Majalgaon Dam : माजलगाव धरण ५६ टक्के भरले; बीडसह माजलगावची पाण्याची चिंता मिटली


Beed : बीड जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे माजलगाव धरणातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पाण्याची आवक होत असल्याने आज सकाळी ११ वाजेपर्यंत धरण ५६ टक्क्यांवर पोहोचले असून, सध्या १० हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे.

बीड शहरासह माजलगाव शहराची तहान भागवणारे जिल्ह्यातील सर्वात मोठे माजलगाव धरण आहे. धरण यंदा मृत साठ्याच्या आत गेले होते. मात्र मे महिन्यात झालेल्या पावसाने पाणी पातळीत थोडी वाढ झाली होती. तर जून व जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे ९ ऑगस्ट रोजी धरण फक्त २५ टक्के भरले होते. मात्र मागील पाच दिवसांच्या जोरदार पावसामुळे पाणीपातळीत ४० टक्क्यांची भर पडल्याने सद्यस्थितीला धरण ५६ टक्के भरले आहे.

Mumbai Rain : पावसाचा हाहा:कार! मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, एलबीएस मार्ग बंद, कुर्लामध्ये कमरेइतके पाणी; धडकी भरवणारा व्हिडिओ

पाण्याचा प्रश्न मिटला

धरण अभियंता गणेश झापगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीतून पाण्याची आवक कायम राहिल्यास रविवारपर्यंत धरणाची पातळी ८० टक्क्यांवर जाईल असा अंदाज आहे. सध्या तरी माजलगाव शहर व तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तसेच शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पाण्याखाली माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पाण्याखाली गेले असून गंगामसला येथील गावकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कुठल्याही क्षणी गावांमध्ये पाणी घुसू शकते; अशी स्थिती बीडच्या माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथे झाली असून गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे पुराचे पाणी गावामध्ये शिरले असून गावांमधील मोरेश्वर मंदिर पाहण्यासाठी गेले आहे. याचा फटका गंगामसला येथील शेती पिकांना बसला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *