
Kolhapur-Pune Highway may soon be toll-free : कोल्हापूर-पुणे महामार्ग हा लवकरच टोलमुक्त होण्याची शक्यता आहे. कारण, कोर्टाकडून याबाबत पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. झालं असं की, माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर-पुणे हा रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात कोर्टात याचिका दाखल केली. त्याशिवाय टोल तात्काळ बंद करावा अशी मागणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना हजर राहण्याबाबत कोर्टाने नोटीस बजावली आहे. जे रस्ते निकृष्ठ आणि खराब झाले असतील, त्या रस्त्यावर टोल आकारणी करता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे पुणे-कोल्हापूर रस्त्याची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी तातडीने बंद करावी, अशी याचिका माजी खासदार राजू यांनी कोल्हापूर खंडपीठात दाखल केली.
राजू शेट्टी यांच्या याचिकेची कोल्हापूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर या रस्त्याची दुरावस्था अतिशय भयानक झाली आहे. रस्ता दुरूस्त केला जात नाही, तरीही नागरिकांकडून टोल वसूल केला जात आहे. हा रस्ता लवकरात लवकर टोलमुक्त करावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी कोल्हापूर खंडपीठात केली. राजू शेट्टी यांची याचिका कोल्हापूर खंडपीठाने गांभीर्याने घेतली असून जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस धाली आहे.
मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, रस्ते विकास प्राधिकरणाचे सचिव यांच्यासोबतच कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्हाधिकारी यांना पुढील सुनावणीस हजर राहण्याबाबत कोल्हापूर सर्किट बेंचने नोटीसा पाठवल्या आहेत. दरम्यान, केरळमधील राष्ट्रीय महामार्गाच्या खराब रस्त्यावर दाखल झालेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ऑगस्ट अखेरीस सुनावणी झाली होती. सरन्यायाधीश भुषण गवई यांच्या त्रिसदस्यीय समितीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला फटकारले होते. खराब रस्ते असताना टोल का घेता? असा सवाल विचारला होता. आता याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी कोल्हापूर-पुणे महामार्गाबाबत कोर्टात धाव घेतली आहे. कोल्हापूर-पुणे हा महामार्ग अत्यंत निकृष्ट झालाय, जोपर्यंत रस्त्याची कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत टोल घेऊ नये, अशी याचिका कोल्हापूर खंडपीठात केली.
कोल्हापूर आणि पुणे या दोन शहरादरम्यान २४० किमीचा महामार्ग असून तीन तासात पोहचणं अपेक्षित आहे. पण सध्या या महामार्गावर सध्या सात तासांचा वेळ लागतो. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनांचे नुकसान होतं, तो वेगळाच भाग आहे. पावसाळ्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडतात. हा मुद्दा लक्षात घेऊनच राजू शेट्टी यांनी कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली. मंगळवारी याबाबत सुनावणी झाली. कोर्टाने पुढील सुनावणीवेळी प्राधिकरणासह सर्व विभागांना हजर राहण्याबाबत नोटीस पाठवली आहे. कोर्टाने हस्तक्षेप केल्यास कोल्हापूर-पुणे हा रस्ता टोलमुक्त होण्याची शक्यता आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



