एक राजनैतिक अधिकारी म्हणून मी परदेशात कार्यरत होतो आणि जगभ्रमंती केली आहे. माझ्या पासपोर्टवर मला भारत-गणराज्याचा नागरिक, एक उदयोन्मुख शक्ती आणि महान संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून संबोधले गेले आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती. म्हणूनच, परराष्ट्र मंत्रालयाने नुकतेच जेव्हा असे म्हटले की, पासपोर्ट हा नागरिकत्वाचा पुरावा नाही, तेव्हा मी गोंधळून गेलो. सरकारची स्वतःची काही कारणे असू शकतात, पण अनेक दशकांपासून भारतीयांची अशी समज आहे की पासपोर्ट ही त्यांच्या नागरिकत्वाची अधिकृत पुष्टी आहे. पासपोर्ट मिळवण्याच्या प्रक्रियेआधी सखोल चौकशी केली जाते. अर्जदाराला कागदपत्रे सादर करावी लागतात, ओळख पटवावी लागते, निवासाचा पुरावा द्यावा लागतो आणि पोलिस पडताळणीतून जावे लागते. पासपोर्ट केवळ एखादी व्यक्ती परदेशात जाऊ इच्छिते म्हणून दिला जात नाही, तर राज्यसंस्थेचे समाधान होते की अर्जदार भारतीय नागरिक आहे, म्हणून तो दिला जातो. पासपोर्ट कायद्याच्या कलम 6(2)(ए) मध्ये स्पष्ट म्हटले आहे की, पासपोर्ट केवळ भारताच्या नागरिकालाच दिला जाऊ शकतो. या दस्तऐवजाचे भावनिक महत्त्व त्याच्या प्रशासकीय उपयुक्ततेपेक्षाही मोठे होते. ते व्यक्ती आणि देश यांच्यातील नात्याचे प्रतीक होते. परदेशात जाणाऱ्या भारतीयांसाठी ही केवळ एक पुस्तिका नव्हती, तर ती ओळख व आपलेपणाची घोषणा होती. हे खरे आहे की, माहिती लपवून, कागदपत्रांमध्ये फेरफार करून किंवा खोटी माहिती देऊन काही लोक चुकीच्या मार्गाने पासपोर्ट मिळवू शकतात. अशा स्थितीत राज्यसंस्थेला पासपोर्ट रद्द करण्याचा आणि दोषीवर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण, कायदेशीर प्रक्रियेद्वारे मिळालेला वैध पासपोर्ट हा नागरिकत्वाचा पुरावा आहे, ही धारणा या कारणास्तव नाकारता कामा नये. मतदार ओळखपत्रही चुकीच्या पद्धतीने मिळवता येऊ शकते. रेशन कार्डातही फेरफार होऊ शकतो. आधार कार्डाचाही दुरुपयोग होऊ शकतो. मालमत्तेच्या कागदपत्रांतही घोटाळे करता येतात. भारतातील सध्याची कागदपत्रांची स्थिती पाहता हा प्रश्न अधिक चिंतेचा ठरतो. आधार नागरिकत्वाचा पुरावा नाही. मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाही. रेशन कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही. जन्मदाखल्यांनाही अनेकदा प्रक्रियात्मक कारणांवरून आव्हान दिले जाते. आता जर पासपोर्टही नागरिकत्वाचा पुरावा नसेल, तर नागरिकत्वाचा खरा पुरावा काय, हा प्रश्न निर्माण होतो. कोणतेही आधुनिक राष्ट्र गोंधळाच्या आधारावर चालू शकत नाही. नागरिकत्व ही काही हवेतली गोष्ट नाही. याच गोष्टीवर शेवटी सर्व घटनात्मक अधिकार अवलंबून असतात. मतदानाचा अधिकार वापरणे, कायदेशीर संरक्षणाची मागणी करणे, सरकारी लाभ मिळवणे किंवा संविधानाने दिलेले अधिकार उपभोगण्यापूर्वी, व्यक्तीने नागरिक म्हणून मान्यता मिळवणे आवश्यक आहे. जर कोणतीही कागदपत्रे ही स्थिती ठामपणे सिद्ध करत नसतील, तर सर्व भार व्यक्तीवर येऊन पडतो. प्रत्यक्षात राज्यसंस्थेने स्वतःच्या संस्था आणि कागदपत्रांच्या माध्यमातून नागरिकाचे नागरिकत्व सिद्ध करायला हवे होते; परंतु त्याऐवजी, नागरिक स्वतः या देशाचा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याला वारंवार भाग पाडले जाते. जेव्हा राज्यसंस्था स्वतः कागदपत्रे जारी करूनही नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते, तेव्हा नागरिक संभ्रमावस्थेत जातो. त्याच्याकडे कागदपत्रे असूनही ती अपुरी ठरतात. तो नियमांचे पालन करतो, पण त्याला कोणतीही शाश्वती मिळत नाही. नागरिकत्व जर सतत वादाचा विषय बनून राहिले, तर अधिकाऱ्यांना अतिरिक्त पुरावे मागण्याचे जास्तीचे अधिकार मिळतात. नागरिक मनमानी अर्थ आणि नोकरशाहीच्या समाधानावर अवलंबून राहतात. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या अनेक देशांत पासपोर्टला नागरिकत्वाचा भक्कम पुरावा मानले जाते, कारण ते देण्यापूर्वी नागरिकत्वाची पडताळणी केली जाते. यावरचा खरा उपाय म्हणजे दस्तऐवज देण्यापूर्वीची तपासणी प्रक्रिया अधिक कडक करणे, पडताळणी यंत्रणेत सुधारणा करणे, विविध डेटाबेस एकमेकांना जोडणे आणि फसवणूक करणाऱ्यांसाठी कडक शिक्षेची तरतूद करणे हा आहे. या वादाच्या केंद्रस्थानी एक महत्त्वाचा प्रश्न आहे: लोकशाहीमध्ये नागरिकाने वैधतेच्या गृहीतकावर जगावे की संशयाच्या? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) नागरिकत्व जर सतत वादाचा विषय बनून राहिले, तर अधिकांऱ्यांना अतिरिक्त पुरावे मागण्याचे जास्तीचे अधिकार मिळतात. मग नागरिक मनमानी अर्थ आणि नोकरशाहीच्या समाधानावर अवलंबून राहतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: एफडीएचा मोठा दणका, 'आईच्या गावात' आणि 'यल्ला-यल्ला' रेस्टॉरंटचे परवाने रद्द
- मुंबई: कळव्यातील लोकल प्रवाशांची मोठी कोंडी! कारशेडकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वे प्रशासनाची भिंत, प्रवाशांमध्ये संतापाची लाट
- पुणे: दिग्दर्शक संजय गुप्ताने सिया गोयलची तुलना रिया चक्रवर्तीशी केली, नेटकऱ्यांनी काढले वाभाडे; संतापले युजर्स!
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: एफडीएचा मोठा दणका, 'आईच्या गावात' आणि 'यल्ला-यल्ला' रेस्टॉरंटचे परवाने रद्द
- मुंबई: कळव्यातील लोकल प्रवाशांची मोठी कोंडी! कारशेडकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वे प्रशासनाची भिंत, प्रवाशांमध्ये संतापाची लाट
- पुणे: दिग्दर्शक संजय गुप्ताने सिया गोयलची तुलना रिया चक्रवर्तीशी केली, नेटकऱ्यांनी काढले वाभाडे; संतापले युजर्स!
- पुणे: 'दुकान उघडलंस तर ठार मारेन!' दारूसाठी पैसे मागितल्याचा राग; वाईन शॉप कर्मचाऱ्यावर बाटलीने जीवघेणा हल्ला
गुन्हा
- बीड: स्कॉर्पिओ आणि १० लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल.
- ऐरोली महापालिका रुग्णालयाचा हलगर्जीपणा! चुकीचे इंजेक्शन दिल्याने गर्भवती सोनम डोंगरे आणि बाळाचा मृत्यू; नवी मुंबईत खळबळ!
- रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीची तस्करी करताना महाराष्ट्रातील दोन पोलीस छत्तीसगडमध्ये जेरबंद; खवल्या मांजराचे खवलेही जप्त!
- कोठडीतील मृत्यूला जबाबदार कोण? वाशिममधील धक्कादायक प्रकरणात ९ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा!
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
देश विदेश
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- मायलेज न सांगताच मारुतीची 'फ्लेक्स-फ्यूल' वॅगनआर बाजारात; तीन आठवड्यांत केवळ ३ कारची विक्री!
- आता आयुष्मान भारत योजनेची कामे होतील व्हॉट्सॲपवर; केंद्र सरकारचा 'आयुष्मान सारथी' चॅटबॉट लॉन्च!
- बसच चोरीला! तेही थेट बसस्थानकातून.. आरोपीकडून तब्बल २० बसेस चोरल्याची कबुली; पोलीसही चक्रावले!

























Subscribe to my channel


