामन्यावरच दावा ठोकला आहे. नामिबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी शादाब खानने सांगितलं की, अंतिम फेरीपर्यंत कोलंबोत असणार आहोत. पाकिस्तानचे सर्व सामने तटस्थ म्हणजेच श्रीलंकेत होणार आहेत.
शादाब खान सराव करून परतत असताना त्याला पाकिस्तानी पत्रकाराने प्रश्न विचारला की, उपांत्य फेरीपर्यंत येथेच असाल का? तेव्हा त्याने कोलंबोत अंतिम फेरीपर्यंत असू असं सांगितलं. खरं तर पाकिस्तानची या स्पर्धेतील स्थिती नाजूक आहे. एकाच ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून सराव करत असूनही काहीच उपयोग झाला नाही. नेदरलँडसारख्या दुबळ्या संघाने विजयासाठी झुंजवलं. तर भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा उडवला. पाकिस्तानचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे पाकिस्तान अंतिम फेरी गाठेल असं वाटत नाही. त्यात सुपर 8 फेरीत तगडे संघ आहेत. या संघावर मात करून उपांत्य फेरी गाठणं कठीण काम आहे. पाकिस्तानच्या स्थितीवर अंतिम फेरीचा सामना अहमदाबादला होणार की कोलंबोत होणार हे ठरणार आहे.
Shadab Khan said, “We will play the final.” pic.twitter.com/ycnA5kK7iE
— Sheri. (@CallMeSheri1_) February 17, 2026
पाकिस्तानी संघात बदल होणार?
भारताविरूद्धच्या सामन्यात पराभवाची नामुष्की ओढावल्यानंतर पाकिस्तानी संघात बदल होण्याची शक्यता वाढली आहे. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये बदल केला जाण्याची शक्यता आहे. बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांना ड्रॉप केलं जाऊ शकतं. बाबरच्या जागी फखर जमान आणि शाहीनच्या जागी सलमान मिर्झाला स्थान मिळू शकतं. या दोन्ही खेळाडूंनी मंगळवारी जोरदार सराव केला.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




