येत्या 28 ऑगस्टला माझ्या कुटुंबात एक लग्न आहे. ठिकाण आहे चेन्नईपासून 300 किमी दूर कुंभकोणम. रेल्वेचे तिकीट आरक्षित करता यावे यासाठी सर्व नातेवाइकांना दोन महिने आधीच सांगण्यात आले आहे. पण गोष्ट तेव्हा बिघडू लागली जेव्हा मोठा वेळ आणि बजेटचे गणित एकमेकांशी भिडू लागले. मुंबईपासून तिथपर्यंतचा ट्रेनचा प्रवास 35 तासांचा आहे. वृद्धांसाठी एवढा प्रवास कष्टापेक्षा कमी नाही. त्यामुळे, बहुतेकांनी जवळच्या विमानतळासाठी म्हणजेच तिरुचिरापल्लीसाठी फ्लाइट घेण्याचे ठरवले. पण खरा ड्रामा तेव्हा सुरू झाला जेव्हा फॅमिली व्हॉट्सॲप ग्रुपवर लग्नाची पत्रिका आली. पत्रिका येताच अभिनंदनाच्या संदेशांऐवजी ग्रुपवर या गोष्टीची डोकेदुखी सुरू झाली की मुंबई ते तिरुचिरापल्लीचे तिकीट ~16,000 रुपयांचे आहे. आता जरा पाहुण्यांचा पूर्ण खर्च समजून घ्या- सोळा हजारांची फ्लाइट, विमानतळापासून लग्नाच्या ठिकाणापर्यंत 2,500 ची टॅक्सी, एखाद्या बजेट हॉटेलमध्ये दोन दिवस राहण्याचे चार हजार व 2 हजार किरकोळ खर्च. यात आहेर वेगळा. परिणाम असा झाला की या खर्चाने लग्नाच्या आनंदाला दाबून टाकले. ग्रुपवर बहुतांश नातेवाइकांनी आतापर्यंत येण्यास होकार दिलेला नाही. आज मध्यमवर्गीयांसाठी लग्न अटेंड करण्याचा सरासरी खर्च एवढा वाढला आहे की तो त्यांना उपस्थित राहण्यापासून रोखत आहे. पाहिले तर भारतीय समाजात लग्ने ही सामाजिक जबाबदारीची मोठी करन्सी आहेत. जर तुम्ही कुटुंबातील लग्नाला जात नाही, तर तुम्ही वृद्धांच्या त्या ‘सोशल बॉयकॉट’ची जोखीम घेत असता जे 6-6 महिने तुमच्याशी बोलत नाहीत. नातेवाइकांच्या डोक्यात वहीखाते चालत असते, ज्यात कुणी कुणाच्या लग्नात हजेरी लावली व कुणी किती आहेर दिला, याचा हिशोब अनेक दशक ठेवला जातो. आज अडचण अशी की यजमान इन्स्टाग्रामवर परफेक्ट दिसणाऱ्या ‘फेयरीटेल वेडिंग’च्या मागे धावत आहेत, पण किंमत पाहुण्यांना मोजावी लागत आहे. बदनामीच्या याच भीतीने अनेक वृद्ध थकवणाऱ्या मार्गांनी प्रवास करण्यास भाग पडले आहेत, जेणेकरून ते गॉसिपचा विषय बनणार नाहीत. मॅनेजमेंट टिप: मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध, सोशल मीडियाच्या फोटोंचा भाग बनण्यासाठी बजेट बिघडवू नका. देखाव्याच्या काळात खिसा व मानसिक शांतता वाचवणे हेच मोठे ॲसेट मॅनेजमेंट आहे. लग्नात स्वतः जाण्याऐवजी भेटवस्तू पाठवून द्या, जी नवदाम्पत्याच्या उपयोगाला येईल व तुमचा स्वाभिमान सुरक्षित ठेवेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- हॉटेलमधील 'जार'च्या अशुद्ध पाण्याला बसणार लगाम! तुकाराम मुंढे तयार करणार कडक SOP; राज्य सरकारचे विधानसभेत मोठे निर्देश!
- कोल्हापुरात महापूर सदृश परिस्थिती! राजाराम बंधाऱ्याची पातळी २९ फुटांवर; जिल्ह्यातील ३३ बंधारे पाण्याखाली!
- ठाणेकरांचा पर्यावरण रक्षणासाठी एल्गार! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षणासाठी नागरिकांची 'मानवी साखळी'; मुख्य प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने!
- पनवेलमध्ये पुराचा वेढा, ३३४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले! महानगरपालिकेकडून तात्काळ अन्न आणि वैद्यकीय मदत सुरू
महाराष्ट्र
- कोल्हापुरात महापूर सदृश परिस्थिती! राजाराम बंधाऱ्याची पातळी २९ फुटांवर; जिल्ह्यातील ३३ बंधारे पाण्याखाली!
- ठाणेकरांचा पर्यावरण रक्षणासाठी एल्गार! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षणासाठी नागरिकांची 'मानवी साखळी'; मुख्य प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने!
- पनवेलमध्ये पुराचा वेढा, ३३४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले! महानगरपालिकेकडून तात्काळ अन्न आणि वैद्यकीय मदत सुरू
- भ्रष्टाचाराचा कुबेर! देवळाली कॅन्टोन्मेंटचे माजी सीईओ अजय कुमार यांच्यावर सीबीआयचा गुन्हा; १० वर्षांत ५२ हजारांची संपत्ती झाली थेट पाऊणेसहा कोटी!
गुन्हा
- "जे लग्न कधी होणारच नाहीये, त्यासाठी आधार कशाला?" केतन अगरवाल हत्या प्रकरणात आरोपी सियाचे खळबळजनक व्हॉट्सॲप चॅट व्हायरल!
- उत्तर प्रदेश: पतीची हत्या करून मृतदेह बाथरुमच्या फरशीखाली गाडला; ४५ दिवस मृतदेहावरच आंघोळ केली!
- पेट्रोल पंप घोटाळ्यामागे थकीत भाड्याची 'ती' गंभीर कहाणी; बीडीओच्या अपहरणनाट्याचा विधानपरिषदेत झाला उलगडा!
- पुणे: ५ कोटींच्या वेतन घोटाळ्यात सिंहगड इन्स्टिट्यूटच्या संस्थापकासह ७ जणांवर गुन्हा दाखल.
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिसळल्याने इंजिन खराब होत नाही! केंद्र सरकार आणि पेट्रोलियम मंत्र्यांचे व्हायरल दाव्यांवर स्पष्टीकरण
- आग्रा हादरले! पतीची निर्घृण हत्या करून मृतदेह बाथरूममध्ये पुरला; ४५ दिवसांनंतर धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा!
- इंधन दरांचे मोठे गुपित: पेट्रोल ६ रुपये तर डिझेल १८९ रुपये कसे? कंपन्या दर वाढवण्याचे धाडस का करत नाहीत? जाणून घ्या सत्य.
- भारतीय सैन्याची ताकद वाढणार! ५२,००० कोटींच्या संरक्षण खरेदीला मंजुरी; लष्कर, नौदल आणि वायुदलाला मिळणार आधुनिक शस्त्रास्त्रे.

























Subscribe to my channel



