
Mumbai Water Crisis News : राज्यात मान्सून दाखल होऊन बरेच दिवस झाले तरी देखील अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस न झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट होत चालली आहे. अशामध्ये आता मुंबईकरांचे टेन्शन आणखी वाढले आहे. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त ५ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मुंबईवर पाणीकपातीचे संकट वाढले आहे. आधीच मुंबईमध्ये १० ते १५ टक्के पाणीकपात सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला २ धरणांतील राखीव कोट्यातून पाणीपुरवठा केला जात आहे.
या पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त ५ टक्केच पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये घट झाली आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना पालिकेकडून आवाहन केले जत आहे. धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्यामुळे मुंबईवर पाणीकपातीची संकट ओढावले आहे.
|
Pune : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी, येत्या शुक्रवारी देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान |
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा लक्षात घेता मुंबई महानगर पालिकेने ३० मेपासून ५ टक्के पाणीकपात केली होती. त्यानंतर ५ जूनपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात करण्यात आली. अशामध्ये मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे आणि पाण्याची साठवून ठेवत त्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मुंबई महानगर पालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी यासारख्या तलाव आणि धरणांमधून पाण्याचा पुरवठा केला जातो. या सर्वच धरण क्षेत्रांमध्ये जून महिना संपत आला तरी देखील जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट होत चालली आहे. जोपर्यंत या धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस पडत नाही तोपर्यंत पाणीसाठा वाढणार नाही. धरणांमधील पाणीसाठा वाढल्यानंतरच मुंबईवरील पाणीकपातीचे संकट दूर होणार आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




