
Pimpri : मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील नाराजांनी उदयास आणलेल्या ‘मावळ पॅटर्न’मुळे हा मतदारसंघ राज्यभरात चर्चेत आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांना त्यांच्याच पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी अपक्ष म्हणून आव्हान दिले आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांसह महाविकास आघाडीनेही भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मावळातील लढत चुरशीची होणार असून ‘मावळ पॅटर्न’ यशस्वी करण्याचे सर्वपक्षीयांपुढे आव्हान आहे.
मावळ हा १९६७ मध्ये स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाला. १९९० पर्यंत काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यामुळे पूर्वी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असे. मात्र, १९९५ हे वर्ष निर्णायक ठरले. या वर्षी काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या रूपलेखा ढोरे यांना भाजपने ऐन वेळी उमेदवारी देऊन निवडून आणले. त्यानंतर सलग २५ वर्षे भाजपचे उमेदवार या मतदारसंघात विजयी झाले. त्यामुळे मावळ भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, २०१९ मध्ये भाजपमध्ये बंडखोरी झाली. उमेदवारी नाकारल्याने सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांना पराभूत केले. तेव्हापासून आमदार शेळके आणि मावळ भाजपमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष सुरू झाला. बालेकिल्ला ताब्यातून गेल्याने भाजपचे प्रदेश नेतेही नाराज होते. शेळके महायुतीत आले, तरी मावळ भाजपचा त्यांना विरोध राहिला.
|
|
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार बाळा भेगडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी पक्षाचे नव्हे, तर पदाचे राजीनामे देऊन राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना जाहीर पाठिंबा दिला. भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जात असलेल्या बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने असा ‘मावळ पॅटर्न’ निर्माण झाला. महाविकास आघाडी, मनसेने बापू यांना पाठिंबा देऊन या पॅटर्नला बळ दिले. काही पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता भाजपचे संपूर्ण पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, दिवंगत किशोर आवारे यांची जनसेवा विकास आघाडी, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे काही पदाधिकारी बापू यांचा प्रचार करत आहेत.
‘आम्ही सर्व जण एकत्र का आलाे, हे राज्याने जाणून घ्यावे. आमदारांच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप आहे. तसेच, पाच वर्षांत त्रास दिल्याचा मुद्दा आहे,’ असे मावळ पॅटर्नकडून प्रचारात सांगितले जाते. ‘आमदार शेळके यांनी एकदाच संधी मागितली होती, आता शब्द पाळला नाही. उद्योग बाहेर गेल्याने अनेकांचा रोजगार गेला, विकास झाला नाही,’ असा बापू भेगडे यांचा दावा आहे.
‘मी कोणाला शब्द दिला नव्हता. नेते विरोधात असून जनता माझ्यासोबत आहे. मावळसाठी चार हजार कोटी रुपयांचा निधी आणला. पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात विकास केला,’ असे शेळके यांच्याकडून प्रचारात सांगितले जात आहे. प्रत्यक्षात शेळके आणि भेगडे यांच्यात लढत होत असली तरी मावळ भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शेळके यांच्या पराभवासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे मावळमध्ये चुरस वाढली असून, या लढतीकडे राज्याचे लक्ष आहे. लोणावळा, तळेगाव दाभाडे, वडगाव या भागांतील शहरी मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो, यावर विजयाची समीकरणे अवलंबून असतील. लोकसभेला शहरी भागातून शिवसेनेचे (शिंदे) श्रीरंग बारणे यांना मताधिक्य होते, तर ग्रामीण भागातून शिवसेना (ठाकरे) पक्षाचे संजोग वाघेरे पुढे होते. भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) सर्वजण एकत्र असतानाही बारणे यांना या मतदारसंघात केवळ चार हजारांचे मताधिक्य होते.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



