पुणे: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे १४ जून रोजी पूल कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली होती, तर अनेकजण जखमी झाले होते. या दुर्दैवी दुर्घटना झाल्यानंतर प्रशासनाकडून आणि नेत्यांकडून या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती, मात्र ही घोषणा अजूनही कागदावरच असल्याचे समोर आले आहे. या नवीन पुलाच्या बांधकामासाठी राज्य सरकारने ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून तांत्रिक बाबीही पूर्ण झाल्या आहेत. मात्र, पुलाच्या प्रस्तावित जागेवर नवीन पूल बांधण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) सुरक्षेच्या कारणावरून तीव्र विरोध दर्शविला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, हा जुना पूल मोडकळीस आल्यानंतर आणि दुर्घटना घडल्यानंतर गावकऱ्यांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलासाठी आवश्यक असलेला सविस्तर आराखडा तयार करून राज्य सरकारकडून ८ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करून घेतला. तसेच पुलावर सुरक्षेच्या कारणास्तव दोन ठिकाणी जाळी उभारण्याचा प्रस्ताव होता, ज्याच्या अतिरिक्त खर्चाला 'पीएमआरडीए'नेही मान्यता दिली होती. सुरुवातीला डीआरडीओने याला विरोध केला नव्हता, परंतु जेव्हा पुलाच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी खणकाम सुरू झाले, तेव्हा हा पूल संस्थेच्या १०० मीटर परिसरात येत असल्याने सुरक्षेचा मुद्दा पुढे करत डीआरडीओने या बांधकामास विरोध केला.
या वादानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 'डीआरडीओ'सह सर्व संबंधित अधिकाऱ्यांची दोन वेळा उच्चस्तरीय बैठक घेतली, परंतु डीआरडीओने या जागेवर परवानगी देण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर या ठिकाणी केवळ पादचारी पूल उभारावा असा पर्याय पुढे आला होता, परंतु ग्रामस्थांनी वाहतुकीसाठी रहदारीचा मुख्य पूल असावा अशी ठाम मागणी केली. ग्रामस्थांच्या या मागणीमुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागावर पुलासाठी नवीन जागा शोधण्याची वेळ आली आहे.
सध्या जुन्या पुलाच्या पुढे साधारण ३०० मीटर अंतरावर नवीन जागा निश्चित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या नवीन जागेचा तांत्रिक अहवाल आल्यानंतरच अंतिम जागा ठरवली जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्य सरकारने यापूर्वी मंजूर केलेल्या ८ कोटींच्या निधीतूनच या नवीन ठिकाणी पुलाचे बांधकाम केले जाईल, मात्र नवीन रचनेमध्ये जाळ्या बसविण्यात येणार नाहीत. तसेच ग्रामस्थांच्या रहदारीसाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांना हा पूल जोडण्यासाठी काही खाजगी जमीन संपादित करावी लागणार असून, त्याबाबत संबंधित शेतकऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून त्यांनी जमीन संपादनासाठी सहमती दर्शविली आहे. तांत्रिक आराखडा मंजूर झाल्यानंतर जिल्हा प्रशासन जमीन संपादनाविषयी अंतिम निर्णय घेणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे आणि नवीन जागा शोधावी लागल्यामुळे पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठी किमान आणखी वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शहर
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- नाशिक: सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा उडाल्यास पुढील २० वर्षांत ६६ टक्क्यांवर पोहोचणार खासगी वाहनांचा वापर; शहराला हव्यात तब्बल ८०० बस
- पुण्यात खळबळ! महापालिका शाळेची फाइलच गायब; महंमदवाडीतील जागा खासगी संस्थेला देण्याच्या प्रशासकीय घाटावर सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक
- बाबरी मशीद पाडायला नको होती' असे म्हणणे देशविरोधी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मुंबई पोलिसांची तडीपारीची कारवाई रद्द
महाराष्ट्र
- पुणे: रस्त्यावर कुजलेले दूध ओतणे पडले महागात; भोर नगरपालिकेची १० हजार रुपयांची दंड कारवाई
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- बीड: माजी सैनिकाचे घर फोडणारा गल्लीतीलच निघाला; बीडच्या केजमधील घरफोडीचा अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश, ३.५५ लाखांचा ऐवज जप्त
- नाशिक: सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा उडाल्यास पुढील २० वर्षांत ६६ टक्क्यांवर पोहोचणार खासगी वाहनांचा वापर; शहराला हव्यात तब्बल ८०० बस
गुन्हा
- पुणे: पत्नी घर सोडून गेली, दोन दिवसांनी पतीने संपवले आयुष्य; हातावरील मजकूर आणि सुसाईड नोट पाहून पोलीसही झाले अवाक
- सांगली: कामावरून झालेल्या वादातून झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडके घालून निर्घृण खून; आरोपी पसार
- नाशिक: मुलीच्या मृत्यूनंतर दुःखात असलेल्या वडिलांनीही संपवले जीवन
- पुणे: शालेय विद्यार्थिनींचा ८ दिवस पाठलाग करून विनयभंग; दोन नराधम अटकेत
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई



























Subscribe to my channel




