पुणे: शनिवारवाड्याला मिळणार नवं रूप! ऐतिहासिक 'हजारी कारंजा' पुन्हा होणार सुरू; केंद्र सरकारकडून उत्खननासाठी हिरवा कंदील!

पुणे: पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्याचे वैभव पुन्हा एकदा उजळणार आहे. पेशवेकालीन अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना असलेल्या शनिवारवाड्यातील जलव्यवस्थापन प्रणाली (Water System) पूर्ववत करण्याचा निर्णय केंद्रीय पुरातत्त्व विभागाने घेतला आहे.
या निर्णयामुळे शनिवारवाड्यातील प्रसिद्ध 'हजारी कारंजा' लवकरच पुन्हा एकदा पर्यटकांना कार्यरत अवस्थेत पाहता येणार आहे.

काय आहे नेमका निर्णय? पेशवे काळात कात्रज तलावातून पाणी शनिवारवाड्यापर्यंत आणण्यासाठी एक अत्यंत प्रगत भुयारी जलवाहिनी प्रणाली उभारण्यात आली होती. काळाच्या ओघात यातील अनेक जलवाहिन्या निकामी झाल्या किंवा बुजल्या गेल्या. ही बंद पडलेली यंत्रणा पुन्हा जिवंत करण्यासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेतला आहे.

 

या कामासाठी केंद्राकडून कार्यादेश (Work Order) प्राप्त झाला असून, पावसाळ्याचा अंदाज घेऊन लवकरच उत्खननाचे काम सुरू केले जाणार आहे.

१. उत्खनन: पहिल्या टप्प्यात पुरातत्त्व विभागाकडून जुन्या नकाशांच्या आधारे जलवाहिन्यांचे उत्खनन केले जाईल.
२. आराखडा: जलवाहिन्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी आणि भविष्यातील संवर्धनासाठी एक सविस्तर आराखडा तयार केला जाईल.
३. निधी: कामाच्या प्रगतीनुसार केंद्र सरकारकडून टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
४. संवर्धन: या प्रणालीचा जीर्णोद्धार करून शनिवारवाड्याचे ऐतिहासिक सौंदर्य पुन्हा जिवंत करणे हा मुख्य उद्देश आहे.केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ संरक्षण सहायक गजानन मांडवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाच्या माध्यमातून पेशवेकालीन पाणीपुरवठा योजना कशी कार्यरत होती, याचा शास्त्रीय अभ्यास करून त्याचे संवर्धन केले जाईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर शनिवारवाड्याच्या पर्यटनात एक मोठी भर पडणार आहे.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *