ज्यां द्रेज यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎‎‎आपल्या जगण्याच्या जुन्या‎ पद्धती हरवत चालल्यात…‎

पूर्वी रांची हे अतिशय सुंदर शहर होते. ते आजच्या‎सारखे मोठे शहर नव्हते तर एक छोटेसे गाव होते.‎त्याच्या आसपास अनेक आदिवासी वस्त्या होत्या. मध्ये‎तलाव, नद्या आणि बागा होत्या. हळूहळू त्या वस्त्यांच्या‎जागी मोठ्या इमारती, मॉल आणि उड्डाण पूल उभे‎राहिले. आता फक्त त्यांची नावे उरली आहेत-‎कांताटोली, डंगराटोली, सिरमटोली, करमटोली इत्यादी.‎मी अशाच राहिलेल्या एका वस्तीत राहतो. रांचीच्या‎काठावर असलेली ही उरांव समाजाची वस्ती आहे.‎एका स्थानिक झाडाच्या नावावरून तिला ‘नीमटोली’‎म्हटले जाते.‎ तिथले गावासारखे वातावरण हळूहळू कमी होत आहे,‎पण अजूनही जिवंत आहे. घरासमोर मोठे चिंचेचे झाड ‎‎आहे. मुले त्या झाडाखाली खेळतात. त्यांच्याकडे ‎‎बाजारातून आणलेली खेळणी नसतात. बांबू, लाकडाचे ‎‎तुकडे, तुटलेल्या चपला, रिकाम्या बाटल्या आणि जुन्या ‎‎टायरांपासून ती स्वतःची खेळणी तयार करतात. सामान्य ‎‎खेळण्यांमध्येही ती तासन्‌तास आनंदाने रमून जातात. ‎‎अनेक प्राणीही गावाचा भाग आहेत.‎ कुत्रे, मांजरे, बकऱ्या आणि कोंबड्या इकडे-तिकडे ‎‎दिसतात. त्यांना बांधून ठेवले जात नाही. ते‎मोकळेपणाने फिरतात आणि जणू समुदायाचाच भाग‎आहेत. नीमटोलीतील आवाज खूप शांतता देणारे‎आहेत. तिथे वाहनांचे हॉर्न ऐकू येत नाहीत. पक्ष्यांचा‎किलबिलाट, मुलांचे हसणे, फेरीवाल्यांचे आवाज‎आणि पावसाच्या सरींचा नाद ऐकू येतो. मला सकाळी‎उठताना पक्ष्यांचे आवाज ऐकायला खूप आवडते.‎ गावात एक छोटी किराणा दुकान आहे. मिस्टर टोप्पो‎आणि त्यांची पत्नी मिळून ते चालवतात. त्यांनी‎दुकानाला मुलगी बुलबुलचे नाव दिले आहे. दोघेही खूप‎मिळून मिसळून वागणारे आहेत.‎ अनेक दुकानदार जास्त पैसे कमावण्यासाठी ग्राहकांना‎घाईत पाठवतात. पण मिस्टर टोप्पो आणि त्यांची पत्नी‎ग्राहकांशी गप्पा मारणे पसंत करतात. माझे काही शेजारी‎गरिबीत जीवन जगत आहेत. त्यात एक विधवा महिला‎आहे. त्यांचे मूल दिव्यांग आहे. त्या उदरनिर्वाहासाठी‎गावठी दारू तयार करतात.‎ गावातील लोक त्यांचा आदर करतात. त्यांच्याकडे‎छोटे-छोटे गट येतात, शांतपणे दारू पितात आणि नंतर‎घरी जातात किंवा झाडाखाली विसावतात. पण मी‎त्यांना कधी भांडताना किंवा ओरडताना पाहिले नाही.‎कधी-कधी नीमटोलीतील सर्व लोक एखाद्या‎मेजवानीसाठी किंवा सणासाठी एकत्र येतात.‎ उरांव समाजाचा सर्वात मोठा सण म्हणजे सरहुल. त्या‎दिवशी संपूर्ण गाव सिरमटोली सरना स्थळाकडे‎जाणाऱ्या मिरवणुकीत सहभागी होते. शहरभर‎लाल-पांढऱ्या पारंपरिक कपड्यांची झलक दिसते.‎मिरवणुकीत मोठी गर्दी असते. पण ती शांत आणि‎शिस्तबद्ध असते.‎ ते दृश्य खूप सुंदर असते. एकदा मी नीमटोलीतील काही‎वृद्ध महिलांना त्यांच्या बालपणाबद्दल विचारले. मी‎म्हणालो, पूर्वी लोक खूप गरीब होते. आता घरात पंखे‎आणि टीव्ही आहेत. मग जीवन चांगले झाले का? त्या‎सगळ्या एकाच वेळी म्हणाल्या की, पूर्वीचे जीवन‎अधिक चांगले होते!‎ त्यांना आठवत होते की, शाळेत जाताना त्या स्वच्छ‎तलावात पोहत असत आणि परतताना खाण्यासाठी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎एकत्र शिंपले पकडत असत. पण आता असे वाटते की,‎जुन्या जीवनपद्धतीची थोडी झलक उरली आहे, तीही‎लवकरच संपेल. नीमटोलीच्या आसपास मोठमोठे‎अपार्टमेंट उभे राहत आहेत. ही वस्ती कधीही विस्थापित‎होऊ शकते. त्याच्यासोबत जगण्याची एक पद्धतही‎नाहीशी होईल. मी असे म्हणत नाही की, आपण पुन्हा‎जुन्या काळात जावे. पण त्या जीवनातून प्रेरणा घ्यायला‎हवी आणि त्यातील मूल्ये जपण्याचा प्रयत्न करायला‎हवा.‎ आपण सामुदायिक जीवनाचा खजिना हरवून बसलो ‎आहोत. पण कदाचित एखाद्या दिवशी तो पुन्हा‎सापडेल!‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ मी असे म्हणत नाही की आपण पुन्हा‎जुन्या काळात परत जावे. पण त्या‎जीवनातून प्रेरणा घ्यायला हवी आणि‎त्यातील मूल्ये जपण्याचा प्रयत्न करायला‎हवा. पण सत्य हेच आहे की आपण‎सामूहिक जीवनाचा खजिना गमावला‎आहे.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

इतर

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *